शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

पुनर्वसनापेक्षा उपसा सिंचन व पुलावर जास्त खर्च

By admin | Updated: May 6, 2016 02:22 IST

जलसंपदा मंत्र्यांनी जिगाव प्रकल्पाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

सुहास वाघमारे /नांदुरा (जि. बुलडाणा)आधी पुनर्वसन मग धरण असे शासनाचे धोरण सिंचन प्रकल्पाच्या कामाबाबत राबविले जाते. मात्र जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पासाठी आतापर्यंत झालेल्या १५00 कोटी रुपयांच्या खर्चामध्ये अध्र्यापेक्षा जास्त खर्च हा उपसा सिंचन योजना व धरणाच्या पाण्यामुळे बाधित होणार्‍या पाच पुलांच्या कामावर केल्याने एकाही गावाचे पुनर्वसन मागील दशकात झाले नाही. त्यामुळे सद्यस्थितीत पहिल्या टप्प्यातील प्रकल्पग्रस्तांना वारंवार त्यांच्या न्यायपूर्ण मागण्यांसाठी प्रकल्पस्थळी आंदोलन करून धरणाचे काम बंद पाडावे लागते. त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी पुनर्वसनाला गती देण्याची व सिंचन योजना व पुलांवर गरज नसताना झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांची आहे.४00 कोटी रुपयांची पहिली प्रशासकीय मान्यता असलेल्या जिगाव प्रकल्प आजरोजी सहा हजार कोटी रुपयांचा झाला आहे. मागील तीन दशकापासून कागदावरच असलेल्या या प्रकल्पाच्या कामाला सात वर्षांपूर्वी प्रत्यक्षात सुरुवात झाली. मातीभिंतीच्या कामाला प्रारंभ होताच प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र, मागील दशकात पहिल्या टप्प्यातील एकाही गावाचे पुनर्वसन झाले नाही व धरणाच्या मातीभिंतीचे कामही अर्धेच झाले आहे व पायाचे बांधकाम यावर्षी सुरू झाले. त्या तुलनेत मात्र धरणात पाण्याच्या साठवणुकीबाबत नियोजन ढासळले असताना धरणातील पाण्याचा उपसा करण्यासाठी कंत्राट देण्यात आलेल्या १२ उपसा सिंचन योजनांच्या कामांवर ६00 कोटी रुपये व धरणाच्या पाण्याने बाधित होणार्‍या पाच पुलांच्या कामांवर ३00 कोटी रुपये पाटबंधारे विभागाने खर्च केले आहेत.