शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

हमीदर केंद्रावर दोन लाख क्ंिवटल तूर पडून!

By admin | Updated: April 25, 2017 00:39 IST

सोमवारीही वजनकाटे राहिले बंद : मुदतीत आलेल्या तुरीच्या मोजमापाची प्रतीक्षा

गिरीश राऊत - खामगावकधी नव्हे ती विक्रमी तूर खरेदी करणाऱ्या जिल्ह्यातील हमीदराने तूर खरेदी केंद्र आवकसाठी बंदच झाली आहे, तर दिलेल्या मुदतीत या केंद्रावर आलेली १ लाख ९० हजार ४५६ क्ंिवटल तूर पडून आहे. रविवारी मोजमापाला सुटी राहत असल्याने सोमवारी मोजमाप सुरू होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; मात्र आदेश नसल्याचे कारणावरून मोजमाप दुसरे दिवशीसुद्धा बंदच राहिले. एकूणच अनेक दिवसांपासून या केंद्रावर तूर विक्रीस आणलेल्या शेतकऱ्यांमध्ये आपली तूर खरेदी केली जाईल किंवा नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. गतवर्षी ११ हजार रुपयांपर्यंत भाव पोहोचलेल्या तुरीचे उत्पादन घेऊन उत्पन्न मिळविण्याचे आशेने यावर्षी शेतकऱ्यांनी तुरीचा पेरा केला होता. सुदैवाने तूर पिकाला निसर्गाची सुद्धा साथ मिळाल्याने यावर्षी जिल्ह्यात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. मात्र नेहमी हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची यावर्षीही तुरीचे उत्पादन बऱ्यापैकी झाले असताना भाव पडल्याने कोंडी झाली. सुरुवातीपासून तर आतापर्यंतही तुरीचे भाव शासनाच्या तुरीला असणाऱ्या हमीदराच्या आसपासही नसल्याने कधी नव्हे, अशी साडेचार लाख क्ंिवटल तूर खरेदी यावर्षी केवळ बुलडाणा जिल्ह्यातील केंद्रांवर करण्यात आली. महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (नाफेड), विदर्भ मार्केटिंग को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (व्हीसीएमएम), भारतीय खाद्य निगम (एफसीआय) मार्फत करण्यात आली. मात्र, कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी न केल्याने वा पूर्वनियोजन न झाल्याने तूर खरेदी सुरु झाल्यापासून जिल्ह्यातील अनेक केंद्र बारदान्याचा अभावामुळे बंद होती. मोठ्या प्रमाणात तुरीचे मोजमाप राहिल्याने १५ एप्रिल त्यानंतर २२ एप्रिल, अशी दोनवेळा मुदतवाढ सुध्दा देण्यात आली. मात्र २२ एप्रिल रोजी आवक बंद केल्यानंतरही २२ एप्रिलआधी या केंद्रावर आलेल्या तुरीचे मोजमाप या तारखेपर्यंत होऊ शकले नाही. त्यामुळे आजरोजी जिल्ह्यातील नाफेडच्या ७ केंद्रांवर १ लाख १२ हजार ६५० क्ंिवटल तूर मोजमापाअभावी पडून आहे. २२ एप्रिलपर्यंत मोजमाप झाल्यानंतर २३ एप्रिल रोजी रविवार असल्याने तुरीचे मोजमाप बंद होते. मात्र, आज सोमवारी सुद्धा तुरीचे मोजमाप करण्यात आले नाही. त्यामुळे केंद्र सुरु असताना विक्रीसाठी आणलेल्या तुरीचे मोजमाप न झाल्याने आपल्या तुरीचे मोजमाप होईल की नाही, असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. एकूणच मुदतीत या केंद्रांवर आणलेली तूर खरेदी करण्यात यावी, अशी मागणी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा झाला खर्च या केंद्रावर तूर विक्रीस आणताना शेतकऱ्यांना वाहतूक खर्च करावा लागला. अनेक शेतकऱ्यांनी मालाची नासाडी होईल म्हणून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये तुरीचे पोते ठेवलेले आहेत. अशा शेतकऱ्यांना ट्रॉली भाड्याचा खर्च करावा लागत आहे. तसेच बरेच शेतकऱ्यांनी तूर विक्रीस आणल्यानंतर त्यांना ८ ते १० दिवसांपासून केंद्रावर मुक्काम ठोकावा लागला. यामुळे घरी ये-जा करणे व रात्रीची राखणदारी याचाही खर्च करावा लागला आहे. मात्र खर्च झाल्यानंतर तुरीची हमीदराने खरेदी न झाल्यास शेतकऱ्यांची अवस्था ‘सौ के साठ’ अशीच होणार आहे.--