शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

वृद्ध साहित्यिक, कलावंतांचे मानधन नोव्हेंबरपासून थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:32 IST

जिल्ह्यातील ९३६ वृद्ध साहित्यिक आणि कलावंताची जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे नोंद आहे. या कलावंतांकडून शासनाच्या विविध योजनांची जनजागृती करण्याचे ...

जिल्ह्यातील ९३६ वृद्ध साहित्यिक आणि कलावंताची जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे नोंद आहे. या कलावंतांकडून शासनाच्या विविध योजनांची जनजागृती करण्याचे काम सातत्याने केले जाते. मानधन दिले जाणाऱ्यांमध्ये वृद्ध साहित्यिक व कलावंतांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील कलावंत, साहित्यिक, राज्यस्तरावरील व जिल्हा स्तरावरील कलावंत, साहित्यिकांचा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यामधून जिल्हास्तरावरील वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन दिले जाते. पूर्वी हे मानधन जिल्हा परिषदेमार्फत दिले जात होते. मात्र, आता यामध्ये बदल झालेला आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांची यादी मंत्रालयाकडे पाठविण्यात येते. त्याठिकाणावरून हे मानधन कलावंतांना दिले जाते. परंतु, नोव्हेंबरपासून मानधन थकल्याने या कलावंतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मानधन किती (रुपये प्रतिमाह)

राष्ट्रीय पातळीवरील कलाकार, साहित्यिक - २,१०० रु.

राज्य पातळीवरील कलाकार, साहित्यिक - १८०० रु.

जिल्हा पातळीवरील कलाकार, साहित्यिक - १५०० रु.

मानधन दिले जाणारे जिल्हास्तरावरील कलावंत, साहित्यिक - ९३६

एकूण कलावंत, साहित्यिक- ७७८

--कोट--

कोरोनामुळे अनेक कार्यक्रम रद्द झाले. त्यामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. आता राज्य शासनाकडून दिले जाणारे मानधनही थकले आहे. त्यामुळे कलावंत वर्ग अडचणीत सापडला आहे.

हरिदास खांडेभराड, कलावंत

--कोट--

जिल्ह्यातील गरीब कलावंतांवर आलेली परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने मानधन तातडीने द्यावे. आज कलावंतांना पाहिजे तसे काम मिळत नाही. कलावंतांच्या समस्यांमध्ये वाढच होत आहे.

प्रमोद दांडगे, कलावंत

--कोट--

राज्य शासनाच्या वतीने वृद्ध साहित्यिक व कलावंतांना देण्यात येणारे मानधन रखडल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाकाळात कलावंतांना कामही मिळाले नाही. याकडे शासनाने लक्ष देऊन कलावंतांचे प्रश्न सोडवा.

दीपक सावळे, कलावंत

--कोट--

कलावंतांना मानधनाची प्रतीक्षा

जिल्ह्यात एकूण ९३६ लाभार्थ्यांपैकी ७७८ लाभार्थ्यांना मानधन दिले जाते. इतर लाभार्थी काही अडचणींमुळे मानधन बंद आहे. हे मानधनही वेळेवर मिळत नसल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहेत.