शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

बळीराजाच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध- फुंडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:11 IST

बुलडाणा :  राज्याच्या संपन्नतेमध्ये शेती क्षेत्राचा वाटा बहुमोल आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखी व समाधानी असायला पाहिजे. बळीराजाच्या कल्याणासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुठल्याही संकटामध्ये शासन शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही, अशी ग्वाही राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.

ठळक मुद्दे भारतीय स्वातंत्र्याचा ७0 वा वर्धापन दिन थाटात साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  राज्याच्या संपन्नतेमध्ये शेती क्षेत्राचा वाटा बहुमोल आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखी व समाधानी असायला पाहिजे. बळीराजाच्या कल्याणासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुठल्याही संकटामध्ये शासन शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही, अशी ग्वाही राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.भारतीय स्वातंत्र्याचा ७0 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय आवारात  आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधित करताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार राहूल बोंद्रे, जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार धृपदराव सावळे, नगराध्यक्ष श्रीमती नजमुन्नीसा मो. सज्जाद, जि.प सभापती श्रीमती श्‍वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. षण्मुखराज, जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीणा आदींची उपस्थिती होती.    छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना अमलात आणून शासन शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी काम करत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले की, या योजनेनुसार दीड लाख रुपयांपयर्ंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले आहे. या योजनेचा सर्वात जास्त लाभ बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना झाला आहे. तसेच दीड लाखावर कर्ज असलेल्या ४ हजार ९८0 शेतकर्‍यांना ११८.६१ कोटी रुपयांची कर्जमाफी एकरकमी भरणा केल्यानंतर मिळणार आहे. भाव स्थिरता आणि बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत  जिल्ह्यात १३ खरेदी केंद्रांवर ४९ हजार ८११ शेतकर्‍यांची एकूण ८.८९ लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.  या खरेदीपोटी शेतकर्‍यांच्या खात्यात ४२८.३८ लाख रुपयांचे चुकारे जमा करण्यात आलेले आहेत.  जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्हाभरात  सन २0१६-१७ साठी दुसर्‍या टप्प्यात २४५ गावांची निवड करण्यात आली. जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत शेततळ्यासाठी पात्र ठरलेल्या सहा हजार ८३६ अर्जांपैकी ३ हजार ९८२ शेततळ्यांना कायार्रंभ आदेश दिले आहे. त्यापैकी २0९८ शेततळी पूर्ण झालेली आहेत, तसेच जिल्ह्यात जलपूर्ती धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत ९ हजार २१ विहिरी सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ८ हजार ९२४ विहिरी पूर्ण झालेल्या आहेत. तसेच सन २0१६-१७ मध्ये खरीप हंगामात ३.८७ लाख शेतकर्‍यांनी ३.२६ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला आहे.  कृषि व संलग्न क्षेत्राला समृद्ध करणारा समृद्धी महामार्ग जिल्ह्यात ४ तालुक्यांच्या ४९ गावांजवळून जात आहे. या महामार्गावर जिल्ह्यात दोन ठिकाणी स्मार्ट शहरांची निर्मिती केल्या जाणार आहे. महामार्गामुळे जिल्ह्यातील मेहकर, सिंदखेड राजा, लोणार व दे. राजा तालुक्यांसोबतच संपूर्ण जिल्ह्याचा विकास होणार आहे. संचालन नरेंद्र लांजेवार यांनी केले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, समाजभूषण पुरस्कारप्राप्त,  विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक यांची उपस्थिती होती.