शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

लाभार्थींंना घरपोच धनादेशाचे वाटप

By admin | Updated: July 2, 2016 00:56 IST

‘आपल गाव आपला विकास’ उपक्रमाला लोणार तालुक्यात प्रतिसाद.

लोणार (जि. बुलडाणा) : 'आपले गाव आपला विकास; सुट्टीच्या दिवशीही कामकाज' या अभिनव उप्रकमानंतर सामाजिक बांधीलकी या नवीन अभिनव उपक्रमाला सुरुवात केली आहे. या उपक्रमाला १ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी नीलेश अपार यांच्या हस्ते लाभार्थींंना घरपोच धनादेशाद्वारे लाभ देऊन सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत १८ ते ५९ वयोर्मयादा असणार्‍या दारिद्रय़रेषेखालील लाभार्थींंना लाभ देण्यात येतो. शासनाने ही योजना १८ ऑक्टोबर २0१२ पासून सुरू केलेली असून, दारिद्रय़रेषेखालील कुटुंबातील कर्ता पुरुष अथवा स्त्री मृत्यू पावल्यास त्यांच्यासाठी या योजनेंतर्गत २0 हजार रुपये एवढी मदत दिली जाते. जनतेमध्ये शासनाच्या विशेष सहाय्य योजनांचा प्रसार व्हावा, योजनांचा लाभ तत्काळ मिळावा, या उद्देशाने शासन विविध माध्यमातून योजनांची जाहिरात करते. तसेच या योजना स्थानिक पातळीवर महसुली यंत्रणेमार्फत राबविण्यात येतात. मात्र शासनाच्या योजना जनजागृतीअभावी रखडल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. याची जाणीव होऊन तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी संबंधित कुटुंबास १५ दिवसांच्या आत सामाजिक बांधीलकी या उपक्रमांतर्गत घरपोच लाभ देण्यात येईल. म्हणजे लाभार्थीस कोणतेही कष्ट वा खर्च येणार नाही. यासाठी लाभार्थीस घटना घडल्यानंतर संबंधित गावच्या तलाठी किंवा तहसीलदार यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती द्यावी लागणार आहे.