शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

ग्रामपंचायत निवडणुकांच्या लढतीचे चित्र स्पष्ट

By admin | Updated: July 24, 2015 00:55 IST

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू; बुलडाणा, मोताळा, चिखली, लोणार तालुक्यात १३ ग्रामपंचायती अविरोध.

बुलडाणा : ग्रामपंचायतीच्या ४ ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी २३ जुलै अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्यामुळे ठिकठिकाणच्या तहसील कार्यालयांवर तोबा गर्दी झाली होती. अर्ज मागे घेतल्यानं तर आता जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. गावागावात आता कोठे तिरंगी, तर कोठे चौरंगी लढती होणार असल्याने उद्यापासून खर्‍या अर्थाने निवणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. बुलडाणा तालुक्यात ३, तर मोताळा आणि चिखली तालुक्यात प्रत्येकी ५ ग्रमापंचायती अविरोध झाल्या आहेत.

*बुलडाणा तालुक्यात ११९३ उमेदवार

         बुलडाणा तालुक्यात ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४२७ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतल्याने आता प्रत्यक्ष रिंगणात ११९३ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. तर तालुक्यात सिंदखेड अंभोडा, खुपगाव या तीन ग्रमापंचायती अविरोध झाल्या. याशिवाय डोमरूळ, बोरखेड, साखळी, शिरपूर, तराडखेड या पाच ग्रामपंचातींचा प्रत्येकी एक वार्ड तर अजिसपूर वरूड आणि सोयगाव या तीन ग्रामपंचायतींचे प्रत्येकी दोन वार्ड असे एकूण २0 वार्ड अविरोध करण्यात आले. त्यामुळे बुलडाणा तालु क्यातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १६२0 उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १६२0 उमेदवारांपैकी ४२७ मेदवारांनी रिंगणातून माघार घेतल्याने आता ११९३ उमेदवारांमध्ये लढती होणार आहेत.

*मोताळा तालुक्यात २८२ उमेदवारांची माघार

          मोताळा तालुक्यात ४ ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २८२ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेत उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे १0६0 उमेदवार रिंगणात उतरेले असून, पाच ग्रामपंचायती अविरोध झाल्या आहेत. छाननी अंती १३६३ पैकी ४७२ जागांसाठी १३४२ उमेदवारांचे अर्ज शिल्लक होते; मात्र माघारी अंती १0६0 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले.

*लोणार तालुक्यात १३७ जणांची माघार

           लोणार तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या २१ जुलै रोजी झालेल्या अर्ज छाननीत ३७ उमेदवारांचे अर्ज अपात्र घोषित केल्यानंतर आज २३ जुलै रोजी ४ वाजतापर्यंंत १३७ उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणातून आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात ३२३ उमेदवार कायम असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार नितीन पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले.