शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

सत्ता स्थापनेसाठी ग्रामपंचायत सदस्यांना प्रलोभनांची खैरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:35 IST

ग्रामपंचायत निवडणुकीने सध्या गावागावातील राजकीय वातावरण तापले आहे. आता सरपंचपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. सरपंच व उपसरपंच निवडीसाठी ...

ग्रामपंचायत निवडणुकीने सध्या गावागावातील राजकीय वातावरण तापले आहे. आता सरपंचपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. सरपंच व उपसरपंच निवडीसाठी गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायतनिहाय विशेष सभा घेण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने गावातील राजकारण ढवळून निघाले आहे. ज्या

ग्रामपंचायतीमध्ये कुण्या एका पॅनलला बहुमत मिळाले, तेथे त्यांच्याकडे आरक्षित संवर्गाचा सदस्य असल्यास सरपंचपदाची निवड सोपी होईल. मात्र, ज्या ठिकाणी कुण्या एका गटाला स्पष्ट बहुमत नाही, तेथे सरपंच आरक्षण असलेल्या संवर्गातील सदस्याला आपल्याकडे खेचण्याचे मोठे प्रयत्न सुरू आहेत. सरपंचपदासाठी उमेदवारांची

पळवापळवी सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याकरिता सदस्यांना प्रलोभने, आश्वासनांची खैरात वाटली जात आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडली. प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे काही अपवाद वगळता इतर ठिकाणी अनुचित प्रकार घडला नाही. नुकतीच आरक्षण सोडत पार पडली. यानंतर अनेक गावपुढाऱ्यांनी सत्तास्थापनेसाठी कंबर कसली आहे. आरक्षण सोडतीनंतर चित्र स्पष्ट झाले आहे. आता प्रत्यक्ष सरपंच निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे, तसेच सत्तास्थापनेसाठी सदस्यांची पळवापळवी सुरू झाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सदस्यांचे तळ्यात-मळ्यात

अनेक ठिकाणी मोर्चेबांधणी सुरू असून, काही ग्रामपंचायत सदस्यांचे तळ्यात- मळ्यात सुरू असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. काही ठिकाणी अनेक सदस्यांना हेरून भूलथापा देण्यात येत असल्याने त्यांना पर्यटनस्थळी पाठवून सुरक्षित ठेवण्यात आले आहे.