शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

गोरेगाव सरपंचाविरुद्धचा अविश्‍वास ठराव बारगळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:57 IST

सिंदखेडराजा: गोरेगाव येथील सरपंच सीमा संजय पंचाळ यांच्याविरुद्ध १६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांच्या समक्ष तहसील कार्यालयात सहा सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्यावर २३ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले असता बहुमताअभावी अविश्‍वास ठराव रद्द करण्यात आला.

ठळक मुद्देग्रामपंचायतमध्ये झाले प्रत्यक्ष मतदानसीमा पंचाळ कायम 

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: गोरेगाव येथील सरपंच सीमा संजय पंचाळ यांच्याविरुद्ध १६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांच्या समक्ष तहसील कार्यालयात सहा सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्यावर २३ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले असता बहुमताअभावी अविश्‍वास ठराव रद्द करण्यात आला. असा निर्णय प्रभारी तहसीलदार सारिका भगत यांनी दिला. गोरेगाव येथे कायमस्वरूपी नळयोजना मुख्यमंत्री पेयजल योजनेतून मंजूर होताच काही नागरिकांनी योजनेविरुद्ध रनकंदन उठविले होते. या योजनेचे श्रेय कोणत्याही परिस्थितीत सरपंच सीमा संजय पंचाळ यांना मिळू नये, म्हणून त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप करून १६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार संतोष कणसे यांच्या कार्यालयात उपसरपंच रहीमखा शेरखा पठाण, गीताबाई संतोष गवई, गौतम कोंडुबा गवई, रामदास उत्तमराव पंचाळ, कमल अशोक कव्हळे आणि शिवगंगा उद्धव पंचाळ या सहा ग्रामपंचायत सदस्यांनी प्रत्यक्ष हजर राहून अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्या ठरावावर चर्चा करण्यासाठी आणि प्रत्यक्ष मतदान घेण्यासाठी २३ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत गोरेगाव येथे प्रभारी तहसीलदार सारिका भगत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीला गौतम कोंडुबा गवई, रामदास उत्तमराव पंचाळ, कमल अशोक कव्हळे आणि शिवगंगा उद्धव पंचाळ हे चारच सदस्य हजर होते. या चार सदस्यांनी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. ग्रामपंचायत मुंबई अधिनियम १९५८ कलम उपमध्ये नमूद केल्यानुसार सर्वसाधारण सरपंच पदाकरिता अविश्‍वास दाखल करण्याकरिता २/३ पेक्षा कमी नसेल तरच बहुमताने ठराव पारित होऊ शकतो, सरपंचावरील अविश्‍वास ठराव पारित करण्यासाठी सातपैकी पाच सदस्यांनी पाठिंबा देणे आवश्यक होते. परंतु चार सदस्यांनी अविश्‍वास ठरावाला पाठिंबा दर्शविल्याने बहुमताने असा ठराव संमत होत नाही. त्यामुळे सरपंच सीमा संजय पंचाळ यांच्या विरुद्ध करण्यात आलेला अविश्‍वास ठराव रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय प्रभारी तहसीलदार सारिका भगत यांनी गोरेगाव ग्रामपंचायतमध्ये दिला. अविश्‍वास ठराव बारगळल्यामुळे गोरेगाव येथील सरपंच सीमा संजय पंचाळ कायम आहेत. अविश्‍वास ठराव मतदानाच्या वेळी पटवारी मांडगे, ग्रामसेवक मनोज मोरे यांनी सहकार्य केले. तर ठाणेदार सचिन शिंदे, पोहेकॉ गणेश डोईफोडे यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत