शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
2
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
3
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
4
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
5
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार का? कर तज्ज्ञ आणि सीए संघटनांनी काय केली मागणी?
7
रशियाच्या निशाण्यावर नक्की कोण? रहिवासी भागात डागले ड्रोन, पण झेलेन्स्कींशी आहे थेट कनेक्शन!
8
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
9
मंदिरात फुलांच्या रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल
10
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
11
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
12
खळबळजनक! ७ वर्षांच्या मुलाने चुकून घेतला ९ वर्षांच्या भावाचा जीव, खेळता खेळता काय घडलं?
13
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
14
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
15
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
16
वय हरलं अन् स्वप्नं जिंकली! ३ गिर्यारोहकांचा अनोखा आदर्श, एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा
17
येणं आनंदाचं, जाणं आशीर्वादाचं! गणराया, तू जाताना वेड लावून जातोस रे...
18
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दिसला जान्हवीचा बॉयफ्रेंड, गुलालाने माखला शिखर पहारीयाचा चेहरा, म्हणतो...
19
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
20
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले

शेतक-यांच्या परिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष - शंकरअण्णा घोंगडे

By admin | Updated: February 4, 2016 01:35 IST

भाजप सरकारकडून शेतक-यांचा अपेक्षाभंग झाल्याचा आरोप घोंगडे यांनी केला.

बुलडाणा : शेतकरी, शेतमजूर हा देशाचा आत्मा असून, या दोघांचीही परिस्थिती बिकट आहे. दुष्काळ तीव्र असून, अशा काळात शेतकर्‍यांना उभारी देण्याचे काम होणे गरजेचे आहे; मात्र विद्यमान भाजपा सरकारकडून शेतकर्‍यांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळेच लाखो शेतकर्‍यांच्या मागण्या असणारे पत्र याचिका म्हणून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केले आहे. राजकारण होत राहील; आधी शेतकरी महत्वाचा, हे या सरकारला लक्षात येत नाही. सरकारला शेतकर्‍यांची चिंता नाही, अशी संतापजनक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान आघाडी सेलचे प्रदेश अध्यक्ष शंकरअण्णा घोंगडे यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत शंकरअण्णा घोंगडे यांनी शेतकरी व शेतमजूर कृती समिती या बॅनरखाली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबत घोंगडे यांनी माहिती दिली. सध्याचे सरकार हे शेतकरीविरोधी भूमिकेत आहे. दुष्काळामुळे शैक्षणिक शुल्क माफ करा, अशी मागणी केली, तर या सरकारने परीक्षा शुल्क माफ केले. कृषिपंपाचे वीज बिल माफ करा, या मागणीवर ३५.५ टक्के वीज बिल माफ केले. हे ३५.५ टक्के कुठून आणले, हे माहीत नाही. जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या नावाखाली भात व कांदा उत्पादक शेतकरी भरडला गेला. दुष्काळी निधीमधून कापूस उत्पादक वगळला. हे सर्व पाहता, या सरकारकडून शेतकर्‍यांचा अपेक्षाभंग झाला आहे, असा आरोप घोंगडे यांनी केला. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी, माजी मंत्री भारत बोंद्रे, माजी आमदार कृष्णराव इंगळे, नानाभाऊ कोकरे, रेखाताई खेडेकर, जि.प. सभापती आशाताई झोरे, उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर उपस्थित होते.