शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

वीज कोसळल्याने हरबरा सुडी जळून खाक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:23 IST

चिखली तालुक्यात १८ फेब्रुवारीच्या सकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी ...

चिखली तालुक्यात १८ फेब्रुवारीच्या सकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान, तालुक्यातील उत्रादा येथील शेतकरी रामेश्वर मनोहर इंगळे यांनी आपल्या गट नं.२.३४ मधील २.२५ हे.आर क्षेत्रावरील हरबरा पीकाची सोंगणी केल्यानंतर सुडी रचून ठेवली होती. या सुडीवर ही वीज कोसळल्याने संपूर्ण सुडी जळून खाक झाली आहे. यामध्ये शेतकरी रामेश्वर इंगळे यांचे सुमारे अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. ही बाब कळताच महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे. शेतकरी इंगळे यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेला असल्याने या शेतकऱ्यास तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

--शेतकऱ्यांची चिंता वाढली--

तालुक्यात हा अवकाली पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोंगून ठेवलेल्या हरभरा पिकाच्या सुड्या पाण्याने भिजल्या आहेत. तथापि, ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले असून, १८ ते २२ फेब्रुवारीपर्यंत हवामाची अशीच स्थिती राहणार असल्याच्या अंदाज वर्तविण्यात आलेला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.