शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:31 IST

बुलडाणा: वेतनाअभावी गत सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील  जवळपास दीड हजार ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची उपासमार सुरू  होती. याबाबत गुरुवारी लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते.  या  वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषद उपमुकाअ यांनी ग्रामपंचायत  कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी प्रलंबित वेतन, राहणीमान भत्ता व  बोनस द्यावा, असे आदेश जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना दिले  आहेत. त्यामुळे वेतनापासून वंचित दीड हजार कर्मचार्‍यांचे  प्रलंबित वेतन व राहणीमान भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला  आहे.

ठळक मुद्देजि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचा आदेशप्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: वेतनाअभावी गत सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील  जवळपास दीड हजार ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची उपासमार सुरू  होती. याबाबत गुरुवारी लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते.  या  वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषद उपमुकाअ यांनी ग्रामपंचायत  कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी प्रलंबित वेतन, राहणीमान भत्ता व  बोनस द्यावा, असे आदेश जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना दिले  आहेत. त्यामुळे वेतनापासून वंचित दीड हजार कर्मचार्‍यांचे  प्रलंबित वेतन व राहणीमान भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला  आहे.जिल्ह्यात जवळपास दीड हजार कर्मचारी ग्रामीण भागात पाणी पुरवठा करणे, सफाई करून स्वच्छता ठेवणे आदी कामे करतात;  मात्र कर्मचार्‍यांना मागील सहा महिन्यांपासून किमान वेतन  वसुलीअभावी मिळत नसल्यामुळे उपासमारीची वेळ ग्रा.पं.  कर्मचारी यांच्यासह त्यांचे कुटुंबावर आलेली आहे. तसेच त्यांना  महागाई भत्ता व बोनस देण्यात येत नसल्यामुळे कुटुंबीयांचे  पालन पोषण कसे करावे, अशा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित  झाला आहे. ग्रा.पं. कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात जाऊ नये व त्यांच्यासह  त्यांच्या कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये याकरिता  राहणीमान भत्त्यासह किमान वेतन दिवाळी अगोदर देऊन ग्रा.पं.  कर्मचार्‍यांना दिवाळी बोनससुद्धा द्यावा. ज्या ग्रा.पं. कर्मचार्‍यांना  दिवाळीअगोदर किमान वेतन, राहणीमान भत्ता व दिवाळी बोनस  देणार नाही, अशा ग्रा.पं. ग्रामसेवकांचे वेतन व सरपंच मानधन  देण्यात येऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत  कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर गायकी, अध्यक्ष  शिवसिंग सोळंकी, जि. सचिव रामेश्‍वर डिवरे, जि. संघटक सुरेश  सपकाळ, संघटक पी.पी. पिसे आदींनी केली होती. याबाबत  लोकमतने गुरुवारी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल  घेत जिल्हा परिषदेचे उपमुकाअ यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना  एक पत्र पाठवून ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी ग्राम पंचायतींनी १00 टक्के किमान वेतन, राहणीमान भत्ता स्वनिधीतून  अदा करावे, तसेच दिवाळी बोनसबाबत वेतन, राहणीमान भत्ता  व भविष्य निर्वाह निधी माहे सप्टेंबर २0१७ पर्यंत अदा केल्यानं तर ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन निर्णय घ्यावा, असे नमूद केले  आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण  निर्माण झाले आहे.