शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

महाराष्ट्राच्या जडण-घडणीत महानुभाव पंथाचे मोठे योगदान - हर्षवर्धन देशमुख

By संदीप वानखेडे | Updated: September 17, 2022 18:43 IST

संमेलनाचे उद्घाटन शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

बुलढाणा - कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या जंजाळात अडकलेल्या सर्वसामान्यांना भक्तीचा सर्वप्रथम अधिकार मिळवून देण्यासाठी श्री चक्रधर स्वामींनी पुढाकार घेतला़ महाराष्ट्राच्या जडण-घडणीत महानुभाव पंथाचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले़ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे महानुभाव अध्यासन केंद्र आणि जिजामाता महाविद्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दुसऱ्या महानुभाव साहित्य संमेलनाचे आयोजन १७ ते १८ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे़ या संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते़

संमेलनाचे उद्घाटन शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. अविनाश आवलगावकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून आचार्य लोणारकर बाबा, पुरुषोत्तम नागपुरे, महंत डॉ़ सोनपेठकर, महंत डॉ. संवत्सरकर, डॉ. संदीप जुनघरे, आदीती अर्बनचे अध्यक्ष सुरेश देवकर, अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमोल ठाकरे आदी उपस्थित होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रशांत कोठे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. संचालन संदीप तडस यांनी केले़.

देशमुख पुढे म्हणाले की, महानुभावांनी केवळ भक्तीच नाही तर मराठी साहित्य निर्मितीचा देखील पाया रचला आहे़ मराठीतील आद्य गद्य व पद्य ग्रंथ निर्माण करणाऱ्या महानुभावांकडे चरित्र, व्याकरण, कथा, भाष्य, महाभाष्य, काव्य, महाकाव्य, आख्याना, टीका, स्थळवर्णने, इतिहास आदींच्यासही आद्यत्वाचा मान जातो. किंबहुना साहित्याला विविधांगीपणे मांडण्याचे काम महानुभावांनी या महाराष्ट्रात सर्वप्रथम केले, हे आपल्याला मान्य करावेच लागेल, असेही ते म्हणाले़.

धकाधकीच्या काळात माणसाला मन:शांतीची गरज

आजच्या धकाधकीच्या काळात मानसाला मन:शांतीची गरज भासत आहे़ अशावेळी अद्वितीय, अजरामर, अक्षर साहित्य वाचले की माणूस मंत्रमुग्ध होतो व गमावलेली मन:शांती परत मिळवितो, एवढी जादू या महानुभाव साहित्यात आहे़ सर्व जीवांचे ऐहिक व पारलौकिक जोपासण्याचे महान सामर्थ्य महानुभाव वाङ्मयात आहे़ महानुभाव वाङ्मयाने मराठी साहित्याचे दालन आपल्या दमदार व सामर्थ्यशाली भाषा वैशिष्ट्यांनी व विविधतेने समृद्ध केले आहे, असेही देशमुख यांनी सांगितले़. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा