शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
4
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
5
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
6
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
7
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
8
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
9
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
10
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
11
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
12
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
13
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
14
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
15
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
16
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
17
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
18
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
19
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
20
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत सरकार सदैव तत्पर : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST

विद्यार्थी (शालेय आणि महाविद्यालयीन) नियमित शाळा व महाविद्यालय सुरू नसल्यामुळे शारीरिक व मानसिकदृष्ट्या दुर्बल होत आहेत. त्यांचा शैक्षणिक ...

विद्यार्थी (शालेय आणि महाविद्यालयीन) नियमित शाळा व महाविद्यालय सुरू नसल्यामुळे शारीरिक व मानसिकदृष्ट्या दुर्बल होत आहेत. त्यांचा शैक्षणिक व बौद्धिक स्तर खालावत आहे. मुख्यत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त गावे व शहरात नियमित शाळा व महाविद्यालये त्वरित संपूर्ण विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत सुरू करण्यात यावीत. यानुषंगाने विद्यार्थ्यांचे संपूर्ण लसीकरण करण्यात यावे. त्यासाठी ग्रामीण भागातील महाविद्यालय, शाळा तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यात याव्यात, आर्थिक मागास घटकातील प्रत्येकाला ऑनलाईन शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी, अथवा दर्जेदार उपकरणे पुरवावीत. विविध विभागातील तृतीय व चतुर्थी श्रेणीतील पदे त्वरित भरण्यात यावीत, आदी मागण्यांचे निवेदन यावेळी युवासेनेच्या वतीने उपतालुका प्रमुख विशाल इंगळे यांनी मंत्री सामंत यांना सादर केले. यावेळी आमदार डॉ. संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील शाळा तांत्रिकदृष्ट्या असक्षम

ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाची सांगड शैक्षणिक क्षेत्रात अत्यावश्यक बाब म्हणून पुढे आली आहे. परंतु, ग्रामीण भागातील शाळा, विद्यालय तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम नाहीत, असा प्रश्नही यावेळी युवासेनेच्या वतीने निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला.