शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू

By admin | Updated: April 25, 2017 00:22 IST

खामगाव : तालु्क्यातील किन्ही महादेव येथील शेतमजुराचा उष्माघातामुळे २४ एप्रिल रोजी मृत्यू झाला.

खामगाव : तालु्क्यातील किन्ही महादेव येथील शेतमजुराचा उष्माघातामुळे २४ एप्रिल रोजी मृत्यू झाला. या घटनेनंतर डॉक्टरांनी उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत मृतकाच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार थांबविले होते. दरम्यान, प्रशासनाच्या आश्वासनानंतर मृतकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. किन्ही महादेव येथील पुरुषोत्तम दशरथ तायडे (वय २१) हा शेतमजूर २० एप्रिल रोजी शेतात शेतमजुरीचे काम करीत असताना चक्कर आल्याने बेशुद्ध झाला. हा प्रकार उपस्थित नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी पुरुषोत्तम तायडे यास उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, पुरुषोत्तम तायडे यास उष्माघात कक्षात दाखल करण्यात आले नव्हते. उपचारादरम्यान प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यास अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, अकोला येथे उपचार सुरु असताना २४ एप्रिल रोजी सकाळी पुरुषोत्तम तायडे याचा मृत्यू झाला. दरम्यान, मृतकाच्या नातेवाईकांनी पुरुषोत्तमवर उपचारादरम्यान डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने त्याचा मृत्यू झाला, असा आरोप करीत अंत्यसंस्कार थांबविले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर नायब तहसीलदार कुणाल झाल्टे, हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार डंबाले आदींनी किन्ही महादेव येथे जाऊन चौकशी करुन दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. यानंतर मृतकावर अंत्यसंस्कार उरकण्यात आले. पुरुषोत्तम तायडे हा बुलडाणा जिल्ह्यातील उष्माघाताचा यावर्षी पहिला बळी ठरला आहे.