शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील केवळ चार जिल्ह्यात फलोत्पादन कार्यक्रम!

By admin | Updated: December 25, 2016 02:22 IST

राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी ९ कोटी ८४ लाख ८२ हजार रुपये

ब्रम्हानंद जाधवबुलडाणा, दि. २४- रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात राबविण्यात येणारा फलोत्पादन कार्यक्रम विदर्भातील अकोला, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या चार जिल्ह्यात पोहचला आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी ९ कोटी ८४ लाख ८२ हजार रुपये निधी फळलागवडसाठी मंजूर करण्यात आला असून, यामध्ये विदर्भातील चार जिल्ह्यांचा समावेश आहे. पारंपारिक पिकांना फाटा देवून शेतीत आधुनिकीरण आणण्यासाठी शेतकर्‍यांना आर्थिक साहाय्याची गरज असते. फळलागवडसारख्या पिकांमुळे शेतकर्‍यांचा विकास साधला जावू शकतो. त्यामुळे रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात फळलागड कार्यक्रम राबविण्यात येतो. फलोत्पादनासाठी रोहयोकडून शेतकर्‍यांना निधीही देण्यात येतो; यामध्ये राज्यातील जवळपास १७ जिल्ह्यांमध्ये फळलागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विदर्भातील केवळ चारच जिल्ह्यांचा रोहयोच्या फलोत्पादन कार्यक्रमात समावेश असून इतर जिल्हे या फलोत्पादनापासून दूर आहेत. राज्यातील रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, परभणी, अकोला, पालघर, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, अहमदनगर, बीड, नांदेड, लातूर, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येतो. सन २0१५-१६ व २0१६-१७ या दोन वर्षासाठी राज्यातील ११ जिल्ह्यांकरिता एकूण ९ कोटी ८४ लाख ८२ हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यासाठी २७ लाख ७६ हजार रुपये, रत्नागिरी ३१ लाख ३५ हजार, नाशिक १ कोटी ६४ लाख १३ हजार, धुळे २९ लाख ९0 हजार, परभणी ३८ लाख ९३ हजार, अकोला जिल्ह्याकरिता ६६ लाख ७0 हजार, पालघर, ५१ लाख ४६ हजार, सोलापूर १ कोटी ५ लाख ७५ हजार, कोल्हापूर १३ लाख ५१ हजार, जळगाव २३ लाख ७८ हजार, अहमदनगर १ कोटी ६१ लाख २ हजार, बीड ६४ लाख ५२ हजार, नांदेड ३७ लाख ६ हजार, लातूर २५ लाख, यवतमाळ ५५ लाख १४ हजार, बुलडाणा २0 लाख २७ हजार व अमरावती जिल्ह्याकरिता ६८ लाख ५४ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. रोहयोमुळे फळलागवडीला संजीवनीफळलागडीसाठी लागणारा खर्च शेतकरी भरू शकत नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी सिंचनाची व्यवस्था असतांनाही फळगावडीकडे पाठ फिरवली होती; मात्र रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात फलोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत असल्याने फळलागवडीला संजिवनी मिळाली आहे. फळलागवडीसाठी रोहयोकडून निधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याने अनेक सर्वसामान्य शेतकरी या योजनेतून फळलगावडीकडे वळले आहेत.