शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

मानवाच्या उपभोगाच्या वर्तनात सुधारणा आवश्यक : माहोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:39 IST

चिखली : पृथ्वीतलावरील मानवाच्या उपभोगाच्या वर्तनात सुधारणा झाली तरच पर्यावरणाचा ऱ्हास कमी होऊन जगाचा शाश्वत विकास होईल आणि येणाऱ्या ...

चिखली : पृथ्वीतलावरील मानवाच्या उपभोगाच्या वर्तनात सुधारणा झाली तरच पर्यावरणाचा ऱ्हास कमी होऊन जगाचा शाश्वत विकास होईल आणि येणाऱ्या पिढ्यांना पाणी, गॅस, तेल इत्यादी नैसर्गिक संसाधनाचा उपयोग घेता येईल, असे मत डॉ. आर. वाय. माहोरे यांनी व्यक्त केले.

स्थानिक श्रीशिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त महाराष्ट्रातील ख्यातनाम अर्थतज्ज्ञ तथा नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. आर. वाय. माहोरे हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉ. ओमराज एस. देशमुख होते. डॉ. देशमुख यांनी भारतातील वाढती लोकसंख्या आणि दारिद्र्य, गरिबी, बेकारी या प्रश्नाकडे लक्ष वेधून आर्थिक विकास आणि शिक्षणाच्या दर्जात वाढ होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करून जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व विषद केले. प्रास्ताविक डॉ. वनिता पोच्छी, तर परिचय, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनीता कलाखे दिला. डॉ. माहोरे यांचे ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या या व्याख्यानाला प्रा. रामदास भांडवलकर, यवतमाळ, डॉ. संजय महाजन, नागपूर, डॉ. दिलीप महाजन, डॉ. प्रदीप बारड, प्रा. विजय वाकोडे, चिखली, डॉ. आरती खडतकर, डॉ. महेश रिठे, बुलडाणा यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी संख्येने सहभाग नोंदविला. संचालन प्रा. डॉ. अनुराधा मुळे यांनी, तर आभार प्रा. धनंजय भोयर यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. अनिल गारोडे, डॉ. सोनाली गायकवाड, प्रा. दिलीप गावंडे, प्रा. मुकुंद कोलते, डॉ. अंकित काळे यांनी परिश्रम घेतले.