शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

ग्रा. पं. निवडणूक; चाकरमान्यांना आले महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:26 IST

धामणगाव धाड : लाॅकडाऊन काळात कोरोनाच्या भीतीपोटी गावाकडे येऊ नका. आहे तेथेच राहा. तुम्ही आल्यास कोरोनाच्या धोका वाढेल, असे ...

धामणगाव धाड : लाॅकडाऊन काळात कोरोनाच्या भीतीपोटी गावाकडे येऊ नका. आहे तेथेच राहा. तुम्ही आल्यास कोरोनाच्या धोका वाढेल, असे म्हणत गावाबाहेरच रोखलेल्या चाकरमान्यांची ग्रामपंचायत निवडणुकीत निर्णायक भूमिका असणार आहे.

गावाबाहेर नोकरी - व्यवसायासाठी स्थलांतरित झालेल्या मात्र गावात मतदान असलेल्यांना गावातून मतदानासाठी गाड्या पाठवू का? अशी विचारणा हाेत आहे. या पार्श्वभूमीवर आतापासूनच सोशल मीडियावर पोस्ट सुरू झाल्या आहेत. नोकरीसाठी परगावी असणाऱ्या लोकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. गावात कामधंदा नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे, औरगांबाद, मुंबई, नागपूरसारख्या ठिकाणी गेलेल्या ग्रामस्थांना लाॅकडाऊनचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. कोरोनामुळे कामधंदा बंद पडल्याने बाहेर असलेले लोक आपल्या गावी येऊ लागले. मात्र अनेकांना गावाच्या वेशीवरच अडविण्यात आले. त्यांना गावात येण्यास बंदी केली. अनेक दिवस त्यांना प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे त्यांना शेतात किंवा संस्थात्मक ठिकाणी क्वारंटाईन व्हावे लागले. अनलाॅकमध्ये अशी कुटुंबे पुन्हा नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी परतली. आता ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आणि परत अशा कुटुंबाची गावपुढाऱ्यांना आस्था वाटू लागली आहे. पूर्वी गावाकडे येऊ नका म्हणणारे निवडणुकांचे वातावरण तापल्याने आता मतदानाला गावाकडे या, गाड्या पाठवतो, असा आग्रह करताना दिसत आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीत एकेका मतासाठी उमेदवारांना संघर्ष करावा लागणार आहे. यातील अनेक मतदार जिल्ह्याबाहेर कुटुंबासह असल्यामुळे मतदार यादीतील त्यांच्या नावामुळे आता त्यांना विशेष महत्त्व आले आहे.