शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:42 IST

चिखली : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून आठवडाभरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदतीची रक्कम जमा करा, अशी ...

चिखली : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून आठवडाभरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदतीची रक्कम जमा करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शासनाकडे केली आहे.

पळसखेड नाईक, पाडळी, चौथा, गिरडा शिवारात रविकांत तुपकर यांनी पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच जनावरे वाहून मृत्युमुखी पडली आहेत. दुबार, तिबार पेरणीने शेतकरी आधीच कर्जबाजारी झाला आहे. त्यात ऐन भरात आलेली पिके अतिवृष्टीने वाया गेली आहेत. प्रामुख्याने सोयाबीन व कपाशीची मोठी हानी झाली आहे. याची दखल घेत सरकारने विविध प्रकल्पांचे काम सोडून आधी शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. त्यासाठी तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. कुठलाही भेदभाव करू नये. पंचनाम्यांबाबत राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेपही थांबवावा, अशी मागणी तुपकर यांनी या पाहणी दरम्यान केली.

नदीकाठी सिमेंटच्या उंच भिंती बांधा

पूर आल्याने शेतांमध्ये पाणी घुसून पिकांचे नुकसान होते. ही हानी टाळता यावी याकरिता नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण होणे गरजेचे आहे. तसेच नदीकाठी सिमेंटच्या उंच भिंती उभारण्यात याव्यात, त्याचप्रमाणे बुलडाणा ते अजिंठा रोड राष्ट्रीय महामार्गाने नाल्या व्यवस्थित न काढल्याने शेतात पाणी घुसून पिके वाहून गेली. भविष्यात नुकसान होऊ नये म्हणून ठेकेदाराने सिमेंटच्या नाल्या बांधून द्याव्यात, अशी मागणीही तुपकर यांनी केली आहे.