शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

गारपिटीने नुकसान

By admin | Updated: January 1, 2015 00:41 IST

नांदुरा, संग्रामपूर तालुक्यात तुरळक गारपीट : शेतक-यांनी घेतली धास्ती.

खामगाव (बुलडाणा): वर्षाच्या शेवटच्या दिवशी, बुधवारी दिवसभरात अधूनमधून अवकाळी पाऊस चांगला बसरला. कोठे तुरळक, तर कोठे चांगला पाऊस झाला. संग्रामपूर तालुक्यात काही ठिकाणी तुरळक गारपीट झाली. या पावसामुळे उघड्यावर असलेला गुरांचा चारा, भाजीपाल्याचे नुकसान झाले, तर गारपिटीची धास्तीसुद्धा शेतकर्‍यांना बसली आहे. जिल्ह्यात आज पहाटे अवकाळी पावसाच्या सरी सुरु झाल्या. अधूनमधून दिवसभर पाऊस सुरू होता. खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, मलकापूर तसेच नांदुरा तालु्क्यात व जिल्ह्यात इतरही भागात कमी-जास्त प्रमाणात पाऊस बरसला. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. आधीच थंडीची लाट असल्याने व आज पाऊस बरसल्याने प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. या वातावरणामुळे सर्दी, डोकेदुखी, तापाची साथ यांसारखे आजार डोके वर काढणार असल्याने आरोग्य यंत्रणेवरसुद्धा ताण येणार आहे. गत जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात असाच झालेल्या अवकाळी पावसासोबत गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर कोरडवाहू हंगामात मात्र पावसाने खो दिल्याने शेतकर्‍यांवर व परिणामी सर्वांवरच दुष्काळाचे संकट कोसळले आहे. शासनाच्या मदत मिळणार असली तरी ती तोकडी असल्याने शेतकर्‍यांना आर्थिक टंचाईमुळे वर्षभर विविध संकटांना सामोरे जावे लागणार आहे. त्यातच पुन्हा अवकाळी पाऊस येत असल्याने शेतकर्‍यांकडून चिंता व्यक्त होत असून, पुन्हा गारपीट होईल का, अशी धास्ती शेतकर्‍यांनी घेतली आहे.