शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या परिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष - शंकरअण्णा घोंगडे

By admin | Updated: February 4, 2016 01:35 IST

भाजप सरकारकडून शेतक-यांचा अपेक्षाभंग झाल्याचा आरोप घोंगडे यांनी केला.

बुलडाणा : शेतकरी, शेतमजूर हा देशाचा आत्मा असून, या दोघांचीही परिस्थिती बिकट आहे. दुष्काळ तीव्र असून, अशा काळात शेतकर्‍यांना उभारी देण्याचे काम होणे गरजेचे आहे; मात्र विद्यमान भाजपा सरकारकडून शेतकर्‍यांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळेच लाखो शेतकर्‍यांच्या मागण्या असणारे पत्र याचिका म्हणून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केले आहे. राजकारण होत राहील; आधी शेतकरी महत्वाचा, हे या सरकारला लक्षात येत नाही. सरकारला शेतकर्‍यांची चिंता नाही, अशी संतापजनक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान आघाडी सेलचे प्रदेश अध्यक्ष शंकरअण्णा घोंगडे यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत शंकरअण्णा घोंगडे यांनी शेतकरी व शेतमजूर कृती समिती या बॅनरखाली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबत घोंगडे यांनी माहिती दिली. सध्याचे सरकार हे शेतकरीविरोधी भूमिकेत आहे. दुष्काळामुळे शैक्षणिक शुल्क माफ करा, अशी मागणी केली, तर या सरकारने परीक्षा शुल्क माफ केले. कृषिपंपाचे वीज बिल माफ करा, या मागणीवर ३५.५ टक्के वीज बिल माफ केले. हे ३५.५ टक्के कुठून आणले, हे माहीत नाही. जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या नावाखाली भात व कांदा उत्पादक शेतकरी भरडला गेला. दुष्काळी निधीमधून कापूस उत्पादक वगळला. हे सर्व पाहता, या सरकारकडून शेतकर्‍यांचा अपेक्षाभंग झाला आहे, असा आरोप घोंगडे यांनी केला. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी, माजी मंत्री भारत बोंद्रे, माजी आमदार कृष्णराव इंगळे, नानाभाऊ कोकरे, रेखाताई खेडेकर, जि.प. सभापती आशाताई झोरे, उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर उपस्थित होते.