शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारविरोधा त आंदोलन उभारणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:35 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणत्याही  पदासाठी, सत्तेसाठी लाचार नसून, शेतकर्‍यांना  समस्या सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी संघर्ष  करणारी चळवळ आहे. शेतकर्‍यांच्या समस्या सुट तील, या अपेक्षेने आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो  होतो; मात्र सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष  करीत असल्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो.  त्यामुळे सरकारशी आमचा कोणताही संबंध राहिला  नसून, शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र व  राज्य सरकारविरोधात मराठवाडा व विदर्भात मोठे  आंदोलन उभारणार असल्याची माहिती केंद्रीय  वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी  आज दिली.

ठळक मुद्देवस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांचा  इशारा सरकारविरोधात मराठवाडा व विदर्भात मोठे आंदोलन  उभारणार 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणत्याही  पदासाठी, सत्तेसाठी लाचार नसून, शेतकर्‍यांना  समस्या सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी संघर्ष  करणारी चळवळ आहे. शेतकर्‍यांच्या समस्या सुट तील, या अपेक्षेने आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो  होतो; मात्र सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष  करीत असल्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो.  त्यामुळे सरकारशी आमचा कोणताही संबंध राहिला  नसून, शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र व  राज्य सरकारविरोधात मराठवाडा व विदर्भात मोठे  आंदोलन उभारणार असल्याची माहिती केंद्रीय  वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी  आज दिली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची  बैठक पुण्यात ३0 ऑगस्ट रोजी झाल्यानंतर केंद्रीय  वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी  ४ सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री  फडणवीस यांच्याकडे दिला. त्यानंतर शासनाचा  बंगला, गाडी सोडल्यानंतर ते मुंबईहून एसटीने  बुलडाणा येथे दाखल झाले. यावेळी स्वाभिमानीच्या  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत  केले. याबाबत स्वाभिमानीची पुढील भूमिका स्पष्ट  करण्यासाठी येथील विश्राम भवनात ६ सप्टेंबर रोजी  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी  स्वाभिमानीची बबनराव चेके, गजानन बंगाळे,  कौलास फाटे,  राणा चंद्रशेखर चंदन, जनार्धन  शिवणेकर, भगवान मोर,  गिरधर देशमुख,  डॉ.विनायक वाघ, गजानन उबरहंडे आदी  स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.  रविकांत तुपकर पुढे म्हणाले की, आपण सत्ता  भोगण्यासाठी सरकारमध्ये गेलो नव्हतो, शेतकर्‍यांचे  भले व्हावे, त्यांना न्याय मिळावा, अशी आपली  भूमिका होती; मात्र भाजपा सरकारने निराशा केली.  त्यामुळे  केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचा राजीनामा  देऊन स्वाभिमानी अधिकृतरीत्या एडीएमधून बाहेर  पडली आहे. आमचा कोणाला व्यक्तिगत विरोध  नसून, शेतकर्‍यांविषयी राबविण्यात येणार्‍या  धोरणाबाबत लढाई आहे, असेही तुपकर म्हणाले.