शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

...तोपर्यंत ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध झाल्याचे समजले जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 12:11 IST

Gram Panchayat Election: ग्रामस्थांनी खरोखरच सुजाणपणे घेतला की त्यामध्ये पैशाचे आमिष, धाकदपटशा झाली, याबाबीची पडताळणी आता तहसीलदारांकडून केली जाणार आहे.

ठळक मुद्देपडताळणी करून निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर करणार आहे.खात्री झाल्याशिवाय संबंधित निवडणूक अविरोध झाल्याचे जाहीर केले जाणार नाही.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : ग्रामपंचायतीची निवडणूक होण्याऐवजी त्या जागांसाठी प्रत्येकी केवळ अर्ज दाखल करून सर्व जागांवर सदस्यांची अविरोध निवड करण्याचा प्रयत्न अनेक गावांमध्ये झाला. तो प्रकार ग्रामस्थांनी खरोखरच सुजाणपणे घेतला की त्यामध्ये पैशाचे आमिष, धाकदपटशा झाली, याबाबीची पडताळणी आता तहसीलदारांकडून केली जाणार आहे. तोपर्यंत त्या ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध झाल्याचे समजले जाणार नाही, असे पत्र निवडणूक आयोगाने पाच दिवसांपूर्वीच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली. त्यामध्ये ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद अशी यंत्रणा निर्माण झाली. या सर्वच यंत्रणांचा कारभार पाहण्यासाठी निवडणुकीच्या माध्यमातून लाेकप्रतिनिधी निवडले जातात. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, चालू ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यातील काही आमदारांनी शासकीय नि‌धी देण्याचे आमिष दाखविले, तर काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच पदासाठी लिलाव करण्यात आला. त्यातच काही गावांमध्ये गावगुंड प्रवृत्तीमुळे उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासही मज्जाव केला जाण्याची शक्यता आहे. या सर्व शक्यता पाहता निवडणूक आयोगाने आधीच अविरोध निवड होणे, संपूर्ण ग्रामपंचायतीचे सदस्य अविरोध होणे, याबाबत तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार चालू निवडणुकीत अविरोध होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींची प्रत्यक्ष गावात जाऊन तहसीलदार पडताळणी करून निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर करणार आहे. आयोगाची खात्री झाल्याशिवाय संबंधित निवडणूक अविरोध झाल्याचे जाहीर केले जाणार नाही. त्यामुळे पडताळणी होईल.  

निवडणूक आयोगाने पाच दिवसांपूर्वीच तसे पत्र दिले आहे. त्या पत्रानुसार अ‌विरोध ग्रामपंचायतींबाबत तहसीलदारांचा प्रत्यक्ष पडताळणी अहवाल घेतला जाणार आहे. - दिनेश गिते,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी, ग्रामपंचायत

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकkhamgaonखामगावElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग