शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
4
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
5
"मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून मला..," फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
7
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
8
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
9
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
10
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
11
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
12
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
13
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
14
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
15
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
16
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
17
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
18
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
19
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
20
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई

‘रबलिंग स्ट्रीप’विना महामार्ग ठरतोय जीवघेणा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:37 IST

चिखली : शहरातून जाणाऱ्या खामगाव-जालना या सिमेंट काँक्रीटच्या नव्या-कोऱ्या चौपदरी महामार्गावरून वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू आहे. अनेक वाहने सुसाट ...

चिखली : शहरातून जाणाऱ्या खामगाव-जालना या सिमेंट काँक्रीटच्या नव्या-कोऱ्या चौपदरी महामार्गावरून वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू आहे. अनेक वाहने सुसाट धावत आहेत. मात्र, सुसाटपणे धावणाऱ्या या वाहनांची मानवी वस्तीतून जात असताना गती नियंत्रणात राहण्यासाठी कुठेही ठोस उपाययोजना नसल्याने अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

चिखली शहरातून जाणारा हा महामार्ग बायपास असला तरी तो मानवी वस्तीतूनच आहे. प्रामुख्याने खामगाव चौफुली, श्री शिवाजी उद्यानाजवळील चौफुली आणि जाफ्राबाद टी पॉईट याठिकाणी वाहनांची प्रचंड वर्दळ असते. शिवाय या भागात हॉस्पिटल, भाजी मार्केट, बँक आदींमुळे नेहमीच नागरिकांची देखील मोठी वर्दळ असते. परंतु, या महत्वाच्या ठिकाणीसुध्दा वारंवार मागणी होऊनही अद्याप ‘रबलींग स्ट्रीप’ बसविण्यात आलेले नाहीत. यातूनच मोठे आपघात होऊन जीवित हानी देखील झालेली आहे. तसेच मेहकर फाटा, शेलूद, पेठ, अमडापूर, उंद्री आदी गावांच्या मध्यभागातून हा रस्ता जातो. मात्र, या महामार्गावर वाहनांचा वेग कमी होण्यासाठी ठिकठिकाणी गतीनियंत्रक नसल्याने लहान-मोठे अपघात वाढले आहेत. तथापी पदाचारी नागरिकांना रस्ता ओलांडणे जीवघेणे ठरत आहे. दरम्यान राहेरीच्या पुलावरून जड वाहतूक बंद झाल्याने जालनाहून सिंदेखडराजा मार्गे नागपूरकडे जाणारी जड वाहनांने आता चिखली मार्गे धावत असल्याने या मार्गावर जड वाहनांची संख्या देखील लक्षणीय वाढली आहे. यामुळे मानवी वस्तीतील रस्त्यावरील रहदारीच्या ठिकाणी व चौकाचौकात ‘रबलिंग स्ट्रीप’ बसविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

अपघातानंतरच येते जाग !

या महामार्गावरील पेठ येथे रस्ता ओलांडणाऱ्या एका खासगी बसने भल्या पहाटे उडविल्याने एका तरुणाचा करुण अंत झाला आहे. या अपघातानंतरच संबंधित विभागाला जाग आली व पेठे येथे रबलिंग स्ट्रीप बसविण्यात आले. अशाच एका घटनेत भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या धडकेत जाफ्राबाद टी पॉईटवर एक तरुणाचा बळी गेला आहे. अशा अनेक घटना घडलेल्या असताना आणि ‘रबलिंग स्ट्रीप’ बसविण्याची मागणी होत असतानाही, या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.

जयभद्रा ग्रुपव्दारे तहसीलदारांना निवेदन !

शहरातून जाणाऱ्या या महागार्मावर ‘रबलिंग स्ट्रीप’ बसविण्याची मागणी याआधी देखील विविध पक्ष-संघटनांनी केली आहे. दरम्यान २४ ऑगस्ट रोजी याच मागणीच्या अनुषंगाने येथील जयभद्रा ग्रुपने तहसीलदांना निवेदन दिले आहे. यावेळी ग्रुपचे संस्थापक पवन घारपडे, शैलेश दुतोंडे, अभिजित खरात, शुभम खरपास, मबश्शीर म.असद, किशाेर रताळे आदी उपस्थित होते.