शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

दमदार पावसाने शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:46 IST

जानेफळ : मृग नक्षत्रास सुरुवात झाल्यानंतर जानेफळसह परिसरात दमदार पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून, पेरणीपूर्व मशागतीची कामे ...

जानेफळ : मृग नक्षत्रास सुरुवात झाल्यानंतर जानेफळसह परिसरात दमदार पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून, पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांनी पेरणीलासुद्धा सुरुवात केली आहे.

शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या पेरणीच्या घाईमुळे बाजारपेठेत पुरेसे बियाणे उपलब्ध नसल्याने कृषी केंद्रचालकांनी शेतकऱ्यांची लूट चालविली असून, अव्वाचे सव्वा भावाने बियाणांच्या थैलीची विक्री होत आहे. कृषी विभाग मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.

यावर्षी खरिपाच्या हंगामाची सुरुवात ही शेतकऱ्यांना फार महागडी ठरत असून, आधीच ट्रॅक्टर मालकांनी डिझेलचे भाव वाढल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या सर्व कामांची मजुरी वाढविलेली आहे. त्यातच आता बियाणांच्या प्रतिबॅगमागे ७०० ते ८०० रुपये जादा मोजून शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे खरेदी करणे भाग पडत आहे. मागील वर्षी सोयाबीन काढणीच्या वेळी सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे सोयाबीन खराब झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली. यामुळे यंदा लावगडीसाठी घरची सोयाबीन बियाणे शिल्लक नसल्याने कंपनी पॅकिंगच्या सोयाबीन बॅगा विकत घ्याव्या लागत आहेत. यामुळे पुरेशा मालाचा साठा उपलब्ध नसल्याने तसेच शेतकऱ्यांकडून विशिष्ट कंपनीच्या बियाणांचीच जादा मागणी होत असल्याने कृषी केंद्रचालक याचा गैरफायदा घेऊन ३२०० रुपये किंमत असलेल्या सोयाबीन बियाणांची बॅग चार हजार ते ४२०० रुपयांत विक्री करत आहे. याबाबत काही शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी काळे यांच्याकडे भ्रमणध्वनीवर तक्रार केली. मात्र कृषी अधिकाऱ्यांनी स्टॉक तपासण्याचा त्रास न घेता तुम्ही दुकानदाराची तक्रार करा, नंतर मी येतो असे उत्तर दिले. यावरून सदर शेतकऱ्यांच्या लूटमारीचा हा प्रकार कृषी विभागाच्या संगनमतानेच सुरू असल्याची चर्चा होत आहे.

रासायनिक खतांच्या बाबतीतसुद्धा कृषी केंद्रचालकांची मनमानी सुरू असून, शेतकऱ्यांना पाहिजे ती खते मिळत नसल्याने दुकानात उपलब्ध असलेली खतेच शेतकऱ्यांना खरेदी करावे लागत आहेत.

केवळ आठ शेतकऱ्यांना मिळाले अनुदानित बियाणे

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बियाणे वाटपासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. यातून लॉटरी पद्धतीने केवळ ८ शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे, तर २५ शेतकऱ्यांना तुरीचे बियाणे मिळाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची ही केवळ थट्टाच सुरू असल्याचे दिसत आहे. जगाचा पोशिंदा म्हणून समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्याची लूट सुरू असताना याकडे दुर्लक्ष हाेत आहे.

कृषी विभागाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष

शेतकऱ्यांनी सध्या पेरणीची घाई करू नये म्हणून कृषी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. शेतकरीवर्ग मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत महागडी बियाणे व रासायनिक खते खरेदी करून मोठ्या जोमात पेरणीच्या कामाला लागला आहे.