शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अर्थकारण सावरण्यासाठी दमदार पावसाची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 12:38 IST

Heavy rains needed to recover the economy : बुलडाणा जिल्ह्याचे जवळपास २४ हजार कोटी रुपयांचे अर्थकारण सावरण्यासाठी आता दमदार पावसाची गरज आहे. 

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना व गेल्या दोन वर्षांपासून परतीच्या पावसाने फटका दिलेल्या बुलडाणा जिल्ह्याचे जवळपास २४ हजार कोटी रुपयांचे अर्थकारण सावरण्यासाठी आता दमदार पावसाची गरज आहे. जून महिन्याच्या अखेरीसही जिल्ह्यात ९० टक्के खरिपाच्या क्षेत्रावरील पेरण्या रखडलेल्या आहेत. त्यातच हवामान खात्याने गुरुवारी दिलेल्या विस्तारित अंदाजामध्ये जिल्ह्यात  १८ ते २४ जूनदरम्यान सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सोबतच २५ जून ते १ जुलैदरम्यानच्या अंदाजामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचे यामध्ये म्हटले आहे. त्यामुळे ९५ टक्के अर्थकारण कृषीवर अवलंबून असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात आगामी काळातील पावसावरच जिल्ह्याची मदार राहणार असल्याचे दिसते. गेल्या चार ते पाच वर्षांत कोरडा व नंतर ओला दुष्काळ जिल्ह्यात पडला होता. त्यानंतर कोरोनाचे संकट गेल्या १५ महिन्यांपासून घोंगावत आहे. सिंचन सुविधा कमी आणि कोरडवाहू क्षेत्र अधिक असलेल्या बुलडाणा जिल्ह्याची मदार त्यामुळे मान्सूनच्याच पावसावर अवलंबून असते. त्यातच जिल्ह्यातील बँकांकडून करण्यात येणाऱ्या एकूण पतपुरवठ्यापैकी ३४ टक्केच शेतकऱ्यांना पतपुरवठा होतो. अशा स्थितीत या महिनाअखेर जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस न झाल्यास कृषी क्षेत्राला बसणाऱ्या फटक्याचे परिणाम हे अन्य क्षेत्रावरही पडू शकतात व त्यातून अर्थकारण आणखी डबघाईस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी दहा दिवस हे कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचे ठरणारे आहेत.

चार तालुक्यांची स्थिती चांगलीआतापर्यंत पडलेला पाऊस जूनच्या सरासरीच्या चार टक्के कमी असला तरी खामगाव, चिखली, मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यातील एखाद दोन महसूल मंडळे वगळता चांगला झाला आहे. मेहकरची स्थिती उत्तम आहे. त्यामुळे या भागात पेरण्या होऊ शकतात; परंतु अन्य तालुक्यांत तशी स्थिती नाही. त्यामुळे अन्य तालुक्यात पाऊस कसा पडतो यावर बरेचशे गणित अवलंबून आहे.

पेरणीस विलंब झाला तर परतीच्या पावसाचा फटका?समाधानकारक पाऊस न पडल्यास पेरणी उशिरा होऊन पिकांचे जीवनचक्रही उशिरा पूर्ण होईल. त्यातच अलीकडील काळातील हवामान बदलामुळे परतीच्या पावसाचा गेली दोन वर्षे कहर पहावयास मिळाला. त्याचाही फटका प्रसंगी या पिकांना नंतर बसू शकतो. त्यामुळेच पेरण्यांसाठी तथा अर्थकारण सावरण्यासाठी आगामी काळात पडणारा पाऊस हा निर्णायक ठरणार आहे. २०१९ मध्ये वार्षिक २२.१९ टक्के परतीचा पाऊस पडला होता. त्यामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले होते. २०२० मध्येही अशीच स्थिती होती.

विस्तारित अंदाजात पाऊस कमीहवामान विभागाकडून दर गुरुवारी देण्यात येणाऱ्या विस्तारित अंदाजामध्ये १८ ते २४ जूनदरम्यान सरासरीपेक्षा कमी पाऊस सांगण्यात आला आहे. मात्र, २५ ते १ जुलैदरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस सांगितलेला आहे. त्यामुळे पेरणीच्या दृष्टीने या कालावधीतील पाऊस हा निर्णायक ठरणारा राहू शकतो, असे जिल्हा कृषी हवामान विभागाचे तज्ज्ञ मनेष यदुलवार यांनी स्पष्ट केले

टॅग्स :Rainपाऊसbuldhanaबुलडाणा