शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाने शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:46 IST

जानेफळ : मृग नक्षत्रास सुरुवात झाल्यानंतर जानेफळसह परिसरात दमदार पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून, पेरणीपूर्व मशागतीची कामे ...

जानेफळ : मृग नक्षत्रास सुरुवात झाल्यानंतर जानेफळसह परिसरात दमदार पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून, पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांनी पेरणीलासुद्धा सुरुवात केली आहे.

शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या पेरणीच्या घाईमुळे बाजारपेठेत पुरेसे बियाणे उपलब्ध नसल्याने कृषी केंद्रचालकांनी शेतकऱ्यांची लूट चालविली असून, अव्वाचे सव्वा भावाने बियाणांच्या थैलीची विक्री होत आहे. कृषी विभाग मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.

यावर्षी खरिपाच्या हंगामाची सुरुवात ही शेतकऱ्यांना फार महागडी ठरत असून, आधीच ट्रॅक्टर मालकांनी डिझेलचे भाव वाढल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या सर्व कामांची मजुरी वाढविलेली आहे. त्यातच आता बियाणांच्या प्रतिबॅगमागे ७०० ते ८०० रुपये जादा मोजून शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे खरेदी करणे भाग पडत आहे. मागील वर्षी सोयाबीन काढणीच्या वेळी सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे सोयाबीन खराब झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली. यामुळे यंदा लावगडीसाठी घरची सोयाबीन बियाणे शिल्लक नसल्याने कंपनी पॅकिंगच्या सोयाबीन बॅगा विकत घ्याव्या लागत आहेत. यामुळे पुरेशा मालाचा साठा उपलब्ध नसल्याने तसेच शेतकऱ्यांकडून विशिष्ट कंपनीच्या बियाणांचीच जादा मागणी होत असल्याने कृषी केंद्रचालक याचा गैरफायदा घेऊन ३२०० रुपये किंमत असलेल्या सोयाबीन बियाणांची बॅग चार हजार ते ४२०० रुपयांत विक्री करत आहे. याबाबत काही शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी काळे यांच्याकडे भ्रमणध्वनीवर तक्रार केली. मात्र कृषी अधिकाऱ्यांनी स्टॉक तपासण्याचा त्रास न घेता तुम्ही दुकानदाराची तक्रार करा, नंतर मी येतो असे उत्तर दिले. यावरून सदर शेतकऱ्यांच्या लूटमारीचा हा प्रकार कृषी विभागाच्या संगनमतानेच सुरू असल्याची चर्चा होत आहे.

रासायनिक खतांच्या बाबतीतसुद्धा कृषी केंद्रचालकांची मनमानी सुरू असून, शेतकऱ्यांना पाहिजे ती खते मिळत नसल्याने दुकानात उपलब्ध असलेली खतेच शेतकऱ्यांना खरेदी करावे लागत आहेत.

केवळ आठ शेतकऱ्यांना मिळाले अनुदानित बियाणे

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बियाणे वाटपासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. यातून लॉटरी पद्धतीने केवळ ८ शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे, तर २५ शेतकऱ्यांना तुरीचे बियाणे मिळाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची ही केवळ थट्टाच सुरू असल्याचे दिसत आहे. जगाचा पोशिंदा म्हणून समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्याची लूट सुरू असताना याकडे दुर्लक्ष हाेत आहे.

कृषी विभागाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष

शेतकऱ्यांनी सध्या पेरणीची घाई करू नये म्हणून कृषी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. शेतकरीवर्ग मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत महागडी बियाणे व रासायनिक खते खरेदी करून मोठ्या जोमात पेरणीच्या कामाला लागला आहे.