शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

मूग, उडिदाची आवक घटली!

By admin | Updated: September 28, 2016 01:50 IST

भावात वाढ; मात्र भाववाढीचा फायदा शेतक-यांऐवजी व्यापा-यांनाच होणार.

बुलडाणा, दि. २७- गत तीन दिवसांत जिल्ह्यात कोसळलेल्या जोरदार पावसामुळे मूग व उडिदाच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात घट आली आहे. परिणामी, बाजारात उडिदाची मागणी वाढली असून, भाव आठ हजारांपेक्षा जास्त मिळत आहेत. यावर्षी सुरुवातीपासूनच मुबलक पाऊस असल्यामुळे जिल्ह्यात मुगाची २५ हजार ६१७ हेक्टरवर तर उडिदाची २६ हजार ८१६ हेक्टरवर पेरणी करण्यात आली. मुबलक पावसामुळे मूग व उडिदाचे पीक जोमात होते. गत आठ दिवसांपासून शेतकरी सदर पिकाची काढणी करीत आहे. मूग व उडिदाची काढणी करून अनेक शेतकर्‍यांनी शेतात ढीग लावले आहेत. शेतकरी यावर्षी चांगले उत्पादन होईल, या अपेक्षेत असतानाच २५ ते २६ सप्टेंबरच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकर्‍यांनी शेतात ढीग लावून ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाले, तसेच शेतात सध्या काढणीला आलेल्या झाडांच्या शेंगाही जोरदार पावसाने गळून पडल्या, त्यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. मूग व उडिदाच्या पिकाचे नुकसान झाल्याचा परिणाम बाजारावर पडला आहे. या पिकांची बाजार समितीत आवक घटली आहे, तसेच भावातही वाढ झाली आहे. मुगाला शासनाने ५२00 रुपये हमीभाव दिला आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुगाला चार हजार रुपये प्रती क्विंटल भाव होते. यादरम्यान व्यापार्‍यांनी या दरात मुगाची खरेदी करून शेतकर्‍याची प्रचंड लूट केली. त्यानंतर शासनाने हमीभाव केंद्र सुरू करून हमीभावात मुगाची खरेदी करणे सुरू केले. गत आठ दिवसांपासून मुगाच्या भावातही वाढ झाली आहे. उडिदाच्या भावातही अचानक वाढ झाली असून, सध्या बाजारात उडिदाला सात हजार रुपये, आठ हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. या पिकांच्या भावात वाढ झाली असली, तरी त्याचा फायदा होणार्‍या शेतकर्‍यांची संख्या अत्यल्प आहे. भाववाढीचा फायदा शेतकर्‍यांऐवजी व्यापार्‍यांनाच मूग व उडिदाच्या पिकात गत एक महिन्यात दीड ते दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. शेतकर्‍यांना पैशाची गरज असल्यामुळे पीक येताच शेतकरी विक्री करतात. व्यापारी या मालाची खरेदी करून साठवणूक करतात. भाववाढ झाल्यानंतर शेतमालाची विक्री करतात. त्यामुळे सध्या मूग व उडिदाच्या होत असलेल्या भाववाढीचा फायदा शे तकर्‍यांना कमी तर व्यापार्‍यांनाच जास्त होत आहे. जोरदार पावसामुळे सोयाबीनचेही नुकसान जिल्ह्यात तीन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे काही भागात सोयाबीन पिकाचे जोरदार नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या शेंगा झडल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गत तीन दिवसांपासून मूग व उडिदाच्या पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आवक घटली असून, याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. या पिकांचे भाव वाढले असले, तरी त्याचा फायदा शेतकर्‍यांऐवजी व्यापार्‍यांनाच अधिक होणार आहे.- गजानन अमदाबादकर शेतकरी संघटना, बुलडाणा.