शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

आंदोलनकर्त्यांपैकी किती लोक सातबाराधारक?

By admin | Updated: July 14, 2017 00:45 IST

नावे जाहीर करण्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मला कर्ज माफी मिळाली, असे फलक घेऊन आंदोलन करणाऱ्यांपैकी किती जणांच्या नावावर शेतीचा सात-बारा आहे व त्यापैकी किती जणांना कर्ज माफी मिळाली आहे, असा सवाल आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी व्टिटरद्वारे उपस्थित केला असून, जिल्हा भाजपाने कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांच्या मेळाव्याची तारीख जाहीर करावी, असेही आवाहन केले आहे. माझी कर्ज माफी झाली नाही, या विषयावर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्यावतीने बुलडाण्यापासून राज्यस्तरीय ‘एल्गार’ पुकारला. कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बुलडाण्यातून या आंदोलनाचा बिगूल वाजला. त्यावेळी या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या प्रदेश अध्यक्षांच्या वाहन ताफ्यासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मला कर्जमाफी मिळाली, असे फलक दर्शवित घोषणाबाजी केली होती.दरम्यान, गुरुवारला आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी व्टिटरद्वारे भाजप आंदोलनातल्या बोर्ड हाती घेतलेल्या कार्यकर्त्यांपैकी कितींच्या नावावर सात-बारा आहे व त्यापैकी किती जणांची कर्जमाफी झाली आहे, नावे जाहीर करावे, असे व्टिट केले आहे. सोबतच दुसऱ्या एका व्टिटमध्ये मला कर्जमाफी मिळाली, असे फलक मिरवणाऱ्या बुलडाणा जिल्हा भाजपने कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांचा त्वरित मेळावा आयोजित करून मेळाव्याची तारीख जाहीर करण्याचे आवाहनसुद्धा आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. पोलीस कारवाईस सामोरे जाण्यास तयार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याबाबत बोलताना आ. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, गुन्हे दाखल झाल्याचे कळल्यानंतर नियोजित दौऱ्यानुसार, प्रदेश अध्यक्षांसोबत शेगाव येथे न जाता स्वत:ला अटक करून घेण्याकरिता आपण थेट बुलडाणा पोलीस स्टेशन गाठले होते. आपल्यावरील आरोप हे गंभीर स्वरूपाचे असून, दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने मला अटक करावी, अशी मागणी केली होती. तथापि पोलीस प्रशासनाने चौकशी, पुरावे व गुन्ह्यांचे स्वरूप लक्षात घेता अटक करण्यास असमर्थता दर्शविली. आरोपांबद्दल विचारले असता, सार्वजनिक जीवनात काम करताना आया-बहिणी, लेकी-बाळी जर असे गंभीर आरोप करीत असतील तर हा विषय बोलण्यापलीकडचा असल्याचेसुद्धा आ. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. तसेच फिर्यादींनी व्यक्तीश: केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने पुरावे पोलिसांना सादर करावे. त्या अधारावर आपल्यावर होणाऱ्या पोलीस कार्यवाहीस आपण तयार असल्याचेसुद्धा आ. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. शांतता व सलोखा कायम रहावा, ही भारतीय संविधानाचा एक पाईक व भारतीय नागरिक म्हणून आपली नेहमी भूमिका असते. जयस्तंभ चौकात एकीकडे हजारोच्यावर काँग्रेस कार्यकर्ते व दुसरीकडे भाजपाचे मोजके निदर्शनकर्ते तसेच अत्यल्प पोलीस बळ लक्षात घेता उद्भवणारी संभाव्य परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, त्याकरिताच आपण तिथे थांबून कार्यकर्त्यांना शांततेने कार्यक्रमाच्या ठिकाणी जावे, ही भूमिका पार पाडल्याचे सर्वश्रुत आहे, असे सुद्धा आ. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.