शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

हमालांच्या संपामुळे तुरीची हर्रासी दिवसभर बंद!

By admin | Updated: April 18, 2017 01:01 IST

शेतकऱ्यांचा रास्ता रोको, कार्यालयाच्या काचा फोडल्या

नांदुरा : हमालांनी रात्री व्यापाऱ्यांची तूर एफसीआयच्या पोत्यात भरताना सहा दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी पकडल्यानंतर बाजार समितीने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून काही हमालांची पोलिसांनी चौकशी केली त्याचा प्रतीकार करण्यासाठी हमालांनी अचानक सोमवारी सकाळीच एफसीआय व नियमित हर्रासी बंद पाडली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले व त्यांनी दुपारी चार वाजेदरम्यान नांदुरा-बुलडाणा रोडवर बाजार समितीसमोर बसून आंदोलन केल्याने रस्ता बंद झाला तर काही अज्ञातांनी कार्यालयातील काचा फोडल्या. अखेर पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने संध्याकाळी शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एफसीआयची तूर खरेदी सुरू असून, मागील महिन्यातील २० मार्चला आलेल्या मालाची मोजणी सुरू आहे. आधीच या खरेदीत गैरव्यवहार व शेतकऱ्यांना डावलून व्यापाऱ्यांच्या मालाची खरेदी होत असल्याचे शेतकऱ्यांनी सिद्ध केल्यानंतरही ११ एप्रिलच्या रात्री काही हमालांना व्यापाऱ्यांचा माल भरताना रंगेहात शेतकऱ्यांनी पकडले. त्यावरील तक्रारीवरून काही हमालांची पोलिसांनी चौकशी केली. आता हमाल संघटनेने यापूर्वीही १३ एप्रिलला आंदोलन करून हर्रासी व शासकीय खरेदी बंद पाडली होती. १७ एप्रिलला हमाल संघटनेने तहसीलदार, पोलीस स्टेशन, सहायक निबंधक आदींना निवेदन देऊन त्यांनी पोलीस चौकशीत ज्यांची नावे सांगितली त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, असे निवेदन देऊन मोजणी केलीच नाही. त्यामुळे हर्रासी व शासकीय तूर खरेदी बंद पडली. मागील चाळीस दिवसांपासून बाजार समितीत तूर विक्रीसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांचा या सर्व प्रकारामुळे संताप अनावर झाला, त्यांनी बाजार समिती अधिकारी व पदाधिकारी यांना धारेवर धरले. तुरीची आजही मोजणी होणार नाही, यामुळे संतप्त झालेले सर्व शेतकरी नांदुरा-बुलडाणा रोडवर जावून बसले, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तासाभरासाठी ठप्प झाली होती. काही अज्ञातांनी बाजार समितीच्या कार्यालयातील खिडकीच्या काचा फोडल्या व खुर्च्या फेकल्या. नांदुरा पोलिसांनी यावेळी संतप्त शेतकऱ्यांना २४ तासात सर्व चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याने तणाव निवडला; मात्र चाळीस दिवसांपासून पडून असलेली तुरीची मोजणी केव्हा होणार व एफसीआयच्या खरेदीतील सावळा गोंधळ व गैरव्यवहार दाबण्याचा प्रशासन का प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांचा माल विकणाऱ्यांना प्रशासन का पाठीशी घालत आहेत व हे प्रकरण दाबण्याचा कोण प्रयत्न करीत आहे, याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे, तर ग्रेडर खर्चे यांना का अभय दिल्या जाते, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांचा आहे. तुरीच्या खरेदीतील हेराफेरी व गैरव्यवहार करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी शेतकरी व हमाल संघटनेची आहे. शेतकऱ्यांना नाहक हेलपाटेएफसीआयला तूर विक्री करणारे शेतकरी मागील चाळीस दिवसांपासून बाजार समितीत ठाण मांडून आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर एफसीआयच्या तूर खरेदीतील गौडबंगाल, गैरव्यवहार व हेराफेरी पाहून ते संतप्त झाले आहेत. रात्रीच्या अंधारातील व्यापाऱ्यांची तूर खरेदीचा त्यांनी पर्दाफाश केला. त्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार झाली; मात्र कारवाई झाली नाही. आता हमालांनीही निवेदन देऊन कारवाईची मागणी करून हर्रासी व शासकीय खरेदी बंद पाडली.