शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव येथील संतप्त शेतक-यांना मिळाले रोहित्र

By admin | Updated: November 22, 2015 02:15 IST

शेतक-यांना तातडीने रोहित्र बसवून दिल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले.

चिखली(जि. बुलडाणा) : खरिपाची पिके हातची गेली; मात्र रब्बीच्या आशेवर असलेल्या नायगाव बु.येथील शेतकर्‍यांचे रोहित्र जळून १५ दिवस उलटले तरीही ती बदलून मिळत नसल्याने शेतातील पिके वाळत असल्याचे पाहून हताश झालेले शेतकरी २0 नोव्हेंबर रोजी विद्युत पोलवर चढले होते. ही माहिती मिळताच शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी नायगाव बु.गाठून संतप्त शेतकर्‍यांना खाली उतरविले. वीज कंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून याकामी पुढाकार घेत तातडीने रोहित्र बसविण्यात आल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पेनटाकळी प्रकल्पाच्या काठावर नायगाव बु. हे गाव वसलेले आहे. त्यामुळे येथील शेतकर्‍यांची संपूर्ण मदार रब्बी पिकांवर अवलंबून आहे; मात्र ऐन पिकांना पाणी देण्याच्या वेळेस रोहित्र जळाल्याने शेतकर्‍यांना वारंवार महावितरणच्या कार्यालयात चकरा माराव्या लागल्या, एवढे करूनही रोहित्र बदलविण्यात न आल्याने जेमतेम डोके वर काढलेल्या रब्बी पिकांची अवस्था बिकट होत चाचली होती. दरम्यान, संबंधित विभागाच्या दिरंगाईमुळे रोहित्र जळाल्याचा रिपोर्टही उशिरा जात असल्याच्या तक्रारी असून, शेतकर्‍यांनी बिलाची रक्कम भरली असतानाही १५ दिवस उलटूनही रोहित्र मिळत नसल्याने निराश झालेल्या शेतकरी २0 नोव्हेंबर रोजी थेट जळालेल्या डी.पी.वर चढले. ही माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष विनायक सरनाईक, जिल्हा सरचिटणीस नितीन राजपूत यांनी तातडीने नायगाव बु. गाव गाठले व रोहित्रावर बसलेल्या शेतकर्‍यांना खाली उतरवून घेत त्यांना रोहित्र मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. दरम्यान, तेथूनच वीज वितरणचे कार्यकारी अभियंता शेगोकार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून याबाबत माहिती दिली असता शेगोकार यांनी शेतकरी हिताचा निर्णय घेत शेतकर्‍यांना तातडीने रोहित्र बसवून दिल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी विनायक सरनाईक, नितीन राजपूत, दिलीप जंजाळ, विष्णू जवंजाळ, अशोक मोरे, राजू जंजाळ, धोंडूबा कापसे, पांडुरंग अंभोरे, उमेश पंखुले, सुधाकर जवंजाळ, विठ्ठल जवंजाळ, मोहन फोकाटे व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.