शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

कामगार दिनीच कामगारांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:11 IST

रोजगारासाठी वनवन भटकणाऱ्या दुर्गम भागातील नागरिकांना लॉयड मेटलच्या माध्यमातून रोजगाराचे साधन उपलब्ध झाले होते. मात्र एटापल्लीजवळ झालेल्या अपघातानंतर लोहखनिज उत्खननाचे काम बंद पडले. त्यामुळे या ठिकाणी काम करीत असलेल्या शेकडो मजुरांचा रोजगार बंद झाला आहे.

ठळक मुद्देशेकडो मजुरांवर बेरोजगारीचे संकट : साडेतीन महिन्यांपासून सुरजागड येथील काम बंद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रोजगारासाठी वनवन भटकणाऱ्या दुर्गम भागातील नागरिकांना लॉयड मेटलच्या माध्यमातून रोजगाराचे साधन उपलब्ध झाले होते. मात्र एटापल्लीजवळ झालेल्या अपघातानंतर लोहखनिज उत्खननाचे काम बंद पडले. त्यामुळे या ठिकाणी काम करीत असलेल्या शेकडो मजुरांचा रोजगार बंद झाला आहे. रोजगार मिळण्यासाठी काम पुन्हा सुरू करावे, यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.लॉयड मेटल्स अ‍ँड एनर्जी लिमिटेड या कंपनीद्वारे सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाचे काम सुरु होते. या कामावर शेकडो मजूर काम करीत होते. परंतु १६ जानेवारीला गुरुपल्ली गावाजवळ लोहखनिज वाहतूक करणाºया एका ट्रकने बसला चिरडल्याने चार जण ठार झाले. या अपघातानंतर अचानक लोहखनिज उत्खननाचे काम बंद करण्यात आले. यामुळे शेकडो मजुरांच्या हातचे काम हिरावले गेले. त्यानंतर काम सुरु करण्यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना मजुरांनी एक पत्र दिले होते. काम सुरु न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही मजुरांनी दिला होता. परंतु प्रशासनाने दखल न घेतल्याने अनेक मजुरांनी ५ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे साखळी उपोषण आरंभिले होते. दोन दिवसांनतर काम पूर्ववत सुरु करण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते.परंतु साडेतीन महिने उलटूनही काम सुरु न झाल्याने उत्खननाच्या कामावरील मजूर, ट्रक व ट्रॅक्टरचालक आणि त्यावरील कामगारांना बेरोजगारीला तोंड द्यावे लागत असून, ते आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यामुळे उत्खननाचे काम तत्काळ सुरु करावे, अशी मागणी स्थानिक मजुरांनी केली आहे.गडचिरोली जिल्हा आधीच उद्योगविरहीत असून, लॉयड मेटल्स कंपनीच्या माध्यमातून कोनसरी येथे उद्योग सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला होता. ज्या शेतकºयांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेशांचे वाटपही करण्यात आले होते. परंतु अपघातातनंतर काही राजकीय मंडळींनी उत्खननाचे काम बंद करण्यास भाग पाडल्याने मजुरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उत्खनन तत्काळ सुरु न झाल्यास सुरजागड या महत्वाकांक्षी प्रकल्पाला जिल्हावासीयांना मुकावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.