शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारविरोधा त आंदोलन उभारणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:35 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणत्याही  पदासाठी, सत्तेसाठी लाचार नसून, शेतकर्‍यांना  समस्या सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी संघर्ष  करणारी चळवळ आहे. शेतकर्‍यांच्या समस्या सुट तील, या अपेक्षेने आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो  होतो; मात्र सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष  करीत असल्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो.  त्यामुळे सरकारशी आमचा कोणताही संबंध राहिला  नसून, शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र व  राज्य सरकारविरोधात मराठवाडा व विदर्भात मोठे  आंदोलन उभारणार असल्याची माहिती केंद्रीय  वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी  आज दिली.

ठळक मुद्देवस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांचा  इशारा सरकारविरोधात मराठवाडा व विदर्भात मोठे आंदोलन  उभारणार 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणत्याही  पदासाठी, सत्तेसाठी लाचार नसून, शेतकर्‍यांना  समस्या सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी संघर्ष  करणारी चळवळ आहे. शेतकर्‍यांच्या समस्या सुट तील, या अपेक्षेने आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो  होतो; मात्र सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष  करीत असल्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो.  त्यामुळे सरकारशी आमचा कोणताही संबंध राहिला  नसून, शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र व  राज्य सरकारविरोधात मराठवाडा व विदर्भात मोठे  आंदोलन उभारणार असल्याची माहिती केंद्रीय  वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी  आज दिली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची  बैठक पुण्यात ३0 ऑगस्ट रोजी झाल्यानंतर केंद्रीय  वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी  ४ सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री  फडणवीस यांच्याकडे दिला. त्यानंतर शासनाचा  बंगला, गाडी सोडल्यानंतर ते मुंबईहून एसटीने  बुलडाणा येथे दाखल झाले. यावेळी स्वाभिमानीच्या  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत  केले. याबाबत स्वाभिमानीची पुढील भूमिका स्पष्ट  करण्यासाठी येथील विश्राम भवनात ६ सप्टेंबर रोजी  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी  स्वाभिमानीची बबनराव चेके, गजानन बंगाळे,  कौलास फाटे,  राणा चंद्रशेखर चंदन, जनार्धन  शिवणेकर, भगवान मोर,  गिरधर देशमुख,  डॉ.विनायक वाघ, गजानन उबरहंडे आदी  स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.  रविकांत तुपकर पुढे म्हणाले की, आपण सत्ता  भोगण्यासाठी सरकारमध्ये गेलो नव्हतो, शेतकर्‍यांचे  भले व्हावे, त्यांना न्याय मिळावा, अशी आपली  भूमिका होती; मात्र भाजपा सरकारने निराशा केली.  त्यामुळे  केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचा राजीनामा  देऊन स्वाभिमानी अधिकृतरीत्या एडीएमधून बाहेर  पडली आहे. आमचा कोणाला व्यक्तिगत विरोध  नसून, शेतकर्‍यांविषयी राबविण्यात येणार्‍या  धोरणाबाबत लढाई आहे, असेही तुपकर म्हणाले.