शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

शेतकरी टिकला, तर राज्य टिकेल, देश टिकेल: दिशा पिंकी शेख

By ब्रह्मानंद जाधव | Updated: May 20, 2023 18:50 IST

अत्यल्प भावामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात

ब्रह्मानंद जाधव, बुलढाणा : टोमॅटोला मिळणाऱ्या अत्यल्प भावामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात आहेत. शेतकरी मरणाच्या दारात मात्र सरकार बघ्याची भूमिका घेते. आत्महत्या केल्यावर लाख रुपयांचा चेक घेऊन फोटो काढल्यापेक्षा आत्महत्या करू नये, म्हणून आधीच काही पॅकेज द्यावे. शेतकरी टिकला, तर राज्य टिकेल, देश टिकेल असे मत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केले.

त्या बुलढाणा येथील विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर, मुधकर शिंगणे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. मधुकर शिंगणे यांनी दोन एकर शेतात टोमॅटो पीक घेतले. त्यांना एक किलोचा उत्पादन खर्च ८ ते १० रुपये आला. त्यानुसार जवळपास २ लाख रुपये उत्पादन खर्च आला आहे. परंतू आजरोजी टोमॅटोला मातीमोल भाव मिळत असल्याची खंत दिशा पिंकी शेख यांनी यावेळी व्यक्त केली. भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात आहेत. शेतात पानापेक्षा टोमॅटो जास्त आहेत. शेतात उभे असलेले हे पीक म्हणजे पोटच्या लेकरासारखे आहे, ते जर असे मरत असेल, तर त्या शेतकऱ्याची काय अवस्था होत असेल.

सध्या मात्र कष्टावर माती पडल्याच्या भावनाही दिशा पिंकी शेख यांनी यावेळी व्यक्त केल्या. स्वतःच्या खुर्चीचे चार पाय टिकावेत म्हणून सरकार काही करायला तयार आहेत. शेतकऱ्यांचा माल मुंबईपर्यंत जाऊ शकतो, त्यासाठी रेल्वेमध्ये दोन डबे कोल्ड स्टोरेज करण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. भाजीपाल्याला हमीभावाच्या कक्षेत घ्यावे, असा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला.

टोमॅटोचे पार्सल मुख्यमंत्र्यांना पाठवणार - तुपकर

टोमॅटोला भाव मिळत नाही. भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत टोमॅटोचे पार्सल मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्या प्रमाणे सोयाबीन, मका, ज्वारी, तूर, कपाशी या पिकांना हमीभाव दिला जातो. त्या प्रमाणे भाजीपाला वर्गीय पिकांनाही हमीभाव द्यावा, से मत तुपकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :agricultureशेतीbuldhanaबुलडाणा