शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

विदर्भातील केवळ चार जिल्ह्यात फलोत्पादन कार्यक्रम!

By admin | Updated: December 25, 2016 02:22 IST

राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी ९ कोटी ८४ लाख ८२ हजार रुपये

ब्रम्हानंद जाधवबुलडाणा, दि. २४- रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात राबविण्यात येणारा फलोत्पादन कार्यक्रम विदर्भातील अकोला, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या चार जिल्ह्यात पोहचला आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी ९ कोटी ८४ लाख ८२ हजार रुपये निधी फळलागवडसाठी मंजूर करण्यात आला असून, यामध्ये विदर्भातील चार जिल्ह्यांचा समावेश आहे. पारंपारिक पिकांना फाटा देवून शेतीत आधुनिकीरण आणण्यासाठी शेतकर्‍यांना आर्थिक साहाय्याची गरज असते. फळलागवडसारख्या पिकांमुळे शेतकर्‍यांचा विकास साधला जावू शकतो. त्यामुळे रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात फळलागड कार्यक्रम राबविण्यात येतो. फलोत्पादनासाठी रोहयोकडून शेतकर्‍यांना निधीही देण्यात येतो; यामध्ये राज्यातील जवळपास १७ जिल्ह्यांमध्ये फळलागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विदर्भातील केवळ चारच जिल्ह्यांचा रोहयोच्या फलोत्पादन कार्यक्रमात समावेश असून इतर जिल्हे या फलोत्पादनापासून दूर आहेत. राज्यातील रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, परभणी, अकोला, पालघर, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, अहमदनगर, बीड, नांदेड, लातूर, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येतो. सन २0१५-१६ व २0१६-१७ या दोन वर्षासाठी राज्यातील ११ जिल्ह्यांकरिता एकूण ९ कोटी ८४ लाख ८२ हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यासाठी २७ लाख ७६ हजार रुपये, रत्नागिरी ३१ लाख ३५ हजार, नाशिक १ कोटी ६४ लाख १३ हजार, धुळे २९ लाख ९0 हजार, परभणी ३८ लाख ९३ हजार, अकोला जिल्ह्याकरिता ६६ लाख ७0 हजार, पालघर, ५१ लाख ४६ हजार, सोलापूर १ कोटी ५ लाख ७५ हजार, कोल्हापूर १३ लाख ५१ हजार, जळगाव २३ लाख ७८ हजार, अहमदनगर १ कोटी ६१ लाख २ हजार, बीड ६४ लाख ५२ हजार, नांदेड ३७ लाख ६ हजार, लातूर २५ लाख, यवतमाळ ५५ लाख १४ हजार, बुलडाणा २0 लाख २७ हजार व अमरावती जिल्ह्याकरिता ६८ लाख ५४ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. रोहयोमुळे फळलागवडीला संजीवनीफळलागडीसाठी लागणारा खर्च शेतकरी भरू शकत नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी सिंचनाची व्यवस्था असतांनाही फळगावडीकडे पाठ फिरवली होती; मात्र रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात फलोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत असल्याने फळलागवडीला संजिवनी मिळाली आहे. फळलागवडीसाठी रोहयोकडून निधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याने अनेक सर्वसामान्य शेतकरी या योजनेतून फळलगावडीकडे वळले आहेत.