शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:31 IST

बुलडाणा: वेतनाअभावी गत सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील  जवळपास दीड हजार ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची उपासमार सुरू  होती. याबाबत गुरुवारी लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते.  या  वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषद उपमुकाअ यांनी ग्रामपंचायत  कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी प्रलंबित वेतन, राहणीमान भत्ता व  बोनस द्यावा, असे आदेश जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना दिले  आहेत. त्यामुळे वेतनापासून वंचित दीड हजार कर्मचार्‍यांचे  प्रलंबित वेतन व राहणीमान भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला  आहे.

ठळक मुद्देजि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचा आदेशप्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: वेतनाअभावी गत सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील  जवळपास दीड हजार ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची उपासमार सुरू  होती. याबाबत गुरुवारी लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते.  या  वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषद उपमुकाअ यांनी ग्रामपंचायत  कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी प्रलंबित वेतन, राहणीमान भत्ता व  बोनस द्यावा, असे आदेश जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना दिले  आहेत. त्यामुळे वेतनापासून वंचित दीड हजार कर्मचार्‍यांचे  प्रलंबित वेतन व राहणीमान भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला  आहे.जिल्ह्यात जवळपास दीड हजार कर्मचारी ग्रामीण भागात पाणी पुरवठा करणे, सफाई करून स्वच्छता ठेवणे आदी कामे करतात;  मात्र कर्मचार्‍यांना मागील सहा महिन्यांपासून किमान वेतन  वसुलीअभावी मिळत नसल्यामुळे उपासमारीची वेळ ग्रा.पं.  कर्मचारी यांच्यासह त्यांचे कुटुंबावर आलेली आहे. तसेच त्यांना  महागाई भत्ता व बोनस देण्यात येत नसल्यामुळे कुटुंबीयांचे  पालन पोषण कसे करावे, अशा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित  झाला आहे. ग्रा.पं. कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात जाऊ नये व त्यांच्यासह  त्यांच्या कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये याकरिता  राहणीमान भत्त्यासह किमान वेतन दिवाळी अगोदर देऊन ग्रा.पं.  कर्मचार्‍यांना दिवाळी बोनससुद्धा द्यावा. ज्या ग्रा.पं. कर्मचार्‍यांना  दिवाळीअगोदर किमान वेतन, राहणीमान भत्ता व दिवाळी बोनस  देणार नाही, अशा ग्रा.पं. ग्रामसेवकांचे वेतन व सरपंच मानधन  देण्यात येऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत  कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर गायकी, अध्यक्ष  शिवसिंग सोळंकी, जि. सचिव रामेश्‍वर डिवरे, जि. संघटक सुरेश  सपकाळ, संघटक पी.पी. पिसे आदींनी केली होती. याबाबत  लोकमतने गुरुवारी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल  घेत जिल्हा परिषदेचे उपमुकाअ यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना  एक पत्र पाठवून ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी ग्राम पंचायतींनी १00 टक्के किमान वेतन, राहणीमान भत्ता स्वनिधीतून  अदा करावे, तसेच दिवाळी बोनसबाबत वेतन, राहणीमान भत्ता  व भविष्य निर्वाह निधी माहे सप्टेंबर २0१७ पर्यंत अदा केल्यानं तर ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन निर्णय घ्यावा, असे नमूद केले  आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण  निर्माण झाले आहे.