शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

गोरेगाव सरपंचाविरुद्धचा अविश्‍वास ठराव बारगळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:57 IST

सिंदखेडराजा: गोरेगाव येथील सरपंच सीमा संजय पंचाळ यांच्याविरुद्ध १६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांच्या समक्ष तहसील कार्यालयात सहा सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्यावर २३ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले असता बहुमताअभावी अविश्‍वास ठराव रद्द करण्यात आला.

ठळक मुद्देग्रामपंचायतमध्ये झाले प्रत्यक्ष मतदानसीमा पंचाळ कायम 

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: गोरेगाव येथील सरपंच सीमा संजय पंचाळ यांच्याविरुद्ध १६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांच्या समक्ष तहसील कार्यालयात सहा सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्यावर २३ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले असता बहुमताअभावी अविश्‍वास ठराव रद्द करण्यात आला. असा निर्णय प्रभारी तहसीलदार सारिका भगत यांनी दिला. गोरेगाव येथे कायमस्वरूपी नळयोजना मुख्यमंत्री पेयजल योजनेतून मंजूर होताच काही नागरिकांनी योजनेविरुद्ध रनकंदन उठविले होते. या योजनेचे श्रेय कोणत्याही परिस्थितीत सरपंच सीमा संजय पंचाळ यांना मिळू नये, म्हणून त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप करून १६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार संतोष कणसे यांच्या कार्यालयात उपसरपंच रहीमखा शेरखा पठाण, गीताबाई संतोष गवई, गौतम कोंडुबा गवई, रामदास उत्तमराव पंचाळ, कमल अशोक कव्हळे आणि शिवगंगा उद्धव पंचाळ या सहा ग्रामपंचायत सदस्यांनी प्रत्यक्ष हजर राहून अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्या ठरावावर चर्चा करण्यासाठी आणि प्रत्यक्ष मतदान घेण्यासाठी २३ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत गोरेगाव येथे प्रभारी तहसीलदार सारिका भगत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीला गौतम कोंडुबा गवई, रामदास उत्तमराव पंचाळ, कमल अशोक कव्हळे आणि शिवगंगा उद्धव पंचाळ हे चारच सदस्य हजर होते. या चार सदस्यांनी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. ग्रामपंचायत मुंबई अधिनियम १९५८ कलम उपमध्ये नमूद केल्यानुसार सर्वसाधारण सरपंच पदाकरिता अविश्‍वास दाखल करण्याकरिता २/३ पेक्षा कमी नसेल तरच बहुमताने ठराव पारित होऊ शकतो, सरपंचावरील अविश्‍वास ठराव पारित करण्यासाठी सातपैकी पाच सदस्यांनी पाठिंबा देणे आवश्यक होते. परंतु चार सदस्यांनी अविश्‍वास ठरावाला पाठिंबा दर्शविल्याने बहुमताने असा ठराव संमत होत नाही. त्यामुळे सरपंच सीमा संजय पंचाळ यांच्या विरुद्ध करण्यात आलेला अविश्‍वास ठराव रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय प्रभारी तहसीलदार सारिका भगत यांनी गोरेगाव ग्रामपंचायतमध्ये दिला. अविश्‍वास ठराव बारगळल्यामुळे गोरेगाव येथील सरपंच सीमा संजय पंचाळ कायम आहेत. अविश्‍वास ठराव मतदानाच्या वेळी पटवारी मांडगे, ग्रामसेवक मनोज मोरे यांनी सहकार्य केले. तर ठाणेदार सचिन शिंदे, पोहेकॉ गणेश डोईफोडे यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत