शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

कृषी दूतांकडून फळ व भाजीपालानिर्मितीविषयी मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:34 IST

निव्वळ उत्पादनावरच न थांबता वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती शेतकऱ्यांनी करावी, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित श्रीमती ...

निव्वळ उत्पादनावरच न थांबता वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती शेतकऱ्यांनी करावी, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला अंधारे येथील कृषी दूतांनी केले. यावेळी कृषी दूत अमोल शिंगणे, शुभम घुघे, कुशल देवकर, आकाश गोतरकर, गणेश बिहाडे, हरीश ब्रमणकर, विजय घुगे, सर्वांश डहाळे, सूरज काळदाते, विशाल गोरे यांनी देऊळगाव मही येथे मार्गदर्शन केले. फळ व्यवसायाचा दृष्टिकोन बदललेला व फळ व्यावसायिकाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. भारत एक कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. अनादि काळापासून

शेतीची कामे करण्यासाठी फळबागा संवर्धन करून त्याचा शेतीसाठी उपयोग करण्यात आला आहे. भारतात फळे मुबलक उपलब्धता लक्षात घेऊन त्यावर प्रक्रिया मूल्यवर्धन केल्यावर त्याला बाजार भाव जास्त मिळू शकेल. फळ प्रक्रिया म्हणजे उपलब्ध फळांवर प्रक्रिया करून विविध पदार्थांची निर्मिती करणे. या प्रक्रियेमध्ये विविध प्रकारचे पदार्थ बनविले जातात. कैरी लोणचे, आलू चिप्स, केळी चिप्स, अननस ज्यूस, टोमॅटो केचप असे सारे पदार्थ बनविता येतात. हे सारे पदार्थ कशाप्रकारे बनवायचे आणि बनविल्यानंतर कशाप्रकारे विकायचे आणि कसा नफा मिळवायचा, याचे पूर्ण प्रशिक्षण या वेळेस कृषी दूतांनी शेतकऱ्यांना दिले. प्रा. डॉ. राम खर्डे आणि प्राध्यापिका वृषाली चिमोटे, प्राध्यापक

रोहित कानोजे व इतर प्राध्यापकांनी विशेष मार्गदर्शन केले. या वेळेस शेतकरी गणेश शिंगणे, दीपक गवरे, तुषार खरात, रवी शिंगणे आदी उपस्थित होते.