शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू

By admin | Updated: April 25, 2017 00:22 IST

खामगाव : तालु्क्यातील किन्ही महादेव येथील शेतमजुराचा उष्माघातामुळे २४ एप्रिल रोजी मृत्यू झाला.

खामगाव : तालु्क्यातील किन्ही महादेव येथील शेतमजुराचा उष्माघातामुळे २४ एप्रिल रोजी मृत्यू झाला. या घटनेनंतर डॉक्टरांनी उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत मृतकाच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार थांबविले होते. दरम्यान, प्रशासनाच्या आश्वासनानंतर मृतकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. किन्ही महादेव येथील पुरुषोत्तम दशरथ तायडे (वय २१) हा शेतमजूर २० एप्रिल रोजी शेतात शेतमजुरीचे काम करीत असताना चक्कर आल्याने बेशुद्ध झाला. हा प्रकार उपस्थित नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी पुरुषोत्तम तायडे यास उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, पुरुषोत्तम तायडे यास उष्माघात कक्षात दाखल करण्यात आले नव्हते. उपचारादरम्यान प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यास अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, अकोला येथे उपचार सुरु असताना २४ एप्रिल रोजी सकाळी पुरुषोत्तम तायडे याचा मृत्यू झाला. दरम्यान, मृतकाच्या नातेवाईकांनी पुरुषोत्तमवर उपचारादरम्यान डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने त्याचा मृत्यू झाला, असा आरोप करीत अंत्यसंस्कार थांबविले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर नायब तहसीलदार कुणाल झाल्टे, हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार डंबाले आदींनी किन्ही महादेव येथे जाऊन चौकशी करुन दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. यानंतर मृतकावर अंत्यसंस्कार उरकण्यात आले. पुरुषोत्तम तायडे हा बुलडाणा जिल्ह्यातील उष्माघाताचा यावर्षी पहिला बळी ठरला आहे.