शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

मूग, उडिदाची आवक घटली!

By admin | Updated: September 28, 2016 01:50 IST

भावात वाढ; मात्र भाववाढीचा फायदा शेतक-यांऐवजी व्यापा-यांनाच होणार.

बुलडाणा, दि. २७- गत तीन दिवसांत जिल्ह्यात कोसळलेल्या जोरदार पावसामुळे मूग व उडिदाच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात घट आली आहे. परिणामी, बाजारात उडिदाची मागणी वाढली असून, भाव आठ हजारांपेक्षा जास्त मिळत आहेत. यावर्षी सुरुवातीपासूनच मुबलक पाऊस असल्यामुळे जिल्ह्यात मुगाची २५ हजार ६१७ हेक्टरवर तर उडिदाची २६ हजार ८१६ हेक्टरवर पेरणी करण्यात आली. मुबलक पावसामुळे मूग व उडिदाचे पीक जोमात होते. गत आठ दिवसांपासून शेतकरी सदर पिकाची काढणी करीत आहे. मूग व उडिदाची काढणी करून अनेक शेतकर्‍यांनी शेतात ढीग लावले आहेत. शेतकरी यावर्षी चांगले उत्पादन होईल, या अपेक्षेत असतानाच २५ ते २६ सप्टेंबरच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकर्‍यांनी शेतात ढीग लावून ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाले, तसेच शेतात सध्या काढणीला आलेल्या झाडांच्या शेंगाही जोरदार पावसाने गळून पडल्या, त्यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. मूग व उडिदाच्या पिकाचे नुकसान झाल्याचा परिणाम बाजारावर पडला आहे. या पिकांची बाजार समितीत आवक घटली आहे, तसेच भावातही वाढ झाली आहे. मुगाला शासनाने ५२00 रुपये हमीभाव दिला आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुगाला चार हजार रुपये प्रती क्विंटल भाव होते. यादरम्यान व्यापार्‍यांनी या दरात मुगाची खरेदी करून शेतकर्‍याची प्रचंड लूट केली. त्यानंतर शासनाने हमीभाव केंद्र सुरू करून हमीभावात मुगाची खरेदी करणे सुरू केले. गत आठ दिवसांपासून मुगाच्या भावातही वाढ झाली आहे. उडिदाच्या भावातही अचानक वाढ झाली असून, सध्या बाजारात उडिदाला सात हजार रुपये, आठ हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. या पिकांच्या भावात वाढ झाली असली, तरी त्याचा फायदा होणार्‍या शेतकर्‍यांची संख्या अत्यल्प आहे. भाववाढीचा फायदा शेतकर्‍यांऐवजी व्यापार्‍यांनाच मूग व उडिदाच्या पिकात गत एक महिन्यात दीड ते दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. शेतकर्‍यांना पैशाची गरज असल्यामुळे पीक येताच शेतकरी विक्री करतात. व्यापारी या मालाची खरेदी करून साठवणूक करतात. भाववाढ झाल्यानंतर शेतमालाची विक्री करतात. त्यामुळे सध्या मूग व उडिदाच्या होत असलेल्या भाववाढीचा फायदा शे तकर्‍यांना कमी तर व्यापार्‍यांनाच जास्त होत आहे. जोरदार पावसामुळे सोयाबीनचेही नुकसान जिल्ह्यात तीन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे काही भागात सोयाबीन पिकाचे जोरदार नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या शेंगा झडल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गत तीन दिवसांपासून मूग व उडिदाच्या पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आवक घटली असून, याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. या पिकांचे भाव वाढले असले, तरी त्याचा फायदा शेतकर्‍यांऐवजी व्यापार्‍यांनाच अधिक होणार आहे.- गजानन अमदाबादकर शेतकरी संघटना, बुलडाणा.