शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

गारपिटीने नुकसान

By admin | Updated: January 1, 2015 00:41 IST

नांदुरा, संग्रामपूर तालुक्यात तुरळक गारपीट : शेतक-यांनी घेतली धास्ती.

खामगाव (बुलडाणा): वर्षाच्या शेवटच्या दिवशी, बुधवारी दिवसभरात अधूनमधून अवकाळी पाऊस चांगला बसरला. कोठे तुरळक, तर कोठे चांगला पाऊस झाला. संग्रामपूर तालुक्यात काही ठिकाणी तुरळक गारपीट झाली. या पावसामुळे उघड्यावर असलेला गुरांचा चारा, भाजीपाल्याचे नुकसान झाले, तर गारपिटीची धास्तीसुद्धा शेतकर्‍यांना बसली आहे. जिल्ह्यात आज पहाटे अवकाळी पावसाच्या सरी सुरु झाल्या. अधूनमधून दिवसभर पाऊस सुरू होता. खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, मलकापूर तसेच नांदुरा तालु्क्यात व जिल्ह्यात इतरही भागात कमी-जास्त प्रमाणात पाऊस बरसला. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. आधीच थंडीची लाट असल्याने व आज पाऊस बरसल्याने प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. या वातावरणामुळे सर्दी, डोकेदुखी, तापाची साथ यांसारखे आजार डोके वर काढणार असल्याने आरोग्य यंत्रणेवरसुद्धा ताण येणार आहे. गत जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात असाच झालेल्या अवकाळी पावसासोबत गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर कोरडवाहू हंगामात मात्र पावसाने खो दिल्याने शेतकर्‍यांवर व परिणामी सर्वांवरच दुष्काळाचे संकट कोसळले आहे. शासनाच्या मदत मिळणार असली तरी ती तोकडी असल्याने शेतकर्‍यांना आर्थिक टंचाईमुळे वर्षभर विविध संकटांना सामोरे जावे लागणार आहे. त्यातच पुन्हा अवकाळी पाऊस येत असल्याने शेतकर्‍यांकडून चिंता व्यक्त होत असून, पुन्हा गारपीट होईल का, अशी धास्ती शेतकर्‍यांनी घेतली आहे.