शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

वेळपडल्यास शेतकऱ्यांना घरपोच खत, बियाणे - नरेंद्र नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 18:12 IST

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांच्याशी साधलेला संवाद...

-  ब्रह्मानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्ककोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन आहे. सध्या हा काळ अत्यंत अडचणीचा असला तरी, खरीप हंगामाची तयारी सुरळीत सुरू आहे. खरीपातील सरासरी पिकांचे नियोजनही पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सर्व नियमांचे पालन करून पेरणीपूर्व कामे करावी. वेळपडल्यास शेतकºयांना घरपोच खत व बी-बियाणे पोहचविण्यात येतील, याबाबत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांच्याशी साधलेला संवाद...

लॉकडाउनचा खत, बियाणे पुरवठ्यावर परिणाम होइल का?लॉकडाउनमुळे खत व बियाणे पुरवठ्याबाबत काहीही परिणाम होणार नाही. खत निर्मितीचे सर्व युनिट सध्या सुरू ठेवण्यात आले आहेत. शेतकºयांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे उपलब्ध आहे. बियाण्याप्रमाणेच आवश्यक असलेल्या खतांच्या पुरवठ्याबाबतही नियोजन करण्यात आले आहे.

उत्पादन वाढीसाठी काय नियोजन आहे?गटशेतीच्या माध्यमातून उत्पन्नाचे लक्ष गाठू शकतो. गेल्या काही वर्षात ज्या भागात उत्पादन कमी झाले, अशी कमी उत्पादकता असलेली गावे निवडली आहेत. सोयाबीन, कापूस याप्रकारे जो पेरा कमी आहे, याकडेही विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. शेती शाळेच्या माध्यमातून शेतकºयांना मार्गदर्शन करून उत्पादन वाढीच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येतील.

लॉकडाउनमध्ये कृषी विभाग शेतकºयांशी जोडलेला आहे का?खरीपाच्या पेरणीबाबात कुठलीही माहिती शेतकºयांना एसएमएसद्वारे पोहचविण्यात येत आहे. त्यामुळे लॉकडाउनमध्येही कृषी विभाग शेतकºयांशी जोडलेला आहे. गावागावातील कृषी सेवा केंद्रावरून त्यांच्या संपर्कातील ग्राहकांना व त्या गावातील सर्वच शेतकºयांना खत, बियाण्याची घरपोच सेवा देता येईल.

पिकांचे नियोजन कसे आहे?जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांचे नियोजन ७ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर करण्यात आले आहे. सोयाबीन पिकाचे नियोजन ३ लाख ७१ हजार हेक्टर, कापूस २ लाख १० हजार हेक्टर, मका २६ हजार हेक्टर, तूर ७८ हजार हेक्टर, मूग २० हजार हेक्टर, उडीद ३१ हजार ४०० हेक्टर व उर्वरीत क्षेत्रावर इतर पेरा राहणार आहे.

महाबिजचे नियोजन काय आहे?महाबिजकडून बियाणे देण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. सोयाबीनचे २४ हजार क्विंटल बियाण्याचा पुरवठा महाबिजकडून होत आहे.शेतकºयांना घरपोच सेवा देण्याची वेळ आल्यास तसे नियोजन करण्यात आले आहे. गावागावातील कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून खत, बियाणे पुरवठ्याबाबत अंमलबजावणी करता येईल. शेतकºयांना खरीप हंगामातील पेरणीसाठी कुठलीही अडचण येणार नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीinterviewमुलाखत