शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कागदोपत्री असलेल्या सहकारी संस्थांवर शासनाची टाच

By admin | Updated: December 11, 2014 00:02 IST

पश्‍चिम वर्‍हाडातील सुमारे १000 संस्था निघणार अवसायनात.

बुलडाणा : राजकीय आणि आर्थिक लाभासाठी केवळ कागदोपत्री चालणार्‍या सहकारी संस्थांना आता शासनाने लक्ष्य केले असून, बुलडाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील सुमारे एक हजार संस्थांना टाळे ठोकले जाणार असल्याची माहिती आहे. राखीव गटातील सहकारी संस्थांना राज्य व केंद्र सरकारकडून विविध प्रकारचे अनुदान मिळते. जिल्हा बँक, दूध संस्थांसह जिल्हा व तालुकास्तरीय संस्थांच्या निवडणुकीत या संस्थांच्या प्रतिनिधींना मतदानाचा हक्क असतो. त्यामुळे अधिकाधिक संस्था आपल्या ताब्यात असाव्यात, यासाठी राजकीय पक्ष नेहमीच प्रयत्न करतात. या राजकीय पक्षांच्या भरवशावर ग्रामीण भागात दूध संस्था, विविध कार्यकारी सोसायट्या, पाणीपुरवठा संस्थांची दुकानदारी जोरात सुरू आहे. मोठय़ा गावांमध्ये अशा सहकारी संस्था डझनाने दिसतात. सहकार विभाग राजकीय दबावाला बळी पडून या संस्थांवर कारवाई करण्याचे टाळते. सध्या सहकार विभागात सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असून, लवकरच संस्थांच्या वर्गवारीनुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. या निवडणुका झाल्यानंतर पुढील पाच वर्षे सहकार विभागाला आवश्यक प्रक्रियेसाठी प्रतिसाद न देणार्‍या संस्थांवर रितसर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, काही संस्थांवर प्रशासक नेमण्यात येणार असून, बंद असलेल्या काही संस्था अवसायनात काढण्याची प्रक्रियाही लवकरच केली जाणार असल्याची माहिती आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात अशा किमान ३५0, वाशिम जिल्ह्यात २४0, तर उर्वरीत अकोला जिल्ह्यात जवळपास ४00, अशा एकूण एक हजार संस्था असल्याची माहिती आहे.

  *अनुदानासाठीच केवळ नोंदणी

    औद्योगिक सहकारी संस्था व पणन संस्थांसाठी शासनाकडून लाखो रुपयांचे अनुदान मिळते. हे अनुदान कसे मिळविता येईल, यासाठी या संस्थांची धडपड सुरू असते. यामध्ये औद्योगिक व पणन आणि जिनिंग विभागातील अधिकाधिक संस्थांचा समावेश आहे. केवळ निवडणुकांसाठी या संस्था कागदोपत्री असतात. एरव्ही संस्थांचे कामकाज नियमित नसते. जिल्हा सहकारी बँका, जिल्हा दूध उत्पादक संघ, तसेच बाजार समितीवर संचालक पाठविण्यासाठीच या संस्थांच्या लेटरहेडचा वापर केला जातो.