शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

ग्रामीण अर्थव्यवस्था विकसित झाल्यास रोजगार उपलब्ध होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:31 IST

बुलडाणा : ‘ग्रामीण क्षेत्राकडे सरकारने विशेष लक्ष द्यावे, जेणेकरून ग्रामीण अर्थव्यवस्था विकसित होऊन त्या भागातील युवकांना त्यांच्या गावातच रोजगार ...

बुलडाणा : ‘ग्रामीण क्षेत्राकडे सरकारने विशेष लक्ष द्यावे, जेणेकरून ग्रामीण अर्थव्यवस्था विकसित होऊन त्या भागातील युवकांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध होतील व ग्रामीण युवकांना स्वत:चे गाव, घर आणि कुटुंब सोडून रोजगाराकरिता शहरात जायची गरज पडणार नाही, असे प्रतिपादन संत गाडगे बाबा, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी केले. मॉडेल डिग्री कॉलेजच्या वाणिज्य विभागामार्फत, विद्यार्थ्यांकरिता आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय ई-सेमिनारमध्ये उद्घाटक व बीजभाषक म्हणून ते बोलत होते.

बुलडाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता ‘कोरोनानंतरच्या काळातील रोजगाराच्या संधी’ या एकदिवसीय ई-चर्चासत्राचे आयोजन मॉडेल डिग्री कॉलेजच्या वाणिज्य विभागाच्या वतीने करण्यात आले हाेते़

या ई-चर्चासत्राला उद्घाटक, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून संत गाडगे बाबा, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर हे होते. हे चर्चासत्र एकूण दोन सत्रांमध्ये विभागले गेले होते. प्रथम सत्राचे बीजभाषक म्हणून स्वतः कुलगुरू डॉ. चांदेकर होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे मानद संचालक डॉ. केदार ठोसर हे होते, तर द्वितीय सत्राचे बीजभाषक अमरावती विद्यापीठाचे वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉ. दिनेश निचित हे होते. दुसऱ्या सत्रामध्ये राज्याच्या विविध विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शोधनिबंध सादर केले. दुसऱ्या सत्रात एल.आर.टी. कॉलेज, अकोलामधील डॉ. वंदना मिश्रा या अध्यक्षस्थानी हाेत्या. शोधनिबंध सादरकर्त्यांचे मूल्यमापन करण्यासाठी राज्यस्तरीय कमिटीमध्ये एम.ई.एस. कॉलेज, मेहकरचे डॉ. उदय काळे व एस.पी.एम. कॉलेज, चिखलीचे डॉ. अनिल पुरोहित हे होते, तर महाविद्यालयीनस्तरीय कमिटीमध्ये मॉडेल डिग्री कॉलेजमधीलच डॉ. रूपाली हिवाळे, प्रा. मुरलीधर जाधव आणि प्रा. योगेश फासे हे होते. या चर्चासत्राच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे मानद संचालक डॉ. केदार ठोसर यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक प्रा. नरेंद्र नजरधने, सहसंयोजक प्रा. दीपक नन्हई, तर सचिव प्रा. दीपेंद्र परमार यांनी परिश्रम घेतले़