शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जाती व्यवस्थेच्या बिमोडासाठीच महापुरूषांचा लढा: संभाजी राजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 12:39 IST

खामगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र आणत, स्वराज्याची स्थापना केली. तर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुरूषांनी जाती व्यवस्थेच्या बिमोडासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला. मात्र, या महापुरूषांना अभिप्रेत असलेल्या सुराज्यापासून आपण कोसोदूर असल्याची खंत छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी येथे व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र आणत, स्वराज्याची स्थापना केली. तर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुरूषांनी जाती व्यवस्थेच्या बिमोडासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला. मात्र, या महापुरूषांना अभिप्रेत असलेल्या सुराज्यापासून आपण कोसोदूर असल्याची खंत छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी येथे व्यक्त केली.

रावबहाद्दूर केशवराव जानराव देशमुख यांच्यावतीने आयोजित शिक्षण परिषदेच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित सामाजिक ऐक्य परिषद तथा श्रीमंत शिवाजीराव वामनराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सामाजिक ऐक्य परिषदेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, आ. हर्षवर्धन सपकाळ, मानवाधिकार आयोगाचे सदस्य भगवंतराव मोरे, नगराध्यक्षा अनिता डवरे, शिवाजीराजे जाधव, इंद्रसेन देशमुख , जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, नगराध्यक्ष नाझेर काझी, माजी आमदार माणिकराव गावंडे, माजी आमदार नाना कोकरे, दादासाहेब कविश्वर यांच्यासह सत्कारमूर्ती श्रीमंत शिवाजीराव वामनराव देशमुख, सुमती देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी  संभाजी राजे म्हणाले की, जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी चारही महापुरूषांनी शेवटच्या श्वासापर्यंत जीवाचे रान केले. शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाती व्यवस्थेची संकल्पना अजिबात मान्य नव्हती. मात्र, आम्ही आजही या महापुरूषांनाच जाती-जातीत विभागायला निघालो आहोत. हेच आजच्या समाजव्यवस्थेचे अपयश आहे. मात्र, शिवाजीराव देशमुख  यांच्या सारख्या काही मोजक्या लोकांकडून  महापुरुषांच्या आदर्श जोपासल्या जात आहे. त्यामुळे ते नव्या पिढीसाठी आशेची किरणं असल्याचेही संभाजी राजे शेवटी म्हणाले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार देवेंद्र देशमुख, सौ. शीतल देशमुख, अभिषेक देशमुख, सौ.राधिका देशमुख, सयाजी देशमुख, आर्यमन देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक देवेंद्र देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. राजेश मिरगे यांनी केले. आभार तेजेंद्रसिंह चव्हाण यांनी मानले.

स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही!

खामगाव शहरातील राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाचे काम गतीने पुढे न्यावे. या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही, महापुरूषांना जाती धर्मात आणि राजकारणात अडकवू नका, असे आवाहनही छत्रपती संभाजी राजे यांनी यावेळी केले. 

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती