शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

ग्रामसभांमध्ये घेणार कर्जमुक्तीचे ठराव! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:11 IST

बुलडाणा :   शासनाच्या फसव्या कर्जमाफीविरोधात शेतकरी संघटनेने रणशिंग फुंकले असून, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभांमध्ये कर्जमुक्ती व वीज बिल मुक्तीचे ठराव घेण्याचे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे.

ठळक मुद्देकर्जमाफीविरोधात शेतकरी संघटनेने फुंकले रणशिंग पत्रके वाटून जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :   शासनाच्या फसव्या कर्जमाफीविरोधात शेतकरी संघटनेने रणशिंग फुंकले असून, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभांमध्ये कर्जमुक्ती व वीज बिल मुक्तीचे ठराव घेण्याचे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी तुटपुंजी असून, या कर्जमाफीचा कुठलाच फायदा शेतकर्‍यांना होणार नाही.  त्यामुळे शेतकरी संघटनेने रणशिंग फुंकले असून, विविध टप्प्यांमध्ये पुढील काळात आंदोलने केली जाणार आहेत.   त्याचाच एक भाग म्हणून १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभांमध्ये कर्जमुक्ती व वीज बिल मुक्तीचे ठराव घेतले जाणार आहेत. त्यानंतर सदर ठराव हे शेतकरी संघटनेतर्फे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पोहोचविण्यात येणार आहेत.  म्हणून शेतकर्‍यांनी घेतलेले कर्ज हे अनैतिक असून, सरकारकडेच शेतकर्‍यांचे कर्ज आहे.  म्हणून सरसकट कर्जमुक्ती व वीज बिल मुक्ती असे दोन प्रमुख विषयांचे ठराव स्वातंत्र्य दिनाच्या ग्रामसभांमध्ये घेण्यात यावे. या ठरावांची प्रत संबंधित गावाच्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व जिल्हा कार्यलयांकडे पाठवावी, असेही आवाहन शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आले आहे. 

पत्रके वाटून जनजागृतीजिल्ह्यात ८७0 ग्रामपंचायती असून, शासनाच्या आदेशान्वये १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित करून विविध विकासात्मक ठराव घेण्यात येणार आहेत. यावेळी विविध ठरावाला मंजुरात देताना कर्जमुक्ती व वीज बिल मुक्तीचे ठराव घ्यावेत, असे आवाहन शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडून करण्यात येत आहे. याबाबत आवाहन करणारे पत्रक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते गावागावांत जाऊन वाटत असून, ग्रामस्थांमध्ये जनजागृती करीत आहेत.

शासनाच्या फसव्या कर्जमाफीविरोधात शेतकरी संघटना विविध आंदोलने करणार आहे. त्याचा एक भाग म्हणून १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभांमध्ये कर्जमुक्ती व वजी बिल मुक्तीचे ठराव घेण्यात यावे आणि जनता ही शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे, हे दाखवून द्यावे.-नामदेवराव जाधव, राज्य कार्यकारिणी सदस्य, शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य.