शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आंदोलनकर्त्यांपैकी किती लोक सातबाराधारक?

By admin | Updated: July 14, 2017 00:45 IST

नावे जाहीर करण्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मला कर्ज माफी मिळाली, असे फलक घेऊन आंदोलन करणाऱ्यांपैकी किती जणांच्या नावावर शेतीचा सात-बारा आहे व त्यापैकी किती जणांना कर्ज माफी मिळाली आहे, असा सवाल आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी व्टिटरद्वारे उपस्थित केला असून, जिल्हा भाजपाने कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांच्या मेळाव्याची तारीख जाहीर करावी, असेही आवाहन केले आहे. माझी कर्ज माफी झाली नाही, या विषयावर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्यावतीने बुलडाण्यापासून राज्यस्तरीय ‘एल्गार’ पुकारला. कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बुलडाण्यातून या आंदोलनाचा बिगूल वाजला. त्यावेळी या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या प्रदेश अध्यक्षांच्या वाहन ताफ्यासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मला कर्जमाफी मिळाली, असे फलक दर्शवित घोषणाबाजी केली होती.दरम्यान, गुरुवारला आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी व्टिटरद्वारे भाजप आंदोलनातल्या बोर्ड हाती घेतलेल्या कार्यकर्त्यांपैकी कितींच्या नावावर सात-बारा आहे व त्यापैकी किती जणांची कर्जमाफी झाली आहे, नावे जाहीर करावे, असे व्टिट केले आहे. सोबतच दुसऱ्या एका व्टिटमध्ये मला कर्जमाफी मिळाली, असे फलक मिरवणाऱ्या बुलडाणा जिल्हा भाजपने कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांचा त्वरित मेळावा आयोजित करून मेळाव्याची तारीख जाहीर करण्याचे आवाहनसुद्धा आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. पोलीस कारवाईस सामोरे जाण्यास तयार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याबाबत बोलताना आ. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, गुन्हे दाखल झाल्याचे कळल्यानंतर नियोजित दौऱ्यानुसार, प्रदेश अध्यक्षांसोबत शेगाव येथे न जाता स्वत:ला अटक करून घेण्याकरिता आपण थेट बुलडाणा पोलीस स्टेशन गाठले होते. आपल्यावरील आरोप हे गंभीर स्वरूपाचे असून, दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने मला अटक करावी, अशी मागणी केली होती. तथापि पोलीस प्रशासनाने चौकशी, पुरावे व गुन्ह्यांचे स्वरूप लक्षात घेता अटक करण्यास असमर्थता दर्शविली. आरोपांबद्दल विचारले असता, सार्वजनिक जीवनात काम करताना आया-बहिणी, लेकी-बाळी जर असे गंभीर आरोप करीत असतील तर हा विषय बोलण्यापलीकडचा असल्याचेसुद्धा आ. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. तसेच फिर्यादींनी व्यक्तीश: केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने पुरावे पोलिसांना सादर करावे. त्या अधारावर आपल्यावर होणाऱ्या पोलीस कार्यवाहीस आपण तयार असल्याचेसुद्धा आ. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. शांतता व सलोखा कायम रहावा, ही भारतीय संविधानाचा एक पाईक व भारतीय नागरिक म्हणून आपली नेहमी भूमिका असते. जयस्तंभ चौकात एकीकडे हजारोच्यावर काँग्रेस कार्यकर्ते व दुसरीकडे भाजपाचे मोजके निदर्शनकर्ते तसेच अत्यल्प पोलीस बळ लक्षात घेता उद्भवणारी संभाव्य परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, त्याकरिताच आपण तिथे थांबून कार्यकर्त्यांना शांततेने कार्यक्रमाच्या ठिकाणी जावे, ही भूमिका पार पाडल्याचे सर्वश्रुत आहे, असे सुद्धा आ. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.