शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

सत्ता स्थापनेसाठी ग्रामपंचायत सदस्यांना प्रलोभनांची खैरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:35 IST

ग्रामपंचायत निवडणुकीने सध्या गावागावातील राजकीय वातावरण तापले आहे. आता सरपंचपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. सरपंच व उपसरपंच निवडीसाठी ...

ग्रामपंचायत निवडणुकीने सध्या गावागावातील राजकीय वातावरण तापले आहे. आता सरपंचपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. सरपंच व उपसरपंच निवडीसाठी गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायतनिहाय विशेष सभा घेण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने गावातील राजकारण ढवळून निघाले आहे. ज्या

ग्रामपंचायतीमध्ये कुण्या एका पॅनलला बहुमत मिळाले, तेथे त्यांच्याकडे आरक्षित संवर्गाचा सदस्य असल्यास सरपंचपदाची निवड सोपी होईल. मात्र, ज्या ठिकाणी कुण्या एका गटाला स्पष्ट बहुमत नाही, तेथे सरपंच आरक्षण असलेल्या संवर्गातील सदस्याला आपल्याकडे खेचण्याचे मोठे प्रयत्न सुरू आहेत. सरपंचपदासाठी उमेदवारांची

पळवापळवी सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याकरिता सदस्यांना प्रलोभने, आश्वासनांची खैरात वाटली जात आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडली. प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे काही अपवाद वगळता इतर ठिकाणी अनुचित प्रकार घडला नाही. नुकतीच आरक्षण सोडत पार पडली. यानंतर अनेक गावपुढाऱ्यांनी सत्तास्थापनेसाठी कंबर कसली आहे. आरक्षण सोडतीनंतर चित्र स्पष्ट झाले आहे. आता प्रत्यक्ष सरपंच निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे, तसेच सत्तास्थापनेसाठी सदस्यांची पळवापळवी सुरू झाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सदस्यांचे तळ्यात-मळ्यात

अनेक ठिकाणी मोर्चेबांधणी सुरू असून, काही ग्रामपंचायत सदस्यांचे तळ्यात- मळ्यात सुरू असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. काही ठिकाणी अनेक सदस्यांना हेरून भूलथापा देण्यात येत असल्याने त्यांना पर्यटनस्थळी पाठवून सुरक्षित ठेवण्यात आले आहे.