शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

‘रबलिंग स्ट्रीप’विना महामार्ग ठरतोय जीवघेणा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:37 IST

चिखली : शहरातून जाणाऱ्या खामगाव-जालना या सिमेंट काँक्रीटच्या नव्या-कोऱ्या चौपदरी महामार्गावरून वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू आहे. अनेक वाहने सुसाट ...

चिखली : शहरातून जाणाऱ्या खामगाव-जालना या सिमेंट काँक्रीटच्या नव्या-कोऱ्या चौपदरी महामार्गावरून वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू आहे. अनेक वाहने सुसाट धावत आहेत. मात्र, सुसाटपणे धावणाऱ्या या वाहनांची मानवी वस्तीतून जात असताना गती नियंत्रणात राहण्यासाठी कुठेही ठोस उपाययोजना नसल्याने अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

चिखली शहरातून जाणारा हा महामार्ग बायपास असला तरी तो मानवी वस्तीतूनच आहे. प्रामुख्याने खामगाव चौफुली, श्री शिवाजी उद्यानाजवळील चौफुली आणि जाफ्राबाद टी पॉईट याठिकाणी वाहनांची प्रचंड वर्दळ असते. शिवाय या भागात हॉस्पिटल, भाजी मार्केट, बँक आदींमुळे नेहमीच नागरिकांची देखील मोठी वर्दळ असते. परंतु, या महत्वाच्या ठिकाणीसुध्दा वारंवार मागणी होऊनही अद्याप ‘रबलींग स्ट्रीप’ बसविण्यात आलेले नाहीत. यातूनच मोठे आपघात होऊन जीवित हानी देखील झालेली आहे. तसेच मेहकर फाटा, शेलूद, पेठ, अमडापूर, उंद्री आदी गावांच्या मध्यभागातून हा रस्ता जातो. मात्र, या महामार्गावर वाहनांचा वेग कमी होण्यासाठी ठिकठिकाणी गतीनियंत्रक नसल्याने लहान-मोठे अपघात वाढले आहेत. तथापी पदाचारी नागरिकांना रस्ता ओलांडणे जीवघेणे ठरत आहे. दरम्यान राहेरीच्या पुलावरून जड वाहतूक बंद झाल्याने जालनाहून सिंदेखडराजा मार्गे नागपूरकडे जाणारी जड वाहनांने आता चिखली मार्गे धावत असल्याने या मार्गावर जड वाहनांची संख्या देखील लक्षणीय वाढली आहे. यामुळे मानवी वस्तीतील रस्त्यावरील रहदारीच्या ठिकाणी व चौकाचौकात ‘रबलिंग स्ट्रीप’ बसविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

अपघातानंतरच येते जाग !

या महामार्गावरील पेठ येथे रस्ता ओलांडणाऱ्या एका खासगी बसने भल्या पहाटे उडविल्याने एका तरुणाचा करुण अंत झाला आहे. या अपघातानंतरच संबंधित विभागाला जाग आली व पेठे येथे रबलिंग स्ट्रीप बसविण्यात आले. अशाच एका घटनेत भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या धडकेत जाफ्राबाद टी पॉईटवर एक तरुणाचा बळी गेला आहे. अशा अनेक घटना घडलेल्या असताना आणि ‘रबलिंग स्ट्रीप’ बसविण्याची मागणी होत असतानाही, या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.

जयभद्रा ग्रुपव्दारे तहसीलदारांना निवेदन !

शहरातून जाणाऱ्या या महागार्मावर ‘रबलिंग स्ट्रीप’ बसविण्याची मागणी याआधी देखील विविध पक्ष-संघटनांनी केली आहे. दरम्यान २४ ऑगस्ट रोजी याच मागणीच्या अनुषंगाने येथील जयभद्रा ग्रुपने तहसीलदांना निवेदन दिले आहे. यावेळी ग्रुपचे संस्थापक पवन घारपडे, शैलेश दुतोंडे, अभिजित खरात, शुभम खरपास, मबश्शीर म.असद, किशाेर रताळे आदी उपस्थित होते.