शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष बदलणा-यांना ‘अच्छे दिन’!

By admin | Updated: March 22, 2017 02:01 IST

भाजपाकडे ओढा वाढला; आयारामांमुळेच भाजप झाली प्रबळ.

विवेक चांदूरकर बुलडाणा, दि. २१- वर्षानुवर्षे एकाच पक्षाच्या सतरंज्या उचलण्याऐवजी संधीचा शोध घेऊन पक्ष बदलणार्‍या नेत्यांनाच अच्छे दिन आले असल्याचे चित्र बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय घडामोडीतून स्पष्ट होत आहे. कधीकाळी काँग्रेसचे कट्टर असलेले शिवचंद्र तायडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून अध्यक्षपद मिळविले. भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे व भाजपच्या नवीन नगराध्यक्षांवरून पक्ष बदलणार्‍यांना ह्यअच्छे दिनह्ण आल्याचे निदर्शनास येत आहे. गत काही महिन्यांपासून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूूर्णत: बदलली आहेत. भाजपच्या सत्तेचे वारे सर्वत्र वाहत असल्यामुळे अनेक नेते सध्या भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे भाजपला भरती तर अन्य पक्षांना ओहोटी लागली आहे. नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत याचा प्रत्यय आला. नुकतेच जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळविलेले शिवचंद्र तायडे पूर्वी काँग्रेसचे नेते होते. त्यांनी केंद्रिय मंत्री मुकुल वासनिक यांच्यावर आक्षेप घेत पक्ष सोडला. काही महिन्यांपूर्वीच पत्र प्रकरण जिल्ह्यात बरेच गाजले. मुकुल वासनिक यांनी मराठा समाजाच्या नेत्यांवर अन्याय केला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपशी जवळीक साधली व सरळ अध्यक्षपद मिळविले. भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे हेही पूर्वी काँग्रेसमध्येच होते. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत व्हाया राष्ट्रवादी ते भाजपमध्ये आले व भाजपने त्यांना जिल्हाध्यक्षपद दिले. जिल्हा परिषद निवडणुकीतही देऊळगाव मही जि. प. सर्कलमध्ये संजय वडतकर शिवसेना सोडून भाजपात आले व विजयी झाले. मनसेचे विनोद वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला व जिल्हा परिषदेत विजयी झाले. मालूबाई मानकर यांनी पक्षबदल केला व जिल्हा परिषदेत विजय मिळविला. दुसर्‍या पक्षातून प्रवेश करणार्‍यांना भाजप संधी देत असल्याचा संदेश जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडीतून गेला आहे. त्यामुळे भाजपमध्ये येणार्‍यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.