शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भूखंडाची शेकडो प्रकरणे रडारवर!

By admin | Updated: October 16, 2016 02:21 IST

प्लॉट खरेदीदारांसह शासनाचीही फसवणूक; आरक्षित भूखंडाचीही विक्री

चिखली, दि. १५- बनावट अकृषक आदेश तयार करून भूखंडाची विक्री केल्याप्रकरणी १९ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल झाल्यानंतर सन २00९ ते २0१३ या कालावधीतील सर्व एनए आदेशाची चौकशी प्रशासनाने हाती घेतली आहे. ही चौकशी प्राथमिक टप्प्यात असतानाच यातून शेकडो बोगस प्रकरणांची उकल झाली असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर हा आकडा हजाराचा टप्पा ओलांडणारच यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, या चौकशीतून शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून भूखंडमाफियांनी केलेल्या गैरव्यवहाराची एक-एक प्रकरण बाहेर येत असून गैरमार्गाने आरक्षित भूखंडाचीही विक्री करून गडगंज संपत्ती जमविणार्‍यांनी प्लॉट खरेदी करणार्‍यांसह शासनालाही लाखो रुपयांचा चुना लावला असल्याचे निष्पन्न झाले आहे. उपविभागीय अधिकार्‍यांच्या बनावट स्वाक्षरी व शिक्यानिशी अकृषक आदेश तयार केल्याप्रकरणी चिखलीतील १६ शेतमालकांसह तत्कालीन नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठय़ावर महसूल विभागाने मोठी कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल केल्यानंतर १ जानेवारी २00९ ते ३१ मे २0१३ या काळातील सर्व एनए आदेशाची चौकशी सुरू झाली असल्याने या कालावधीत एनए झालेल्या भूखंडाच्या (प्लॉट) खरेदी विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे. दरम्यान, चौकशीला नेमकी सुरुवात झाली असतानाच चिखलीतील सुमारे ४५0 एनएची प्रकरणे बोगस असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. चिखली शहराकडे शैक्षणिक, व्यावसायिक व इतर सोयी-सुविधांच्या दृष्टीने नागरिकांचा ओढा वाढला आहे. इथे वास्तव्यासाठी स्वत:चे घर हवे, या भावनेतून तसेच जमीन खरेदीतून सहसा तोटा होत नसल्याने प्लॉटच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर फोफावला. भूखंड माफिया सक्रिय झाले आणि शेतकर्‍यांना मोठ-मोठय़ा रकमेचे आमिष दाखवून त्यांनी वहितीखाली असलेल्या शेती प्लॉटिंग टाकून त्याच्या विक्रीचा सपाटा लावला; मात्र या वहितीखाली असलेल्या जमीनीला अकृषक आदेश असल्याशिवाय विक्री करता येणे शक्य नसल्याने, भूखंड माफियांनी स्थानिक पातळीवरून थेट उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचार्‍यांना हाताशी धरून बनावट एनए ऑर्डर तयार करून शहरासह परिसरातील अनेक प्लॉटची विक्री केली आहे. यातीलच १९ प्रकरणांचा छडा लागल्यानंतर आता सुमारे ४५0 प्रकरणांचा पर्दाफाश होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकरणांमध्ये वहितीखाली असलेल्या जमीनीच्या एनए आदेशासाठी संबंधित कार्यालयाकडे साधा अर्जदेखील सादर केलेला नाही. ही प्रकरणे विना अर्जाचीच अकृषक झाली कशी, हा कळीचा मुद्दा आहे.