शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

आंबोड्यात भीषण पाणीटंचाई!

By admin | Updated: March 18, 2015 23:52 IST

नांदुरा तालुक्यातील महिलांची पाण्यासाठी पायपीट.

नांदुरा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील आंबोडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ महिन्यापूर्वी गटविकास अधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले आहे; परंतु याबाबत कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. पाणी समस्या दूर करण्यासाठी गावाला टँकरने पाणी पुरवठा करावा, असे पत्र स्थानिक ग्रामपंचायतच्यावतीने २0 फेब्रुवारी रोजी गटविकास अधिकारी नांदुरा यांना देण्यात आले; मात्र प्रशासनाने अद्यापपर्यंंत या पत्रावर कुठलीही कार्यवाही न केल्याने गावकर्‍यांमध्ये प्रशासनाबाबत तीव्र रोष व्यक्त होत आहे. आंबोडा येथे ५ सार्वजनिक विहिरी तर १७ हातपंप आहेत. सार्वजनिक विहिरी तर गेल्या महिन्यातच कोरड्याठण्ण पडल्या होत्या; तसेच १७ हातपंपांपैकी ६ हातपंप कोरडे आहेत. उर्वरित ११ हातपंपांना अत्यल्प पाणी असल्याने फेब्रुवारीपासूनच या गावाला पाणीटंचाईचे चटके बसण्यास सुरूवात झाल्याने महिन्याभरापूर्वी स्थानिक ग्रामपंचायत सचिव व उपसरपंच यांनी ही बाब गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदुरा यांच्या निदर्शनास आणून गावाला टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली होती; तसेच गावातील रघुनाथ बावस्कर यांची आमसरी शिवारातील विहीर अधिग्रहण करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला. गेल्या महिन्यापर्यंंत ११ हातपंपांना थोडेफार पाणी यायचे, आज मात्र हे हातपंपही पाणी नसल्याने बंद पडले आहेत. पाणीटंचाई निवारण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा गावकर्‍यांनी तक्रारीद्वारे दिला आहे.