शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

खामगावात उद्यापासून ऐतिहासिक शांती महोत्सव; देशभरातील लक्षावधी भाविकांची लाभणार उपस्थिती

By अनिल गवई | Updated: October 8, 2022 12:14 IST

खामगाव येथील शांती महोत्सवाला तब्बल ११४ वर्षांची अखंडीत परंपरा आहे. सन १९०८ साली खामगावात या उत्सवाला सुरूवात झाली.

अनिल गवईखामगाव: तब्बल ११४ वर्षांची परंपरा असलेल्या शांती उत्सवास रविवारपासून खामगावात प्रारंभ होत आहे. पुढील ११ दिवस भक्तीमय वातावरणात हा उत्सव पार पडणार असून, देशात केवळ खामगावातच हा उत्सव साजरा होतो. त्यामुळे जगदंबा (मोठी) देवीच्या दर्शनासाठी शांती उत्सवाच्या  पहिल्या दिवसांपासूनच भाविकांची रिघ लागते. हे येथे उल्लेखनिय!

खामगाव येथील शांती महोत्सवाला तब्बल ११४ वर्षांची अखंडीत परंपरा आहे. सन १९०८ साली खामगावात या उत्सवाला सुरूवात झाली. तेव्हापासून  देवीच्या ठाण्यांचा (जागा) बदलाचा अपवाद वगळता, शांती महोत्सवात कधीही खंड पडलेला नाही. अगदी कोरोना काळातही खामगावात साधेपणाने शांती महोत्सव साजरा झाला. यावर्षी निर्बंधमुक्त शांती उत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे खामगावात चैतन्याचे वातावरण असून शहरात ठिकठिकाणी शांती महोत्सवाची तयारी पूर्णत्वास गेली आहे. शांती उत्सव देशात केवळ खामगावातच साजरा होत असल्याने, या उत्सवाला वेगळे महत्व असून एक वेगळीच परंपरा हा उत्सव राखून आहे. नवसाला पावणारी म्हणून अख्ख्या भारतात जिची ख्याती आहे. त्याच जगदंबेला खामगाव येथे मोठ्या सन्मानाने मोठी देवी म्हणून संबोधण्यात येते.  दरम्यान, श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने शहरातील जलालपुरा भागात अनेक वषार्पासून तर खामगाव शहरात सन १९०८ पासून  साजरा होणारा जगदंबा मातेचा उत्सव आता खामगाव शहर आणि परिसरातील खेड्यापाड्यात ठिकठिकाणी उत्साहाने साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे.

आंध्रप्रदेशात देवीचे मुळ ठाणे!आंध्रप्रदेशात निजामाबाद जिल्ह्यात बोधन  येथे जगदंबा देवीचे मुळ ठाणे आहे.  कै.कैरन्ना आनंदे (रा.लोहगाव ) देवीचे नि:स्सिम भक्त होते. खामगावात स्थायिक झाल्यानंतर त्यांनी खामगावात शांती महोत्सवाला सुरूवात केली. तेव्हापासून खामगावात शांती महोत्सवाची प्रथा सुरू आहे.

देवीला शांत करण्यासाठी ११ दिवस आराधना!विजयादशमीला असुरांचा संहार करून देवी परत आल्यानंतर, देवीचा चेहरा क्रोधीत असल्याने लाल झालेला असतो. त्यामुळे  म्हणून या देवीचा चेहरा लाल रंगाचा करण्यात येतो. तसेच देवीला शांत करण्याकरीता पूजा, अर्चना, आराधना केली जाते. त्या उत्सवाला शांती उत्सव असे म्हटले जाते.

२४ तास दर्शन सुविधाउत्सवामध्ये जगदंबेच्या दर्शनासाठी भक्तांकरीता २४ तास आईचा दरबार खुला असतो. गर्दी नियंत्रणासाठी येथे चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात येतो. उत्सव काळात दहा दिवस भाविकांनी दान केलेल्या साड्या, पातळे, चोळ्या यांचे मंडळाकडून गरजुंना वाटप केल्या जाते.