शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

दोन घरांसह गोडाउनला आग

By admin | Updated: April 20, 2017 01:23 IST

संग्रामपूर : तालुक्यातील चांगेफळ बु. येथे महावितरण कंपनीच्या पोलवरील तारांमध्ये घर्षण झाल्याने दोन घरांसह एका गोडाउनला आग लागली.

संग्रामपूर : तालुक्यातील चांगेफळ बु. येथे महावितरण कंपनीच्या पोलवरील तारांमध्ये घर्षण झाल्याने दोन घरांसह एका गोडाउनला आग लागली. या आगीत घरातील जीवनोपयोगी साहित्य धान्य, रोख रक्कम १० हजार रूपये तसेच गोडाउनमधील साहित्य आगीत भस्मसात झाले. ही घटना बुधवारी दुपारी १ वाजता दरम्यान घडली.चांगेफळ बु. येथे जळगाव जामोद रस्त्यावर रतन वासुदेव खंडारे, कमला सुपडा जाधव यांची दोन घरे व श्रीकृष्ण पांडुरंग राहाटे यांचे या दोन घराजवळ गोडाऊन आहे. याच घराच्या बाजूला महावितरण कंपनीची मेन लाइन या घराजवळूनच जाते. दरम्यान, १ वाजेदरम्यान या महावितरण कंपनीच्या मेन लाइनच्या पोलजवळील तारामध्ये घर्षण झाल्यामुळे पोलच्या खाली असलेल्या गवताला आग लागली व पाहता पाहता ही आग दोन घरापर्यंत पोहोचली व या आगीने रौद्ररूप धारण करून या आगीत रतन वासुदेव भडारे, कमलाबाई सुपडा जाधव, यांची दोन घरे व श्रीकृष्ण पांडुरंग राहाटे यांचे गोडाउन या आगीत काही क्षणातच भस्मसात झाले. या आगीमध्ये रतन वासुदेव खंडारे यांचे घरातील रोख रक्कम १० हजार रुपये, घरातील सर्व कपडे, सर्व भांडे, गहू ३ पोते व इतर धान्य, २ सायकली, वीणा, टाळ, मृदंग, महत्त्वाची सर्व कागदपत्रे, पत्रे, धान्य टाकी व संपूर्ण घर या आगीत भस्मसात झाले. तर कमलाबाई सुपडा जाधव यांचे घरातील २ पोते गहू, ५ पत्रे व पोते ज्वारी, सात ग्रॅम सोन्याची पोत, १ गॅस सिलिंडर व संपूर्ण घर या आगीत भस्मसात झाले, तर श्रीकृष्ण पांडुरंग राहाटे यांचे गोडाउनमधील २० ताट्या, २० पत्रे व बैलगाडी व गोडाउन या आगीत भस्मसात झाले. या आगीमध्ये रतन वासुदेव खंडारे यांच्या घराला आग लागल्यामुळे ५० हजाराचे नुकसान झाले, तर कमलाबाई सुपडा जाधव यांच्या घराला आग लागल्यामुळे ३० हजाराचे नुकसान झाले तर श्रीकृष्ण पांडुरंग राहाटे यांच्या गोडाउनला आग लागल्यामुळे त्यांचे २० हजाराचे नुकसान झाले आहे.