शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

ग्रामपंचायत निवडणुकांच्या लढतीचे चित्र स्पष्ट

By admin | Updated: July 24, 2015 00:55 IST

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू; बुलडाणा, मोताळा, चिखली, लोणार तालुक्यात १३ ग्रामपंचायती अविरोध.

बुलडाणा : ग्रामपंचायतीच्या ४ ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी २३ जुलै अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्यामुळे ठिकठिकाणच्या तहसील कार्यालयांवर तोबा गर्दी झाली होती. अर्ज मागे घेतल्यानं तर आता जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. गावागावात आता कोठे तिरंगी, तर कोठे चौरंगी लढती होणार असल्याने उद्यापासून खर्‍या अर्थाने निवणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. बुलडाणा तालुक्यात ३, तर मोताळा आणि चिखली तालुक्यात प्रत्येकी ५ ग्रमापंचायती अविरोध झाल्या आहेत.

*बुलडाणा तालुक्यात ११९३ उमेदवार

         बुलडाणा तालुक्यात ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४२७ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतल्याने आता प्रत्यक्ष रिंगणात ११९३ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. तर तालुक्यात सिंदखेड अंभोडा, खुपगाव या तीन ग्रमापंचायती अविरोध झाल्या. याशिवाय डोमरूळ, बोरखेड, साखळी, शिरपूर, तराडखेड या पाच ग्रामपंचातींचा प्रत्येकी एक वार्ड तर अजिसपूर वरूड आणि सोयगाव या तीन ग्रामपंचायतींचे प्रत्येकी दोन वार्ड असे एकूण २0 वार्ड अविरोध करण्यात आले. त्यामुळे बुलडाणा तालु क्यातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १६२0 उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १६२0 उमेदवारांपैकी ४२७ मेदवारांनी रिंगणातून माघार घेतल्याने आता ११९३ उमेदवारांमध्ये लढती होणार आहेत.

*मोताळा तालुक्यात २८२ उमेदवारांची माघार

          मोताळा तालुक्यात ४ ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २८२ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेत उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे १0६0 उमेदवार रिंगणात उतरेले असून, पाच ग्रामपंचायती अविरोध झाल्या आहेत. छाननी अंती १३६३ पैकी ४७२ जागांसाठी १३४२ उमेदवारांचे अर्ज शिल्लक होते; मात्र माघारी अंती १0६0 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले.

*लोणार तालुक्यात १३७ जणांची माघार

           लोणार तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या २१ जुलै रोजी झालेल्या अर्ज छाननीत ३७ उमेदवारांचे अर्ज अपात्र घोषित केल्यानंतर आज २३ जुलै रोजी ४ वाजतापर्यंंत १३७ उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणातून आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात ३२३ उमेदवार कायम असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार नितीन पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले.