शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथोत्सव लोकोत्सव झाला पाहिजे - सपकाळ

By admin | Updated: February 17, 2016 02:16 IST

बुलडाणा ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन; विविध प्रकाशन संस्थांचे स्टॉल.

बुलडाणा : ग्रंथ हे नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजवितात. ग्रंथामुळेच समाज घडतो. ग्रंथाच्या सहवासाने संस्कारांची उधळण होत संस्कार रूजतात. वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी ग्रंथोत्सवांचे आयोजन व्हायला पाहिजे. मनातील गढूळ विचार बाहेर काढण्यासाठी ग्रंथ वाचन महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा ग्रंथोत्सवात लोकसहभाग वाढला पाहिजे, किंबुहना ग्रंथोत्सव हे लोकोत्सव झाले तरच वाचन संस्कृती वाढेल व त्या माध्यमातून वैचारिक प्रबोधनाची व पुरोगामी विचारांची पेरणी होईल, असे प्रतिपदान आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. स्थानिक गर्दे सभागृहात बुलडाणा ग्रंथोत्सव २0१६ चा शुभारंभ आज थाटात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे हे होते तर ज्येष्ठ साहित्यिक सदानंद देशमुख, उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे, माजी ग्रंथालय संचालक गणेश तायडे, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा. कि. वा वाघ, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव, महिती अधिकारी नीलेश तायडे आदी उपस्थित होते. आ.सपकाळ यांनी विविध उदाहरणांचे दाखले देत वाचन संस्कृतीची रूजूवात किती महत्त्वाची आहे, हे स्पष्ट करून ग्रंथपालांनी हे काम सामाजिक भावनेतून करावे, असे आवाहन केले. अपर जिल्हाधिकारी टाकसाळे यांनी विचार मानवाला मोठे करतात. त्याकरिता सदृढ मन असणे आवश्यक आहे. कारण सदृढ मनामधूनच प्रगल्भ विचार बाहेर पडतात. अशा सुदृढ मनाला ग्रंथ हे रामबाण औषधासारखे काम करतात. त्यामुळे विद्यार्थी दशेतील प्रत्येकाने ग्रंथांना आपले मित्र करावे. खरा मनुष्य हा मानवतेमधूनच समाजाला दिसतो. मानवता टिकविण्यासाठीही ग्रंथ महत्त्वाची भूमिका बजावित असतात, तरी अशा ग्रंथोत्सवांमधून वाचन संस्कृती प्रबळ होऊन समाजाचे मानसिक स्वास्थ्य टिकून राहील, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली, तर सदानंद देशमुख यांनी सध्याचा काळ धकाधकीचा आहे. ग्रंथ वाचण्याची इच्छा असली, तरी ग्रंथ वाचायला वेळ मिळत नाही; मात्र ग्रंथोत्सवांच्या माध्यमातून निश्‍चितच विविध साहित्य समाजासमोर येते व वाचनाची आवड निर्माण होते. एवढेच नव्हे, तर साहित्य निर्मितीची प्रेरणाही मिळते, असे प्रतिपादन केले. प्रास्ताविकातून जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव यांनी ग्रंथोत्सव आयोजनामागील भूमिका विषद केली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ग्रंथपूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन निशिकांत ढवळे यांनी केले, तसेच आभार नीलेश तायडे यांनी मानले. प्रारंभी दिवंगत साहित्यिक सदानंद सिनगारे व सियाचीनमधील शहिदांना ङ्म्रद्धांजली अर्पण करण्यात आली.