शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

‘रबलिंग स्ट्रीप’विना महामार्ग ठरतोय जीवघेणा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:37 IST

चिखली : शहरातून जाणाऱ्या खामगाव-जालना या सिमेंट काँक्रीटच्या नव्या-कोऱ्या चौपदरी महामार्गावरून वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू आहे. अनेक वाहने सुसाट ...

चिखली : शहरातून जाणाऱ्या खामगाव-जालना या सिमेंट काँक्रीटच्या नव्या-कोऱ्या चौपदरी महामार्गावरून वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू आहे. अनेक वाहने सुसाट धावत आहेत. मात्र, सुसाटपणे धावणाऱ्या या वाहनांची मानवी वस्तीतून जात असताना गती नियंत्रणात राहण्यासाठी कुठेही ठोस उपाययोजना नसल्याने अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

चिखली शहरातून जाणारा हा महामार्ग बायपास असला तरी तो मानवी वस्तीतूनच आहे. प्रामुख्याने खामगाव चौफुली, श्री शिवाजी उद्यानाजवळील चौफुली आणि जाफ्राबाद टी पॉईट याठिकाणी वाहनांची प्रचंड वर्दळ असते. शिवाय या भागात हॉस्पिटल, भाजी मार्केट, बँक आदींमुळे नेहमीच नागरिकांची देखील मोठी वर्दळ असते. परंतु, या महत्वाच्या ठिकाणीसुध्दा वारंवार मागणी होऊनही अद्याप ‘रबलींग स्ट्रीप’ बसविण्यात आलेले नाहीत. यातूनच मोठे आपघात होऊन जीवित हानी देखील झालेली आहे. तसेच मेहकर फाटा, शेलूद, पेठ, अमडापूर, उंद्री आदी गावांच्या मध्यभागातून हा रस्ता जातो. मात्र, या महामार्गावर वाहनांचा वेग कमी होण्यासाठी ठिकठिकाणी गतीनियंत्रक नसल्याने लहान-मोठे अपघात वाढले आहेत. तथापी पदाचारी नागरिकांना रस्ता ओलांडणे जीवघेणे ठरत आहे. दरम्यान राहेरीच्या पुलावरून जड वाहतूक बंद झाल्याने जालनाहून सिंदेखडराजा मार्गे नागपूरकडे जाणारी जड वाहनांने आता चिखली मार्गे धावत असल्याने या मार्गावर जड वाहनांची संख्या देखील लक्षणीय वाढली आहे. यामुळे मानवी वस्तीतील रस्त्यावरील रहदारीच्या ठिकाणी व चौकाचौकात ‘रबलिंग स्ट्रीप’ बसविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

अपघातानंतरच येते जाग !

या महामार्गावरील पेठ येथे रस्ता ओलांडणाऱ्या एका खासगी बसने भल्या पहाटे उडविल्याने एका तरुणाचा करुण अंत झाला आहे. या अपघातानंतरच संबंधित विभागाला जाग आली व पेठे येथे रबलिंग स्ट्रीप बसविण्यात आले. अशाच एका घटनेत भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या धडकेत जाफ्राबाद टी पॉईटवर एक तरुणाचा बळी गेला आहे. अशा अनेक घटना घडलेल्या असताना आणि ‘रबलिंग स्ट्रीप’ बसविण्याची मागणी होत असतानाही, या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.

जयभद्रा ग्रुपव्दारे तहसीलदारांना निवेदन !

शहरातून जाणाऱ्या या महागार्मावर ‘रबलिंग स्ट्रीप’ बसविण्याची मागणी याआधी देखील विविध पक्ष-संघटनांनी केली आहे. दरम्यान २४ ऑगस्ट रोजी याच मागणीच्या अनुषंगाने येथील जयभद्रा ग्रुपने तहसीलदांना निवेदन दिले आहे. यावेळी ग्रुपचे संस्थापक पवन घारपडे, शैलेश दुतोंडे, अभिजित खरात, शुभम खरपास, मबश्शीर म.असद, किशाेर रताळे आदी उपस्थित होते.