शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

फलोत्पादन अभियानाची अर्ज प्रक्रिया गोंधळात; शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 17:24 IST

- ओमप्रकाश देवकर हिवरा आश्रम : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यात येत असून त्यामध्ये विविध घटकांकरिता लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. मात्र फलोत्पादन अभियानाच्या अर्जा संबंधिच्या मार्गदर्शक सूचना वेळेवर आल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. ...

ठळक मुद्देफलोत्पादन अभियानाच्या अर्जा संबंधिच्या मार्गदर्शक सूचना वेळेवर आल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. कृषी विभागाकडून पुर्वी फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत विविध घटकासाठी कृषी कार्यालयात शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारल्या जात होते. मात्र गेल्या काही वर्षापासून या योजनासाठी अर्ज आॅनलाईन पध्दतीने स्वीकारल्या जात आहेत.

- ओमप्रकाश देवकर

 हिवरा आश्रम : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यात येत असून त्यामध्ये विविध घटकांकरिता लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. मात्र फलोत्पादन अभियानाच्या अर्जा संबंधिच्या मार्गदर्शक सूचना वेळेवर आल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. आॅनलाईन अर्जासाठी २० जून ही अंतमी मुदत असून अर्ज करण्याच्या माहितीअभावी शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कृषी विभागाकडून पुर्वी फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत विविध घटकासाठी कृषी कार्यालयात शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारल्या जात होते. मात्र गेल्या काही वर्षापासून या योजनासाठी अर्ज आॅनलाईन पध्दतीने स्वीकारल्या जात आहेत. कृषी कार्यालयात या कामासाठी क्षेत्र सल्लागार म्हणून कंत्राटी कर्मचारी काम पाहत होते. मात्र शासनाने गेल्या वर्षीपासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना या पदावरून कायमचे कार्यमुक्त केले. यामुळे शेतकऱ्यांना बाहेरून आॅनलाईन अर्ज भरावे लागत आहे. यावर्षी बराचसा बदल या अर्ज करण्याच्या हॉर्टनेट प्रणालीमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. आतापर्यंत फक्त माहिती हॉर्टनेट प्रणालीवर भरल्या जात होती; पण २०१८-१९ पासून यामध्ये बदल करण्यात आले आहे. यामध्ये पुर्ण कागदपत्रे ही हॉर्टनेट प्रणालीवर अपलोड करावी लागत आहेत. शिवाय शासनाने हे संकेतस्थळ सुरू ठेवल्याने बºयाच शेतकऱ्यांनी एप्रिल व मे मध्ये आॅनलाईन नोंदणी केली. मात्र कृषी विभागाने एक पत्रक काढून १ ते २० जून पर्यंतची नोंदणी करण्यासाठी वेळ दिल्याने आणि हा वेळ अपूरा असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने हा वेळ वाढविण्यात यावा, ही मागणी शेतकºयांकडून होत आहे.

शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

एप्रिल व मे मध्ये आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार किंवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पुर्वी नोंदणी केलेल्या अर्जाची पुन्हा नोंदणी होत नाही. त्यामुळे पुर्वीच्या अर्जाना कागदपत्रे आॅनलाईन अपलोड करावी की, कसे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.

अर्जासाठी मुदतवाढीची गरज

सदर हॉर्टनेट प्रणालीवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सदर संकेतस्थळ बऱ्याच वेळा बंद राहते. ४ जूनपर्यंत अ‍ॅक्शन प्लॅन अपलोड नसल्याने शेतकऱ्यांना अर्ज भरता आले नाही. सदर अर्ज भरण्याकरीता मुदतवाढ मिळणे गरजेचे आहे. 

हॉर्टनेट म्हणजे काय?

हॉर्टनेट एक एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाची संगणक प्रणाली असून त्यावर या अभियानाअंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यात येतात. यामध्ये अळींबी उत्पादन, सामुहीक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट हाऊस, हरीतगृह, प्लास्टीक मल्चींग, फळबाग असणाºया शेतकऱ्यांना २० एचपी ट्रॅक्टर, पॅकहाऊस, कांदाचाळ उभारणी प्रकल्प अशा विविध घटकांसाठी शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी