शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनापेक्षा उपसा सिंचन व पुलावर जास्त खर्च

By admin | Updated: May 6, 2016 02:22 IST

जलसंपदा मंत्र्यांनी जिगाव प्रकल्पाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

सुहास वाघमारे /नांदुरा (जि. बुलडाणा)आधी पुनर्वसन मग धरण असे शासनाचे धोरण सिंचन प्रकल्पाच्या कामाबाबत राबविले जाते. मात्र जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पासाठी आतापर्यंत झालेल्या १५00 कोटी रुपयांच्या खर्चामध्ये अध्र्यापेक्षा जास्त खर्च हा उपसा सिंचन योजना व धरणाच्या पाण्यामुळे बाधित होणार्‍या पाच पुलांच्या कामावर केल्याने एकाही गावाचे पुनर्वसन मागील दशकात झाले नाही. त्यामुळे सद्यस्थितीत पहिल्या टप्प्यातील प्रकल्पग्रस्तांना वारंवार त्यांच्या न्यायपूर्ण मागण्यांसाठी प्रकल्पस्थळी आंदोलन करून धरणाचे काम बंद पाडावे लागते. त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी पुनर्वसनाला गती देण्याची व सिंचन योजना व पुलांवर गरज नसताना झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांची आहे.४00 कोटी रुपयांची पहिली प्रशासकीय मान्यता असलेल्या जिगाव प्रकल्प आजरोजी सहा हजार कोटी रुपयांचा झाला आहे. मागील तीन दशकापासून कागदावरच असलेल्या या प्रकल्पाच्या कामाला सात वर्षांपूर्वी प्रत्यक्षात सुरुवात झाली. मातीभिंतीच्या कामाला प्रारंभ होताच प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र, मागील दशकात पहिल्या टप्प्यातील एकाही गावाचे पुनर्वसन झाले नाही व धरणाच्या मातीभिंतीचे कामही अर्धेच झाले आहे व पायाचे बांधकाम यावर्षी सुरू झाले. त्या तुलनेत मात्र धरणात पाण्याच्या साठवणुकीबाबत नियोजन ढासळले असताना धरणातील पाण्याचा उपसा करण्यासाठी कंत्राट देण्यात आलेल्या १२ उपसा सिंचन योजनांच्या कामांवर ६00 कोटी रुपये व धरणाच्या पाण्याने बाधित होणार्‍या पाच पुलांच्या कामांवर ३00 कोटी रुपये पाटबंधारे विभागाने खर्च केले आहेत.