कोरोना काळात असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मोबाइलच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे शिक्षणापासून मुले वंचित राहू नयेत म्हणून या ध्येयवेड्या शिक्षकाने स्वखर्चातून २० विद्यार्थ्यांना गुरुजी बनविले आहे. आता या गुरुजींची गोरगरीब मुलांना घरोघरी जाऊन शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी सरपंच गजानन चनेवार, बंजारा समाजाचे महंत सुभाष महाराज, संतोष अवसरमोल, माजी सरपंच दिलीप पाटील नवले, पाणलोट क्षेत्राचे माजी अध्यक्ष प्रल्हाद अप्पा चुकेवार, शाळा समिती अध्यक्ष शेषराव अंभोरे, ग्रा.पं. सदस्य दयाराम राठोड, सामाजिक कार्यकर्ते सुभाष जाधव, मुख्याध्यापक राजेंद्र कदम, गोविंद आटोळे, समाधान इंगळे, राजाराम देवकर, अशोक डोईफोडे, निरंजन बोरकर, नितीन चोंडकर, अनिकेत वाघमारे, अरविंद राठोड, दिनेश घोडे, अनंता ठाकरे, दत्ता नवले, पवन राठोड, सुर्वणा डोंगरे, धोंडू अप्पा बिसेटवार यांची उपस्थिती होती.
कुणाल इंगोले, मयूर वर्धमाने, कृष्णा नवले, शिवम नवले, सोनू राठोड, तर विद्यार्थी शिक्षिका पौर्णिमा जानापुरे, पूजा इंगोले, शिवाणी पाखरे, कोमल नवले, श्रद्धा नवले, गायत्री नवले, आरती घुणे, उज्ज्वला मिरे, वैशाली अंभोरे, प्रीती भिलंग, कांचन राठोड, पूनम जाधव, कांचना संतोष राठोड, सरिता बाळू राठोड आदी आपल्या परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व इतर शाळांतील पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांना गोरगरीब मुलांना घरोघरी जाऊन शिक्षणाचे धडे देत आहेत. त्यामुळे हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे अवलिया शिक्षक नामदेव जाधव व या विद्यार्थ्यांचे सरपंच गजानन चनेवार, संतोष अवसरमोल यांनी कौतुक केले आहे.