शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

हमीदर केंद्रावर दोन लाख क्ंिवटल तूर पडून!

By admin | Updated: April 25, 2017 00:39 IST

सोमवारीही वजनकाटे राहिले बंद : मुदतीत आलेल्या तुरीच्या मोजमापाची प्रतीक्षा

गिरीश राऊत - खामगावकधी नव्हे ती विक्रमी तूर खरेदी करणाऱ्या जिल्ह्यातील हमीदराने तूर खरेदी केंद्र आवकसाठी बंदच झाली आहे, तर दिलेल्या मुदतीत या केंद्रावर आलेली १ लाख ९० हजार ४५६ क्ंिवटल तूर पडून आहे. रविवारी मोजमापाला सुटी राहत असल्याने सोमवारी मोजमाप सुरू होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; मात्र आदेश नसल्याचे कारणावरून मोजमाप दुसरे दिवशीसुद्धा बंदच राहिले. एकूणच अनेक दिवसांपासून या केंद्रावर तूर विक्रीस आणलेल्या शेतकऱ्यांमध्ये आपली तूर खरेदी केली जाईल किंवा नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. गतवर्षी ११ हजार रुपयांपर्यंत भाव पोहोचलेल्या तुरीचे उत्पादन घेऊन उत्पन्न मिळविण्याचे आशेने यावर्षी शेतकऱ्यांनी तुरीचा पेरा केला होता. सुदैवाने तूर पिकाला निसर्गाची सुद्धा साथ मिळाल्याने यावर्षी जिल्ह्यात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. मात्र नेहमी हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची यावर्षीही तुरीचे उत्पादन बऱ्यापैकी झाले असताना भाव पडल्याने कोंडी झाली. सुरुवातीपासून तर आतापर्यंतही तुरीचे भाव शासनाच्या तुरीला असणाऱ्या हमीदराच्या आसपासही नसल्याने कधी नव्हे, अशी साडेचार लाख क्ंिवटल तूर खरेदी यावर्षी केवळ बुलडाणा जिल्ह्यातील केंद्रांवर करण्यात आली. महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (नाफेड), विदर्भ मार्केटिंग को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (व्हीसीएमएम), भारतीय खाद्य निगम (एफसीआय) मार्फत करण्यात आली. मात्र, कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी न केल्याने वा पूर्वनियोजन न झाल्याने तूर खरेदी सुरु झाल्यापासून जिल्ह्यातील अनेक केंद्र बारदान्याचा अभावामुळे बंद होती. मोठ्या प्रमाणात तुरीचे मोजमाप राहिल्याने १५ एप्रिल त्यानंतर २२ एप्रिल, अशी दोनवेळा मुदतवाढ सुध्दा देण्यात आली. मात्र २२ एप्रिल रोजी आवक बंद केल्यानंतरही २२ एप्रिलआधी या केंद्रावर आलेल्या तुरीचे मोजमाप या तारखेपर्यंत होऊ शकले नाही. त्यामुळे आजरोजी जिल्ह्यातील नाफेडच्या ७ केंद्रांवर १ लाख १२ हजार ६५० क्ंिवटल तूर मोजमापाअभावी पडून आहे. २२ एप्रिलपर्यंत मोजमाप झाल्यानंतर २३ एप्रिल रोजी रविवार असल्याने तुरीचे मोजमाप बंद होते. मात्र, आज सोमवारी सुद्धा तुरीचे मोजमाप करण्यात आले नाही. त्यामुळे केंद्र सुरु असताना विक्रीसाठी आणलेल्या तुरीचे मोजमाप न झाल्याने आपल्या तुरीचे मोजमाप होईल की नाही, असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. एकूणच मुदतीत या केंद्रांवर आणलेली तूर खरेदी करण्यात यावी, अशी मागणी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा झाला खर्च या केंद्रावर तूर विक्रीस आणताना शेतकऱ्यांना वाहतूक खर्च करावा लागला. अनेक शेतकऱ्यांनी मालाची नासाडी होईल म्हणून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये तुरीचे पोते ठेवलेले आहेत. अशा शेतकऱ्यांना ट्रॉली भाड्याचा खर्च करावा लागत आहे. तसेच बरेच शेतकऱ्यांनी तूर विक्रीस आणल्यानंतर त्यांना ८ ते १० दिवसांपासून केंद्रावर मुक्काम ठोकावा लागला. यामुळे घरी ये-जा करणे व रात्रीची राखणदारी याचाही खर्च करावा लागला आहे. मात्र खर्च झाल्यानंतर तुरीची हमीदराने खरेदी न झाल्यास शेतकऱ्यांची अवस्था ‘सौ के साठ’ अशीच होणार आहे.--