शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

महसूल प्रशासनाच्या वतीने सुवर्ण राजस्व अभियान राबवावे : ज्ञानेश्वर टाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:37 IST

देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मेहकर तहसील अंतर्गत महसूल विभागाच्या वतीने पुरवठा विभागातील बऱ्याच योजना नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याच्या ...

देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मेहकर तहसील अंतर्गत महसूल विभागाच्या वतीने पुरवठा विभागातील बऱ्याच योजना नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातील सर्व गावातील नागरिकांच्या वतीने प्राप्त होत असून, बऱ्याच नागरिकांनी अर्ज करूनसुद्धा त्यांना दोन वर्षे होत आहे. रेशन कार्ड मिळत नाही व ज्यांना कार्ड मिळाले आहे; परंतु त्यांचे बारा अंकी नंबर त्यांना देण्यात आलेला नाही. बऱ्याच नागरिकांचे रेशन कार्ड ऑपरेटर यांनी ऑनलाइन केलेले नाही. तालुक्याला इष्टांक शिल्लक असतानादेखील बऱ्याच लाभार्थींना वंचित ठेवले जात आहे. पुरवठा विभागातील कार्यालयातील नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना धान्य मिळत नसून शासनाच्या योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तब्बल दोन वर्षे झाले सदर अभियान राबवले गेलेले नाही. तरी आपण आपल्या स्तरावर तात्काळ उचित कार्यवाही करावी. महाराष्ट्र शासनाच्या सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत संबंधित योजना ह्या ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात व योग्य ती नियमानुसार कार्यवाही करावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची असेल, असा इशारा देण्यात आला. सदर निवेदनाच्या प्रति पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व विभागीय आयुक्त अमरावती यांना सादर करण्यात आल्या. यावेळी देवेंद्र आखाडे, कृषांक चव्हाण उपस्थित होते.