शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

शेतकरी टिकला, तर राज्य टिकेल, देश टिकेल: दिशा पिंकी शेख

By ब्रह्मानंद जाधव | Updated: May 20, 2023 18:50 IST

अत्यल्प भावामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात

ब्रह्मानंद जाधव, बुलढाणा : टोमॅटोला मिळणाऱ्या अत्यल्प भावामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात आहेत. शेतकरी मरणाच्या दारात मात्र सरकार बघ्याची भूमिका घेते. आत्महत्या केल्यावर लाख रुपयांचा चेक घेऊन फोटो काढल्यापेक्षा आत्महत्या करू नये, म्हणून आधीच काही पॅकेज द्यावे. शेतकरी टिकला, तर राज्य टिकेल, देश टिकेल असे मत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केले.

त्या बुलढाणा येथील विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर, मुधकर शिंगणे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. मधुकर शिंगणे यांनी दोन एकर शेतात टोमॅटो पीक घेतले. त्यांना एक किलोचा उत्पादन खर्च ८ ते १० रुपये आला. त्यानुसार जवळपास २ लाख रुपये उत्पादन खर्च आला आहे. परंतू आजरोजी टोमॅटोला मातीमोल भाव मिळत असल्याची खंत दिशा पिंकी शेख यांनी यावेळी व्यक्त केली. भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात आहेत. शेतात पानापेक्षा टोमॅटो जास्त आहेत. शेतात उभे असलेले हे पीक म्हणजे पोटच्या लेकरासारखे आहे, ते जर असे मरत असेल, तर त्या शेतकऱ्याची काय अवस्था होत असेल.

सध्या मात्र कष्टावर माती पडल्याच्या भावनाही दिशा पिंकी शेख यांनी यावेळी व्यक्त केल्या. स्वतःच्या खुर्चीचे चार पाय टिकावेत म्हणून सरकार काही करायला तयार आहेत. शेतकऱ्यांचा माल मुंबईपर्यंत जाऊ शकतो, त्यासाठी रेल्वेमध्ये दोन डबे कोल्ड स्टोरेज करण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. भाजीपाल्याला हमीभावाच्या कक्षेत घ्यावे, असा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला.

टोमॅटोचे पार्सल मुख्यमंत्र्यांना पाठवणार - तुपकर

टोमॅटोला भाव मिळत नाही. भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत टोमॅटोचे पार्सल मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्या प्रमाणे सोयाबीन, मका, ज्वारी, तूर, कपाशी या पिकांना हमीभाव दिला जातो. त्या प्रमाणे भाजीपाला वर्गीय पिकांनाही हमीभाव द्यावा, से मत तुपकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :agricultureशेतीbuldhanaबुलडाणा