शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
5
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
6
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
7
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
8
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
9
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
10
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
11
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
12
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
13
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
14
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
15
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
16
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
17
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
18
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
19
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
20
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?

नायगाव येथील संतप्त शेतक-यांना मिळाले रोहित्र

By admin | Updated: November 22, 2015 02:15 IST

शेतक-यांना तातडीने रोहित्र बसवून दिल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले.

चिखली(जि. बुलडाणा) : खरिपाची पिके हातची गेली; मात्र रब्बीच्या आशेवर असलेल्या नायगाव बु.येथील शेतकर्‍यांचे रोहित्र जळून १५ दिवस उलटले तरीही ती बदलून मिळत नसल्याने शेतातील पिके वाळत असल्याचे पाहून हताश झालेले शेतकरी २0 नोव्हेंबर रोजी विद्युत पोलवर चढले होते. ही माहिती मिळताच शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी नायगाव बु.गाठून संतप्त शेतकर्‍यांना खाली उतरविले. वीज कंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून याकामी पुढाकार घेत तातडीने रोहित्र बसविण्यात आल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पेनटाकळी प्रकल्पाच्या काठावर नायगाव बु. हे गाव वसलेले आहे. त्यामुळे येथील शेतकर्‍यांची संपूर्ण मदार रब्बी पिकांवर अवलंबून आहे; मात्र ऐन पिकांना पाणी देण्याच्या वेळेस रोहित्र जळाल्याने शेतकर्‍यांना वारंवार महावितरणच्या कार्यालयात चकरा माराव्या लागल्या, एवढे करूनही रोहित्र बदलविण्यात न आल्याने जेमतेम डोके वर काढलेल्या रब्बी पिकांची अवस्था बिकट होत चाचली होती. दरम्यान, संबंधित विभागाच्या दिरंगाईमुळे रोहित्र जळाल्याचा रिपोर्टही उशिरा जात असल्याच्या तक्रारी असून, शेतकर्‍यांनी बिलाची रक्कम भरली असतानाही १५ दिवस उलटूनही रोहित्र मिळत नसल्याने निराश झालेल्या शेतकरी २0 नोव्हेंबर रोजी थेट जळालेल्या डी.पी.वर चढले. ही माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष विनायक सरनाईक, जिल्हा सरचिटणीस नितीन राजपूत यांनी तातडीने नायगाव बु. गाव गाठले व रोहित्रावर बसलेल्या शेतकर्‍यांना खाली उतरवून घेत त्यांना रोहित्र मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. दरम्यान, तेथूनच वीज वितरणचे कार्यकारी अभियंता शेगोकार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून याबाबत माहिती दिली असता शेगोकार यांनी शेतकरी हिताचा निर्णय घेत शेतकर्‍यांना तातडीने रोहित्र बसवून दिल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी विनायक सरनाईक, नितीन राजपूत, दिलीप जंजाळ, विष्णू जवंजाळ, अशोक मोरे, राजू जंजाळ, धोंडूबा कापसे, पांडुरंग अंभोरे, उमेश पंखुले, सुधाकर जवंजाळ, विठ्ठल जवंजाळ, मोहन फोकाटे व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.