शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

महाराष्ट्राच्या जडण-घडणीत महानुभाव पंथाचे मोठे योगदान - हर्षवर्धन देशमुख

By संदीप वानखेडे | Updated: September 17, 2022 18:43 IST

संमेलनाचे उद्घाटन शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

बुलढाणा - कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या जंजाळात अडकलेल्या सर्वसामान्यांना भक्तीचा सर्वप्रथम अधिकार मिळवून देण्यासाठी श्री चक्रधर स्वामींनी पुढाकार घेतला़ महाराष्ट्राच्या जडण-घडणीत महानुभाव पंथाचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले़ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे महानुभाव अध्यासन केंद्र आणि जिजामाता महाविद्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दुसऱ्या महानुभाव साहित्य संमेलनाचे आयोजन १७ ते १८ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे़ या संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते़

संमेलनाचे उद्घाटन शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. अविनाश आवलगावकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून आचार्य लोणारकर बाबा, पुरुषोत्तम नागपुरे, महंत डॉ़ सोनपेठकर, महंत डॉ. संवत्सरकर, डॉ. संदीप जुनघरे, आदीती अर्बनचे अध्यक्ष सुरेश देवकर, अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमोल ठाकरे आदी उपस्थित होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रशांत कोठे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. संचालन संदीप तडस यांनी केले़.

देशमुख पुढे म्हणाले की, महानुभावांनी केवळ भक्तीच नाही तर मराठी साहित्य निर्मितीचा देखील पाया रचला आहे़ मराठीतील आद्य गद्य व पद्य ग्रंथ निर्माण करणाऱ्या महानुभावांकडे चरित्र, व्याकरण, कथा, भाष्य, महाभाष्य, काव्य, महाकाव्य, आख्याना, टीका, स्थळवर्णने, इतिहास आदींच्यासही आद्यत्वाचा मान जातो. किंबहुना साहित्याला विविधांगीपणे मांडण्याचे काम महानुभावांनी या महाराष्ट्रात सर्वप्रथम केले, हे आपल्याला मान्य करावेच लागेल, असेही ते म्हणाले़.

धकाधकीच्या काळात माणसाला मन:शांतीची गरज

आजच्या धकाधकीच्या काळात मानसाला मन:शांतीची गरज भासत आहे़ अशावेळी अद्वितीय, अजरामर, अक्षर साहित्य वाचले की माणूस मंत्रमुग्ध होतो व गमावलेली मन:शांती परत मिळवितो, एवढी जादू या महानुभाव साहित्यात आहे़ सर्व जीवांचे ऐहिक व पारलौकिक जोपासण्याचे महान सामर्थ्य महानुभाव वाङ्मयात आहे़ महानुभाव वाङ्मयाने मराठी साहित्याचे दालन आपल्या दमदार व सामर्थ्यशाली भाषा वैशिष्ट्यांनी व विविधतेने समृद्ध केले आहे, असेही देशमुख यांनी सांगितले़. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा