शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

दमदार पावसाने शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:46 IST

जानेफळ : मृग नक्षत्रास सुरुवात झाल्यानंतर जानेफळसह परिसरात दमदार पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून, पेरणीपूर्व मशागतीची कामे ...

जानेफळ : मृग नक्षत्रास सुरुवात झाल्यानंतर जानेफळसह परिसरात दमदार पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून, पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांनी पेरणीलासुद्धा सुरुवात केली आहे.

शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या पेरणीच्या घाईमुळे बाजारपेठेत पुरेसे बियाणे उपलब्ध नसल्याने कृषी केंद्रचालकांनी शेतकऱ्यांची लूट चालविली असून, अव्वाचे सव्वा भावाने बियाणांच्या थैलीची विक्री होत आहे. कृषी विभाग मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.

यावर्षी खरिपाच्या हंगामाची सुरुवात ही शेतकऱ्यांना फार महागडी ठरत असून, आधीच ट्रॅक्टर मालकांनी डिझेलचे भाव वाढल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या सर्व कामांची मजुरी वाढविलेली आहे. त्यातच आता बियाणांच्या प्रतिबॅगमागे ७०० ते ८०० रुपये जादा मोजून शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे खरेदी करणे भाग पडत आहे. मागील वर्षी सोयाबीन काढणीच्या वेळी सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे सोयाबीन खराब झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली. यामुळे यंदा लावगडीसाठी घरची सोयाबीन बियाणे शिल्लक नसल्याने कंपनी पॅकिंगच्या सोयाबीन बॅगा विकत घ्याव्या लागत आहेत. यामुळे पुरेशा मालाचा साठा उपलब्ध नसल्याने तसेच शेतकऱ्यांकडून विशिष्ट कंपनीच्या बियाणांचीच जादा मागणी होत असल्याने कृषी केंद्रचालक याचा गैरफायदा घेऊन ३२०० रुपये किंमत असलेल्या सोयाबीन बियाणांची बॅग चार हजार ते ४२०० रुपयांत विक्री करत आहे. याबाबत काही शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी काळे यांच्याकडे भ्रमणध्वनीवर तक्रार केली. मात्र कृषी अधिकाऱ्यांनी स्टॉक तपासण्याचा त्रास न घेता तुम्ही दुकानदाराची तक्रार करा, नंतर मी येतो असे उत्तर दिले. यावरून सदर शेतकऱ्यांच्या लूटमारीचा हा प्रकार कृषी विभागाच्या संगनमतानेच सुरू असल्याची चर्चा होत आहे.

रासायनिक खतांच्या बाबतीतसुद्धा कृषी केंद्रचालकांची मनमानी सुरू असून, शेतकऱ्यांना पाहिजे ती खते मिळत नसल्याने दुकानात उपलब्ध असलेली खतेच शेतकऱ्यांना खरेदी करावे लागत आहेत.

केवळ आठ शेतकऱ्यांना मिळाले अनुदानित बियाणे

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बियाणे वाटपासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. यातून लॉटरी पद्धतीने केवळ ८ शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे, तर २५ शेतकऱ्यांना तुरीचे बियाणे मिळाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची ही केवळ थट्टाच सुरू असल्याचे दिसत आहे. जगाचा पोशिंदा म्हणून समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्याची लूट सुरू असताना याकडे दुर्लक्ष हाेत आहे.

कृषी विभागाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष

शेतकऱ्यांनी सध्या पेरणीची घाई करू नये म्हणून कृषी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. शेतकरीवर्ग मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत महागडी बियाणे व रासायनिक खते खरेदी करून मोठ्या जोमात पेरणीच्या कामाला लागला आहे.