शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

अमडापूर परिसरात दमदार पाऊस, पिकांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST

अमडापूर परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीलाच जाेरदार पाऊस झाला हाेता. त्या पावसावर शेतकऱ्यांनी लगेच पेरणीला सुरुवात केली. त्यानंतर १६ जूनला ...

अमडापूर परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीलाच जाेरदार पाऊस झाला हाेता. त्या पावसावर शेतकऱ्यांनी लगेच पेरणीला सुरुवात केली. त्यानंतर १६ जूनला झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली़ बियाणेही वाहून गेल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली़ त्यानंतर पावसाने ११ ते १२ दिवस हुलकावणी दिली़ पेरलेल्या बियाण्यावर पाऊस पडलाच नाही. कसेबसे बियाणे उगवून आले तर ज्यांच्याकडे ओलितीची व्यवस्था आहे त्या शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाद्वारे पिकांना पाणी दिले. मात्र कोरडवाहू मधील शेतातील बियाणे उगवून आले, त्यांना पावसाची अत्यंत आवश्यकता होती. २७ जून रोजी रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान अमडापूरसह परिसरात मध्यम ते हलक्‍या स्वरूपाच्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले़ थोडाफार का होईना शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला़ परिसरात जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.

शेती मशागतीला आला वेग

२७ जून राेजी झालेल्या पावसामुळे रखडलेल्या शेतीच्या कामांना गती आली आहे़ शेतकऱ्यांनी तणनाशक फवारणी सुरू केली आहे़ तसेच काही शेतकऱ्यांनी पहिली काेळपणी केली आहे़ पाऊस पडताच शेतकऱ्यांची पावले तणनाशक घेण्याकरिता कृषी केंद्राकडे वळली आहे. तसेच इतर मशागतीच्या कामांनाही गती मिळाली आहे़