शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील केवळ चार जिल्ह्यात फलोत्पादन कार्यक्रम!

By admin | Updated: December 25, 2016 02:22 IST

राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी ९ कोटी ८४ लाख ८२ हजार रुपये

ब्रम्हानंद जाधवबुलडाणा, दि. २४- रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात राबविण्यात येणारा फलोत्पादन कार्यक्रम विदर्भातील अकोला, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या चार जिल्ह्यात पोहचला आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी ९ कोटी ८४ लाख ८२ हजार रुपये निधी फळलागवडसाठी मंजूर करण्यात आला असून, यामध्ये विदर्भातील चार जिल्ह्यांचा समावेश आहे. पारंपारिक पिकांना फाटा देवून शेतीत आधुनिकीरण आणण्यासाठी शेतकर्‍यांना आर्थिक साहाय्याची गरज असते. फळलागवडसारख्या पिकांमुळे शेतकर्‍यांचा विकास साधला जावू शकतो. त्यामुळे रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात फळलागड कार्यक्रम राबविण्यात येतो. फलोत्पादनासाठी रोहयोकडून शेतकर्‍यांना निधीही देण्यात येतो; यामध्ये राज्यातील जवळपास १७ जिल्ह्यांमध्ये फळलागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विदर्भातील केवळ चारच जिल्ह्यांचा रोहयोच्या फलोत्पादन कार्यक्रमात समावेश असून इतर जिल्हे या फलोत्पादनापासून दूर आहेत. राज्यातील रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, परभणी, अकोला, पालघर, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, अहमदनगर, बीड, नांदेड, लातूर, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येतो. सन २0१५-१६ व २0१६-१७ या दोन वर्षासाठी राज्यातील ११ जिल्ह्यांकरिता एकूण ९ कोटी ८४ लाख ८२ हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यासाठी २७ लाख ७६ हजार रुपये, रत्नागिरी ३१ लाख ३५ हजार, नाशिक १ कोटी ६४ लाख १३ हजार, धुळे २९ लाख ९0 हजार, परभणी ३८ लाख ९३ हजार, अकोला जिल्ह्याकरिता ६६ लाख ७0 हजार, पालघर, ५१ लाख ४६ हजार, सोलापूर १ कोटी ५ लाख ७५ हजार, कोल्हापूर १३ लाख ५१ हजार, जळगाव २३ लाख ७८ हजार, अहमदनगर १ कोटी ६१ लाख २ हजार, बीड ६४ लाख ५२ हजार, नांदेड ३७ लाख ६ हजार, लातूर २५ लाख, यवतमाळ ५५ लाख १४ हजार, बुलडाणा २0 लाख २७ हजार व अमरावती जिल्ह्याकरिता ६८ लाख ५४ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. रोहयोमुळे फळलागवडीला संजीवनीफळलागडीसाठी लागणारा खर्च शेतकरी भरू शकत नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी सिंचनाची व्यवस्था असतांनाही फळगावडीकडे पाठ फिरवली होती; मात्र रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात फलोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत असल्याने फळलागवडीला संजिवनी मिळाली आहे. फळलागवडीसाठी रोहयोकडून निधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याने अनेक सर्वसामान्य शेतकरी या योजनेतून फळलगावडीकडे वळले आहेत.