शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारविरोधा त आंदोलन उभारणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:35 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणत्याही  पदासाठी, सत्तेसाठी लाचार नसून, शेतकर्‍यांना  समस्या सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी संघर्ष  करणारी चळवळ आहे. शेतकर्‍यांच्या समस्या सुट तील, या अपेक्षेने आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो  होतो; मात्र सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष  करीत असल्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो.  त्यामुळे सरकारशी आमचा कोणताही संबंध राहिला  नसून, शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र व  राज्य सरकारविरोधात मराठवाडा व विदर्भात मोठे  आंदोलन उभारणार असल्याची माहिती केंद्रीय  वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी  आज दिली.

ठळक मुद्देवस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांचा  इशारा सरकारविरोधात मराठवाडा व विदर्भात मोठे आंदोलन  उभारणार 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणत्याही  पदासाठी, सत्तेसाठी लाचार नसून, शेतकर्‍यांना  समस्या सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी संघर्ष  करणारी चळवळ आहे. शेतकर्‍यांच्या समस्या सुट तील, या अपेक्षेने आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो  होतो; मात्र सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष  करीत असल्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो.  त्यामुळे सरकारशी आमचा कोणताही संबंध राहिला  नसून, शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र व  राज्य सरकारविरोधात मराठवाडा व विदर्भात मोठे  आंदोलन उभारणार असल्याची माहिती केंद्रीय  वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी  आज दिली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची  बैठक पुण्यात ३0 ऑगस्ट रोजी झाल्यानंतर केंद्रीय  वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी  ४ सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री  फडणवीस यांच्याकडे दिला. त्यानंतर शासनाचा  बंगला, गाडी सोडल्यानंतर ते मुंबईहून एसटीने  बुलडाणा येथे दाखल झाले. यावेळी स्वाभिमानीच्या  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत  केले. याबाबत स्वाभिमानीची पुढील भूमिका स्पष्ट  करण्यासाठी येथील विश्राम भवनात ६ सप्टेंबर रोजी  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी  स्वाभिमानीची बबनराव चेके, गजानन बंगाळे,  कौलास फाटे,  राणा चंद्रशेखर चंदन, जनार्धन  शिवणेकर, भगवान मोर,  गिरधर देशमुख,  डॉ.विनायक वाघ, गजानन उबरहंडे आदी  स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.  रविकांत तुपकर पुढे म्हणाले की, आपण सत्ता  भोगण्यासाठी सरकारमध्ये गेलो नव्हतो, शेतकर्‍यांचे  भले व्हावे, त्यांना न्याय मिळावा, अशी आपली  भूमिका होती; मात्र भाजपा सरकारने निराशा केली.  त्यामुळे  केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचा राजीनामा  देऊन स्वाभिमानी अधिकृतरीत्या एडीएमधून बाहेर  पडली आहे. आमचा कोणाला व्यक्तिगत विरोध  नसून, शेतकर्‍यांविषयी राबविण्यात येणार्‍या  धोरणाबाबत लढाई आहे, असेही तुपकर म्हणाले.