शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

खामगावात उद्यापासून ऐतिहासिक शांती महोत्सव; देशभरातील लक्षावधी भाविकांची लाभणार उपस्थिती

By अनिल गवई | Updated: October 8, 2022 12:14 IST

खामगाव येथील शांती महोत्सवाला तब्बल ११४ वर्षांची अखंडीत परंपरा आहे. सन १९०८ साली खामगावात या उत्सवाला सुरूवात झाली.

अनिल गवईखामगाव: तब्बल ११४ वर्षांची परंपरा असलेल्या शांती उत्सवास रविवारपासून खामगावात प्रारंभ होत आहे. पुढील ११ दिवस भक्तीमय वातावरणात हा उत्सव पार पडणार असून, देशात केवळ खामगावातच हा उत्सव साजरा होतो. त्यामुळे जगदंबा (मोठी) देवीच्या दर्शनासाठी शांती उत्सवाच्या  पहिल्या दिवसांपासूनच भाविकांची रिघ लागते. हे येथे उल्लेखनिय!

खामगाव येथील शांती महोत्सवाला तब्बल ११४ वर्षांची अखंडीत परंपरा आहे. सन १९०८ साली खामगावात या उत्सवाला सुरूवात झाली. तेव्हापासून  देवीच्या ठाण्यांचा (जागा) बदलाचा अपवाद वगळता, शांती महोत्सवात कधीही खंड पडलेला नाही. अगदी कोरोना काळातही खामगावात साधेपणाने शांती महोत्सव साजरा झाला. यावर्षी निर्बंधमुक्त शांती उत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे खामगावात चैतन्याचे वातावरण असून शहरात ठिकठिकाणी शांती महोत्सवाची तयारी पूर्णत्वास गेली आहे. शांती उत्सव देशात केवळ खामगावातच साजरा होत असल्याने, या उत्सवाला वेगळे महत्व असून एक वेगळीच परंपरा हा उत्सव राखून आहे. नवसाला पावणारी म्हणून अख्ख्या भारतात जिची ख्याती आहे. त्याच जगदंबेला खामगाव येथे मोठ्या सन्मानाने मोठी देवी म्हणून संबोधण्यात येते.  दरम्यान, श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने शहरातील जलालपुरा भागात अनेक वषार्पासून तर खामगाव शहरात सन १९०८ पासून  साजरा होणारा जगदंबा मातेचा उत्सव आता खामगाव शहर आणि परिसरातील खेड्यापाड्यात ठिकठिकाणी उत्साहाने साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे.

आंध्रप्रदेशात देवीचे मुळ ठाणे!आंध्रप्रदेशात निजामाबाद जिल्ह्यात बोधन  येथे जगदंबा देवीचे मुळ ठाणे आहे.  कै.कैरन्ना आनंदे (रा.लोहगाव ) देवीचे नि:स्सिम भक्त होते. खामगावात स्थायिक झाल्यानंतर त्यांनी खामगावात शांती महोत्सवाला सुरूवात केली. तेव्हापासून खामगावात शांती महोत्सवाची प्रथा सुरू आहे.

देवीला शांत करण्यासाठी ११ दिवस आराधना!विजयादशमीला असुरांचा संहार करून देवी परत आल्यानंतर, देवीचा चेहरा क्रोधीत असल्याने लाल झालेला असतो. त्यामुळे  म्हणून या देवीचा चेहरा लाल रंगाचा करण्यात येतो. तसेच देवीला शांत करण्याकरीता पूजा, अर्चना, आराधना केली जाते. त्या उत्सवाला शांती उत्सव असे म्हटले जाते.

२४ तास दर्शन सुविधाउत्सवामध्ये जगदंबेच्या दर्शनासाठी भक्तांकरीता २४ तास आईचा दरबार खुला असतो. गर्दी नियंत्रणासाठी येथे चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात येतो. उत्सव काळात दहा दिवस भाविकांनी दान केलेल्या साड्या, पातळे, चोळ्या यांचे मंडळाकडून गरजुंना वाटप केल्या जाते.