शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

जाती व्यवस्थेच्या बिमोडासाठीच महापुरूषांचा लढा: संभाजी राजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 12:39 IST

खामगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र आणत, स्वराज्याची स्थापना केली. तर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुरूषांनी जाती व्यवस्थेच्या बिमोडासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला. मात्र, या महापुरूषांना अभिप्रेत असलेल्या सुराज्यापासून आपण कोसोदूर असल्याची खंत छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी येथे व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र आणत, स्वराज्याची स्थापना केली. तर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुरूषांनी जाती व्यवस्थेच्या बिमोडासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला. मात्र, या महापुरूषांना अभिप्रेत असलेल्या सुराज्यापासून आपण कोसोदूर असल्याची खंत छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी येथे व्यक्त केली.

रावबहाद्दूर केशवराव जानराव देशमुख यांच्यावतीने आयोजित शिक्षण परिषदेच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित सामाजिक ऐक्य परिषद तथा श्रीमंत शिवाजीराव वामनराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सामाजिक ऐक्य परिषदेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, आ. हर्षवर्धन सपकाळ, मानवाधिकार आयोगाचे सदस्य भगवंतराव मोरे, नगराध्यक्षा अनिता डवरे, शिवाजीराजे जाधव, इंद्रसेन देशमुख , जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, नगराध्यक्ष नाझेर काझी, माजी आमदार माणिकराव गावंडे, माजी आमदार नाना कोकरे, दादासाहेब कविश्वर यांच्यासह सत्कारमूर्ती श्रीमंत शिवाजीराव वामनराव देशमुख, सुमती देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी  संभाजी राजे म्हणाले की, जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी चारही महापुरूषांनी शेवटच्या श्वासापर्यंत जीवाचे रान केले. शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाती व्यवस्थेची संकल्पना अजिबात मान्य नव्हती. मात्र, आम्ही आजही या महापुरूषांनाच जाती-जातीत विभागायला निघालो आहोत. हेच आजच्या समाजव्यवस्थेचे अपयश आहे. मात्र, शिवाजीराव देशमुख  यांच्या सारख्या काही मोजक्या लोकांकडून  महापुरुषांच्या आदर्श जोपासल्या जात आहे. त्यामुळे ते नव्या पिढीसाठी आशेची किरणं असल्याचेही संभाजी राजे शेवटी म्हणाले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार देवेंद्र देशमुख, सौ. शीतल देशमुख, अभिषेक देशमुख, सौ.राधिका देशमुख, सयाजी देशमुख, आर्यमन देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक देवेंद्र देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. राजेश मिरगे यांनी केले. आभार तेजेंद्रसिंह चव्हाण यांनी मानले.

स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही!

खामगाव शहरातील राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाचे काम गतीने पुढे न्यावे. या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही, महापुरूषांना जाती धर्मात आणि राजकारणात अडकवू नका, असे आवाहनही छत्रपती संभाजी राजे यांनी यावेळी केले. 

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती