शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार आर्थिक मदत

By admin | Updated: February 27, 2016 01:55 IST

२0१३ मधील नुकसानग्रस्त शेतक-यांना दिलासा.

नीलेश शहाकार / बुलडाणा राज्यात २0१३ मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान अतवृष्टी व पूर यामुळे शे तकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. या दरम्यान राज्यातील आठ जिल्ह्यांत शेती व फळपिकांचे ५0 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याची नोंद शासन दरबारी करण्यात आली. या नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मदतनिधी देण्याचा निर्णय महसूल व वन विभागाने २५ फेब्रुवारी रोजी घेतला असून, यातून २१ कोटी ४२ लाख ३७ हजारांचा निधी वितरित केला जाणार आहे. यात बुलडाणा जिल्ह्याला ८४ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.२0१३ च्या ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये जिल्ह्याला गारपीट आणि अवकाळी पावसाने झोडपून काढले. बर्‍याच ठिकाणी पुरामुळे शेतजमीन खरवडून निघाली. यामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. गहू, हरभरा ही रब्बी पिके, संत्रा, लिंबू, केळी या फळपिकांसह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे या आठ जिल्ह्यांतील जवळपास १ लाख ८२ हजार ९४३ शेतकरी प्रभावित झाले होते.या नुकसानाबाबत शासनामार्फत सर्व्हे करण्यात आला होता. तसा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला. आता शेतकर्‍यांना दिलासा देत, बाधित शे तकर्‍यांना अर्थसहाय्य देण्यासाठी २१ कोटी ४२ लाख ३७ हजारांचा निधी राज्य शासनाकडून देण्यास मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात नुकसान अहवालाची फेरतपासणी करून १0 मार्चपर्यंत शासनाकडे सादर करायची असून, यानंतर अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यासाठी ८४ लाखांची मदतबुलडाणा जिल्ह्यात २0१३ मध्ये ६ हजार शेतकर्‍यांना पावसाचा मोठा फटका बसला. बर्‍याच ठिकाणी उभी पिके झोपली तर काही ठिकाणी पुरामुळे संपूर्ण शेती खरवडून निघाली होती. चिखली, शेगाव, सिंदखेड राजा, बुलडाणा, मलकापूर, नांदुरा, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात १६८ गावे बाधित झाली, तर २९ हजार ७२३ हेक्टर पीक जमिनीचे नुकसान झाल्याची नोंद शासन दरबारी आहे. ही बाब लक्षात घेता, २५ फेब्रुवारीच्या निर्णयानुसार बुलडाणा जिल्ह्याला ८४ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.