शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पक्ष बदलणा-यांना ‘अच्छे दिन’!

By admin | Updated: March 22, 2017 02:01 IST

भाजपाकडे ओढा वाढला; आयारामांमुळेच भाजप झाली प्रबळ.

विवेक चांदूरकर बुलडाणा, दि. २१- वर्षानुवर्षे एकाच पक्षाच्या सतरंज्या उचलण्याऐवजी संधीचा शोध घेऊन पक्ष बदलणार्‍या नेत्यांनाच अच्छे दिन आले असल्याचे चित्र बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय घडामोडीतून स्पष्ट होत आहे. कधीकाळी काँग्रेसचे कट्टर असलेले शिवचंद्र तायडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून अध्यक्षपद मिळविले. भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे व भाजपच्या नवीन नगराध्यक्षांवरून पक्ष बदलणार्‍यांना ह्यअच्छे दिनह्ण आल्याचे निदर्शनास येत आहे. गत काही महिन्यांपासून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूूर्णत: बदलली आहेत. भाजपच्या सत्तेचे वारे सर्वत्र वाहत असल्यामुळे अनेक नेते सध्या भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे भाजपला भरती तर अन्य पक्षांना ओहोटी लागली आहे. नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत याचा प्रत्यय आला. नुकतेच जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळविलेले शिवचंद्र तायडे पूर्वी काँग्रेसचे नेते होते. त्यांनी केंद्रिय मंत्री मुकुल वासनिक यांच्यावर आक्षेप घेत पक्ष सोडला. काही महिन्यांपूर्वीच पत्र प्रकरण जिल्ह्यात बरेच गाजले. मुकुल वासनिक यांनी मराठा समाजाच्या नेत्यांवर अन्याय केला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपशी जवळीक साधली व सरळ अध्यक्षपद मिळविले. भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे हेही पूर्वी काँग्रेसमध्येच होते. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत व्हाया राष्ट्रवादी ते भाजपमध्ये आले व भाजपने त्यांना जिल्हाध्यक्षपद दिले. जिल्हा परिषद निवडणुकीतही देऊळगाव मही जि. प. सर्कलमध्ये संजय वडतकर शिवसेना सोडून भाजपात आले व विजयी झाले. मनसेचे विनोद वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला व जिल्हा परिषदेत विजयी झाले. मालूबाई मानकर यांनी पक्षबदल केला व जिल्हा परिषदेत विजय मिळविला. दुसर्‍या पक्षातून प्रवेश करणार्‍यांना भाजप संधी देत असल्याचा संदेश जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडीतून गेला आहे. त्यामुळे भाजपमध्ये येणार्‍यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.