शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार आर्थिक मदत

By admin | Updated: February 27, 2016 01:55 IST

२0१३ मधील नुकसानग्रस्त शेतक-यांना दिलासा.

नीलेश शहाकार / बुलडाणा राज्यात २0१३ मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान अतवृष्टी व पूर यामुळे शे तकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. या दरम्यान राज्यातील आठ जिल्ह्यांत शेती व फळपिकांचे ५0 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याची नोंद शासन दरबारी करण्यात आली. या नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मदतनिधी देण्याचा निर्णय महसूल व वन विभागाने २५ फेब्रुवारी रोजी घेतला असून, यातून २१ कोटी ४२ लाख ३७ हजारांचा निधी वितरित केला जाणार आहे. यात बुलडाणा जिल्ह्याला ८४ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.२0१३ च्या ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये जिल्ह्याला गारपीट आणि अवकाळी पावसाने झोडपून काढले. बर्‍याच ठिकाणी पुरामुळे शेतजमीन खरवडून निघाली. यामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. गहू, हरभरा ही रब्बी पिके, संत्रा, लिंबू, केळी या फळपिकांसह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे या आठ जिल्ह्यांतील जवळपास १ लाख ८२ हजार ९४३ शेतकरी प्रभावित झाले होते.या नुकसानाबाबत शासनामार्फत सर्व्हे करण्यात आला होता. तसा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला. आता शेतकर्‍यांना दिलासा देत, बाधित शे तकर्‍यांना अर्थसहाय्य देण्यासाठी २१ कोटी ४२ लाख ३७ हजारांचा निधी राज्य शासनाकडून देण्यास मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात नुकसान अहवालाची फेरतपासणी करून १0 मार्चपर्यंत शासनाकडे सादर करायची असून, यानंतर अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यासाठी ८४ लाखांची मदतबुलडाणा जिल्ह्यात २0१३ मध्ये ६ हजार शेतकर्‍यांना पावसाचा मोठा फटका बसला. बर्‍याच ठिकाणी उभी पिके झोपली तर काही ठिकाणी पुरामुळे संपूर्ण शेती खरवडून निघाली होती. चिखली, शेगाव, सिंदखेड राजा, बुलडाणा, मलकापूर, नांदुरा, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात १६८ गावे बाधित झाली, तर २९ हजार ७२३ हेक्टर पीक जमिनीचे नुकसान झाल्याची नोंद शासन दरबारी आहे. ही बाब लक्षात घेता, २५ फेब्रुवारीच्या निर्णयानुसार बुलडाणा जिल्ह्याला ८४ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.