शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

ग्रा. पं. निवडणूक; चाकरमान्यांना आले महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:26 IST

धामणगाव धाड : लाॅकडाऊन काळात कोरोनाच्या भीतीपोटी गावाकडे येऊ नका. आहे तेथेच राहा. तुम्ही आल्यास कोरोनाच्या धोका वाढेल, असे ...

धामणगाव धाड : लाॅकडाऊन काळात कोरोनाच्या भीतीपोटी गावाकडे येऊ नका. आहे तेथेच राहा. तुम्ही आल्यास कोरोनाच्या धोका वाढेल, असे म्हणत गावाबाहेरच रोखलेल्या चाकरमान्यांची ग्रामपंचायत निवडणुकीत निर्णायक भूमिका असणार आहे.

गावाबाहेर नोकरी - व्यवसायासाठी स्थलांतरित झालेल्या मात्र गावात मतदान असलेल्यांना गावातून मतदानासाठी गाड्या पाठवू का? अशी विचारणा हाेत आहे. या पार्श्वभूमीवर आतापासूनच सोशल मीडियावर पोस्ट सुरू झाल्या आहेत. नोकरीसाठी परगावी असणाऱ्या लोकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. गावात कामधंदा नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे, औरगांबाद, मुंबई, नागपूरसारख्या ठिकाणी गेलेल्या ग्रामस्थांना लाॅकडाऊनचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. कोरोनामुळे कामधंदा बंद पडल्याने बाहेर असलेले लोक आपल्या गावी येऊ लागले. मात्र अनेकांना गावाच्या वेशीवरच अडविण्यात आले. त्यांना गावात येण्यास बंदी केली. अनेक दिवस त्यांना प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे त्यांना शेतात किंवा संस्थात्मक ठिकाणी क्वारंटाईन व्हावे लागले. अनलाॅकमध्ये अशी कुटुंबे पुन्हा नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी परतली. आता ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आणि परत अशा कुटुंबाची गावपुढाऱ्यांना आस्था वाटू लागली आहे. पूर्वी गावाकडे येऊ नका म्हणणारे निवडणुकांचे वातावरण तापल्याने आता मतदानाला गावाकडे या, गाड्या पाठवतो, असा आग्रह करताना दिसत आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीत एकेका मतासाठी उमेदवारांना संघर्ष करावा लागणार आहे. यातील अनेक मतदार जिल्ह्याबाहेर कुटुंबासह असल्यामुळे मतदार यादीतील त्यांच्या नावामुळे आता त्यांना विशेष महत्त्व आले आहे.