शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गोरेगाव सरपंचाविरुद्धचा अविश्‍वास ठराव बारगळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:57 IST

सिंदखेडराजा: गोरेगाव येथील सरपंच सीमा संजय पंचाळ यांच्याविरुद्ध १६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांच्या समक्ष तहसील कार्यालयात सहा सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्यावर २३ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले असता बहुमताअभावी अविश्‍वास ठराव रद्द करण्यात आला.

ठळक मुद्देग्रामपंचायतमध्ये झाले प्रत्यक्ष मतदानसीमा पंचाळ कायम 

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: गोरेगाव येथील सरपंच सीमा संजय पंचाळ यांच्याविरुद्ध १६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांच्या समक्ष तहसील कार्यालयात सहा सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्यावर २३ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले असता बहुमताअभावी अविश्‍वास ठराव रद्द करण्यात आला. असा निर्णय प्रभारी तहसीलदार सारिका भगत यांनी दिला. गोरेगाव येथे कायमस्वरूपी नळयोजना मुख्यमंत्री पेयजल योजनेतून मंजूर होताच काही नागरिकांनी योजनेविरुद्ध रनकंदन उठविले होते. या योजनेचे श्रेय कोणत्याही परिस्थितीत सरपंच सीमा संजय पंचाळ यांना मिळू नये, म्हणून त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप करून १६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार संतोष कणसे यांच्या कार्यालयात उपसरपंच रहीमखा शेरखा पठाण, गीताबाई संतोष गवई, गौतम कोंडुबा गवई, रामदास उत्तमराव पंचाळ, कमल अशोक कव्हळे आणि शिवगंगा उद्धव पंचाळ या सहा ग्रामपंचायत सदस्यांनी प्रत्यक्ष हजर राहून अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्या ठरावावर चर्चा करण्यासाठी आणि प्रत्यक्ष मतदान घेण्यासाठी २३ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत गोरेगाव येथे प्रभारी तहसीलदार सारिका भगत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीला गौतम कोंडुबा गवई, रामदास उत्तमराव पंचाळ, कमल अशोक कव्हळे आणि शिवगंगा उद्धव पंचाळ हे चारच सदस्य हजर होते. या चार सदस्यांनी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. ग्रामपंचायत मुंबई अधिनियम १९५८ कलम उपमध्ये नमूद केल्यानुसार सर्वसाधारण सरपंच पदाकरिता अविश्‍वास दाखल करण्याकरिता २/३ पेक्षा कमी नसेल तरच बहुमताने ठराव पारित होऊ शकतो, सरपंचावरील अविश्‍वास ठराव पारित करण्यासाठी सातपैकी पाच सदस्यांनी पाठिंबा देणे आवश्यक होते. परंतु चार सदस्यांनी अविश्‍वास ठरावाला पाठिंबा दर्शविल्याने बहुमताने असा ठराव संमत होत नाही. त्यामुळे सरपंच सीमा संजय पंचाळ यांच्या विरुद्ध करण्यात आलेला अविश्‍वास ठराव रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय प्रभारी तहसीलदार सारिका भगत यांनी गोरेगाव ग्रामपंचायतमध्ये दिला. अविश्‍वास ठराव बारगळल्यामुळे गोरेगाव येथील सरपंच सीमा संजय पंचाळ कायम आहेत. अविश्‍वास ठराव मतदानाच्या वेळी पटवारी मांडगे, ग्रामसेवक मनोज मोरे यांनी सहकार्य केले. तर ठाणेदार सचिन शिंदे, पोहेकॉ गणेश डोईफोडे यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत