शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं.भवनाचे काम निकृष्ट!

By admin | Updated: December 5, 2015 09:08 IST

चिखली तालुक्यातील भोरसा-भोरसी ग्रामपंचायत भवनाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार.

चिखली : तालुक्यातील भोरसा-भोरसी येथे गत वर्षभरापासून सुरू असलेल्या ग्रामपंचायत भवनाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रा.पं.सदस्य गोपाल ढोरे यांनी केली असून, या कामाची गुणवत्ता तपासून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. मूलभूत सुविधा फंडातून १0 लक्ष रुपये किमतीचे ग्रामपंचायत भवन तालुक्यातील भोरसा-भोरसी येथे उभारण्या त येत आहे. या ग्रा.पं.भवनाच्या बांधकामाचे कंत्राट घेणार्‍या कंत्राटदाराने बांधकामात अत्यंत कमी प्रमाणात सिमेंट वापरले असून, माती मिङ्म्रीत रेतीचा वापर केल्याने बांधकाम पूर्ण होण्याआधीच ठिकठिकाणी खचत आहे, तसेच भिंतींना अनेक ठिकाणी तडेसुद्धा गेले असून, याबाबत संबंधित ठेकेदारास वारंवार बजावूनसुद्धा हे तुपुरस्सर ग्रा.पं.पदाधिकार्‍यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराने मनमानी पद्धतीने व अत्यंत सुमार दर्जाचे बांधकाम चालविले असल्याचा आरोप गोपाल ढोरे व ग्रामस्थांनी केला असून, या कामाच्या गुणवत्तेची तातडीने तपासणी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आमरण उपोषणास बसण्याचा इशारा पं.स.गटविकास अधिकार्‍यांना दिलेल्या तक्रारीद्वारे दिला आहे. या निवेदनावर गोढे यांच्यासह माजी सरपंच रमेश आकाळ, परमेश्‍वर भुसारी, संतोष आकाळ, अनमोल ढोरे, संदीप ढोरे, संजय पवार, अनंता मोतेकर, रामेश्‍वर शिंगणे, संजय आकाळ, विष्णू भुसारी, नारायण आकाळ, विजय मुरकुटे, प्रताप गवई, दशरथ ढोरे, रामेश्‍वर भुसारी, शुभम भुसारी, मंगेश भुसारी, साहेबराव मुरकुटे आदींसह सुमारे ३0 ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत. जीवन प्राधिकरण कर्मचार्‍यांचे रजा आंदोलन बुलडाणा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे व अधिकारी व कर्मचार्‍यांचे वेतन, भत्ते व नवृत्ती वेतन शासनाच्यावतीने अदा करण्यात यावे, या मागण्यांसाठी ४ डिसेंबर रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी काळय़ा फिती लावून एक दिवशीय सामूहिक रजा आंदोलन केले. या आंदोलनामुळे बुलडाणा, चिखली, खामगाव व जळगाव जामोद येथील कार्यालयात एकच शुकशुकाट पसरला आहे. सामूहिक रजा आंदोलन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व्ही.एम. सरकटे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनात बुलडाणा विभागासह चिखली, खामगाव व जळगाव जामोद उपविभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी कर्मचार्‍यांच्या वतीने जिल्हािधकार्‍यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये नमूद केले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून जात आहे. या विभागाकडे कामाचा व्याप कमी झाल्याने उत्पन्नाचा स्त्रोतदेखील कमी झाला आहे. परिणामी, आज जीवन प्राधिकरणाजवळ कर्मचार्‍यांना मासिक वेतन देण्यासाठीसुद्धा निधी नाही. त्यामुळे भविष्यात कर्मचार्‍यांना वेतन व भत्ते मिळणे अशक्यप्राय होणार आहे. जीवन प्राधिकरणाला शासकीय सेवेत समाविष्ट करण्यासाठी अनेक संघटनांनी आजपयर्ंत आंदोलने केली; परंतु त्या आंदोलनाची शासनाने कुठलीच दखल घेतली नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांची हेळसांड थांबवावी, या विभागाला शासकीय सेवेत सामावून घेत अधिकारी व कर्मचार्‍यांचे वेतन, भत्ते व नवृत्ती वेतन शासनाच्यावतीने अदा करण्यात यावे, या मागणीसाठी अधिकारी व कर्मचार्‍यांनी काळय़ा फिती लावून एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन केले.