शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

हातात कुऱ्हाड घेऊन रस्त्याचे काम पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मेहकर : रस्त्याच्या कामासाठी जाणाऱ्या वाहनांमुळे धूळ उडून कल्याणा शिवारातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मेहकर : रस्त्याच्या कामासाठी जाणाऱ्या वाहनांमुळे धूळ उडून कल्याणा शिवारातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या धुळीला कंटाळून अखेर मेहकर तालुक्यातील कल्याणा शिवारातील संतप्त शेतकरी अनिरुद्ध तांगडे व इतरांनी हातात कुऱ्हाड घेत बुधवारी दुपारी रस्त्याचे काम बंद पाडले. यावेळी शेतकऱ्यांचा संताप पाहून रस्ता तयार करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यामुळे कामावरील वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील ३६ किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचे काम आपको कंपनीकडून सुरू आहे. या महामार्गाच्या खालच्या बाजूला रस्ता आहे. या ठिकाणाहून दिवसभर महामार्गाच्या कामावरील ट्रक ये-जा करत असतात. यामुळे रस्त्यालगतच्या शेतात मोठ्या प्रमाणात धूळ जाते. परिणामी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. सध्या तूर, हरभरा, गहू पीक शेतामध्ये उभे आहे. धुळीमुळे शेतामध्ये मजूर कामाला येत नाहीत. शेतकरीही या धुळीमुळे त्रस्त झालेले आहेत. नियमाप्रमाणे रस्त्यावर पाणी मारले जात नाही. दिवसातून तीनवेळा या रस्त्याला पाणी मारले पाहिजे, जेणेकरून धूळ उडणार नाही. परंतु, कंत्राटदार रस्त्यावर पाणीच मारत नसल्याने कंटाळून कल्याणा शिवारातील शेतकरी अनिरुद्ध तांगडे, अनंथा गारोळे, सोनू बोडखे, संतोष गारोळे, दिलीप काकडे यांनी हातामध्ये कुऱ्हाड घेऊन रस्त्यावर उभे राहात बुधवारी दुपारपासून कामावरील संपूर्ण वाहतूक बंद केली. संबंधित अधिकाऱ्यांना बोलावल्याशिवाय वाहन पुढे जाऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. यामुळे अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. शेतकरी तांगडे यांनी नियमानुसार दिवसातून तीनवेळा रस्त्यावर पाणी न मारल्यास शिवारातील सर्व शेतकरी एकत्र येऊन काम बंद पाडू, असा इशारा दिला.

धुळीमुळे पिकांच्या प्रकाश संश्लेषण व शोषण क्रिया बाधित

शेतातील पिकाला धुळीमुळे प्रकाश संश्लेषण व शोषण क्रिया ह्या बाधित होतात. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होते.

महसूल व कृषी च्या वतीने संपूर्ण महामार्गाच्या कडेला असलेल्या शेतकऱ्यांची पिकाची पाहणी करून सर्वे केलेला आहे. संपूर्ण अहवाल आम्ही शासनदरबारी पाठविणार आहोत.

विजय सरोदे, तालुका कृषी अधिकारी,मेहकर.