शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील सात तालुक्यात अतिवृष्टी

By admin | Updated: July 13, 2016 02:18 IST

सोमवारी झालेल्या पावसामुळे पूर्णा व ज्ञानगंगा या दोन मोठय़ा नदयांना पूर;गावांचा संपर्क तुटला .

बुलडाणा/खामगाव : संततधार सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यात चार दिवस मुक्काम ठोकला असून, सात तालुक्यात अतवृष्टी झाली आहे. सोमवारी झालेल्या पावसामुळे पूर्णा व ज्ञानगंगा या दोन मोठय़ा नदयांना पूर आला. त्यामुळे जळगाव जामोद, नांदुरा, संग्रामपूर व शेगाव या चार तालुक्यांमधील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील मोताळा १0८ मिमी., मलकापूर १२८ मिमी., नांदुरा १८१ मिमी., खामगाव १५५ मिमी., जळगाव जामोद १0५ मिमी., शेगाव ७८ मिमी., सिंदखेड राजा तालु क्यात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला असून, अतवृष्टी झाली आहे. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच घरांची पडझड व जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत. पूर्णा नदीला पूर आल्यामुळे जळगाव जामोद व नांदुरा तालुक्याचा जनसंपर्क सोमवारपासूनच तुटला आहे.

-  शेगाव तालुक्यातील मनसगाव येथील राजू सपकाळ यांच्या मालकीचे दोन गाढव विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडले आहेत. खामगाव तालुक्यातील माटरगाव येथील ७ कुटुंब, पहुरजिरा येथील १२ कुटुंब व मोरगाव डिग्रस येथील दोन कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. शेगाव येथून टाकळीकडे जाणारा मार्ग बंद असल्याने चार विद्यार्थ्यांना शेगाव येथीलच शाळेत रात्र काढावी लागली. 

-पुरात वाहून गेल्याने महिलेचा मृत्यूबोर्डी नदीच्या पात्रात ७८ वर्षीय महिला वाहून गेल्याची घटना शेगाव तालुक्यातील वरखेड येथे सोमवारी रात्री घडली होती. या महिलेचा मृतदेह मंगळवारी दुपारी आढळून आला आहे. शवविच्छेदनानंतर या महिलेचा मृतदेह कुटुंबीयांना देण्यात आला.-संततधार पावसामुळे मंदिराचे टीनशेड कोसळले!मोताळा तालुक्यातील भोरटेक येथील हनुमान मंदिराचे टीनशेड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. मागील २५-३0 वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून मंदिरासमोरील बांधकाम करण्यात आले होते. १३ टिनाच्या या शेडचे बांधकाम आतून मातीचे असल्यामुळे संततधार पावसामुळे कोसळून नुकसान झाले आहे.